शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

पाटोळपाडा, तेलमपाडा पाणीटंचाईने त्रस्त, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:05 IST

भातसा धरणक्षेत्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळूक ग्रामपंचायत हद्दीतील पाटोळपाडा, तेलमपाडा परिसर पाणीटंचाईने त्रस्त झाला आहे.

- श्याम धुमाळकसारा : भातसा धरणक्षेत्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळूक ग्रामपंचायत हद्दीतील पाटोळपाडा, तेलमपाडा परिसर पाणीटंचाईने त्रस्त झाला आहे. येथे २ कूपनलिका, २ विहिरी आहेत. परंतु, कुठेच पाणी नसल्याने तेलमपाडा येथील महिलांना तसेच पुरूषांना ४ टेकड्या पार करून भातसा धरणक्षेत्रात उतरून पाण्याची व्यवस्था करावी लागते आहे. मुलाबाळांना घरी ठेवून संपूर्ण दिवस पाण्यासाठी खर्च करावा लागतो. महिलांसोबतच पुरूषांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने रोजगार बुडतो आहे. त्यामुहे पोट कसे भरायचे, असा प्रश्न येथील आदिवासींना पडला आहे. या गावातील महिलांना ४ किमी. अंतरावरील सुसरवाडी येथील साठलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी जावे लागते. या पाण्याची पाहणी केली असता ते प्रदूषित असल्याचे आढळले. या साठलेल्या पाण्याच्या आसपासची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एखादी व्यक्ती पाय घसरून पडल्यास जबर दुखापत होण्याचा धोका जास्त आहे.पाणी योजनेचे तीनतेरापाटोळपाडा आणि गाव यासाठी २००७ - ०८ मध्ये ५१.४३ लाखांच्या योजनेचे काम अर्धवट ठेवून कंत्राटदाराने नागरिकांना पाणीटंचाईच्या दरीत ढकलले आहे. या परिसरातील योजना भातसा पाणलोट क्षेत्रात असूनही विहिरीवर राबवण्याचा घाट घातला जात आहे.जानेवारीतच या विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणीच मिळाले नाही. संपूर्ण रात्र महिलांना पाण्यासाठी जागावे लागते. कूपनलिकांमधील पाणी संपले तर ३ किमी अंतरावर दऱ्याखोऱ्यांमधून भातसा पाणलोट धरणक्षेत्रात जावे लागते.पाण्यासारखी मूलभूत गरजही पूर्ण होत नसल्याने पाटोळपाडा येथील आदिवासी लोकांनी लोकसभेसाठी मतदान न करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याची महत्त्वाची समस्या न सुटल्यास संपूर्ण परिसराने एकत्र येऊन विधानसभा आणि जिल्हा परिषद मतदानावर बहिष्कार टाकण्याची योजना आखली असून लोकप्रतिनिधींना प्रचाराला येऊच न देण्याचे ठरवले आहे.या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ अत्यंत त्रस्त असून प्रशासनाने यावर काही ना काही कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात होणारा हा त्रास संपावा, अशी त्यांची इच्छा आहे.पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपायहा भाग डोंगरमाथ्यावर वसल्याने पावसाचे पाणी थेट वाहून जाते. योग्य नियोजन नसल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. नाल्यांमध्ये गाळ साचल्याने पाणी वाहून जाते. हा गाळ काढून पाणी साठवण्यासाठी योग्य नियोजन केले तर भूजल साठ्यात वाढ होऊ शकते. तर दुसºया बाजूने विचार केल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणाºया भातसा धरणाची एक बाजू या तीनही गावांना पाणीपुरवठा करू शकते. काही परिसरात जुनी नळ योजना, साठवण टाक्या आहेत. फक्त काही लाख रु पये खर्च करून भातसा धरणातील पाणी योग्य नियोजन करून निधी उपलब्ध केल्यास कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात होऊ शकते.पशूंची अवस्था अत्यंत बिकटमाणसांनाच पाणी नाही, तर जनावरांसाठी कुठून आणायचे, असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत. पाणी नसल्याने पशूंचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. शिवाय पशू वैद्यकीय अधिकारीही येथे फिरकत नसल्याने जनावरे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक शिवराम भिका झुगरे यांनी सांगितले.दापूरवासीयांपाठोपाठ अजनूपवासीयांचा देखील सर्व निवडणुकांवर बहिष्कारअजनूप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया उठावा, दापूर माळ, बांदलवाडी, सावरखेड, या गावांच्या लगत मुंबईला पाणीपुरवठा करणाºया मध्य वैतरणा धरणाचे बॅक वॉटर नदीपात्र आहे; परंतु ते पाणी या गावकऱ्यांना उपलब्ध होत नाही. खर्डी वनविभागाच्या मुजोरपणामुळे या ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या नदीपात्रावर पाणी आणण्यासाठी पायवाट रस्ता वनविभाग करून देत नसल्याने गावकरी खोल दरीत उतरून पाणी जमा करत असतात. या गावातील ग्रामस्थांनी अनेकदा पाणी आणण्यासाठी किमान पायवाट तरी करून देण्याची मागणी केली होती. ती पूर्ण झाली नाही.दापूरमाळ आणि सावरखेडची अवस्था तर अतिशय दयनीय आहे. या गावात वीज, रस्ता, पाणी, दवाखाना या मूलभूत गरजाच लोकांना माहीत नाहीत. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या ग्रामस्थांनी या वेळी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.डबक्यातील पाणी पित आपली तहान भागवणाºया दापूरवासीयांना रस्ता तसेच पाणी न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीसह बहिष्कार टाकणार असून पाण्यासाठी वेठीस धरणाºया वनविभाग, लघुपाटबंधारे आणि आदिवासी विकास प्रकल्पाविरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याचे विजय शिंगवा यांनी सांगितले.स्वच्छ भारत मिशनमधील शौचालय बंदस्वच्छ भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शौचालयाचा पाण्याअभावी वापर होत नसल्याने घरोघरी असलेल्या शौचालयात पेंढा भरून ठेवला आहे.शहापूर तालुक्यातील बहुतांश पाणी योजना अपूर्णावस्थेत आहेत. त्यासंदर्भात लवकरच चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.    - रावसाहेब आढे, अभियंता,     पाणीपुरवठा विभाग, ठाणे

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईthaneठाणे