शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाटील कुटुंबावर चढवला होता हल्ला, नातलगाने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 01:22 IST

जमिनीच्या वादातून रविवारी रात्री चिमुरडी मुलगी आणि पत्नीसह स्वत:चेही जीवन संपवणाऱ्या वाकलन येथील शिवराम पाटील यांच्याशी नातलगांनी रविवारीदेखील वाद घातला होता.

कुमार बडदे मुंब्रा : जमिनीच्या वादातून रविवारी रात्री चिमुरडी मुलगी आणि पत्नीसह स्वत:चेही जीवन संपवणाऱ्या वाकलन येथील शिवराम पाटील यांच्याशी नातलगांनी रविवारीदेखील वाद घातला होता. सायंकाळी काही जण पाटील कुटुंबीयांना मारण्यासाठी त्यांच्या घरावर चाल करून गेले होते. त्यामुळे प्रचंड मानसिक तणाव येऊन पाटील यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या नातलगांनी केला आहे.मुंब्रानजीकच्या वाकलन येथील शिवराम पाटील आणि त्यांची पत्नी दीपिका यांनी मुलगी अनुष्का हिच्यासह रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. वारसा हक्काने मिळालेल्या वडिलोपार्जित जागेत घर बांधण्याचा पाटील यांचा विचार होता. परंतु, यास त्यांचे इतर भाऊ तसेच त्यांचे कुटुंबीय विरोध करत होते. यावरून मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. परंतु, प्रत्येकवेळी इतर आप्तस्वकीयांच्या मध्यस्थीने वाद मिटवला जात होता. रविवारी सकाळी आणि संध्याकाळीदेखील त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर संध्याकाळी काही जण पाटील कुटुंबाला मारण्यासाठी त्यांच्या घरावर चाल करून गेल्याची माहिती दीपिकाचे मोठे बंधू श्रीनाथ केणे यांनी दिली. या प्रकारामुळे पाटील कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली होते. यातून त्यांनी आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेतली असावी, अशी शक्यता त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

>पाटील कुटुंबाने केले मरणोपरान्त नेत्रदान : जमिनीच्या वादामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणारे शिवराम आणि दीपिका पाटील तसेच त्यांची मुलगी अनुष्काचे शवविच्छेदन कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात करण्यात आले. तिघांचे मरणोपरान्त नेत्रदान करण्यात आल्याची माहिती दीपिकाच्या भावाने दिली.