शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

जिल्ह्यातील मराठी शाळांची पाटी कोरी; राष्ट्रीय पातळीवर मराठी माध्यमाच्या प्रकल्पाचा समावेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 02:29 IST

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आयोजिली जाते.

ठाणे : डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी राज्यस्तरीय परिषद नुकतीच पुण्यात पार पडली. एकूण ३० प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीसाठी निवड झाली असून यात ठाणे जिल्ह्यातील केवळ तीनच प्रकल्प निवडले गेले असून ते तीनही इंग्रजी माध्यमांचे आहेत. मुख्य म्हणजे जिल्ह्यातील एकाही मराठी माध्यमाच्या प्रकल्पाची निवड झालेली नसून गेल्या २७ वर्षांत प्रथमच असे घडल्याने ठाणे जिल्ह्यातील मराठीशाळांची पाटी कोरी राहिली आहे.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आयोजिली जाते. यंदाची ही २७ वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आहे. जिल्हास्तरीय फेरीतून ठाणे जिल्ह्यातील १६ प्रकल्प राज्यपातळीवर सादर केले गेले. ६ ते ८ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय परिषद पुण्यात बेल्हा येथे झाली. यात ठाण्यातील १२ प्रकल्प हे इंग्रजी, तर चार प्रकल्प मराठी माध्यमाचे होते. या परिषदेतून राष्ट्रीय पातळीसाठी ठाणे जिल्ह्यातील तीन प्रकल्पच निवडले गेले आहेत.

यापूर्वी राज्यातून ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकल्प राष्ट्रीय स्तरासाठी निवडले जायचे. यंदा तीन प्रकल्पच निवडले गेल्याने ठाण्याच्या शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातही निवडलेले तीन प्रकल्प हे इंग्रजी माध्यमातील आहेत. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे दोन, तर के.ई.एस. भगवती विद्यालयाचा एक असे तीन प्रकल्प आहेत. राष्ट्रीय पातळीसाठी ठाणे जिल्ह्यातील एकाही मराठी विज्ञान प्रकल्पाची निवड न होणे ही बाब मराठी शाळांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

यापूर्वी राष्ट्रीय पातळीसाठी निवड झालेल्या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकल्प तसेच त्यात मराठी माध्यमाच्या प्रकल्पांचा समावेश असायचा. मात्र, गेल्या २७ वर्षांत प्रथमच ठाण्यातील मराठी शाळा विज्ञान परिषदेत मागे पडल्या आहेत, अशी माहिती राज्य पातळीचे आयोजक जिज्ञासा ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.

इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी शाळांतील शिक्षक आणि पालकांची उदासीनता याला कारणीभूत आहे. मुलांमध्ये सहभागी होण्याचा उत्साह असतो, मात्र शिक्षक व पालकांमध्ये तो फारसा नसतो. हे विज्ञान प्रकल्प मुलांच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, परीक्षेसाठी नाही. त्यामुळे यात त्यांचा वेळ फुकट जातो, या हेतूने पालक मुलांना त्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देत नाही आणि शिक्षकही याचे महत्त्व पालकांना समजावून सांगत नाहीत. याचाच परिणाम मराठी माध्यमांच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर आणि निवडीवर झालेला आहे, असे मत दिघे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळा