शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मराठी शाळांची पाटी कोरी; राष्ट्रीय पातळीवर मराठी माध्यमाच्या प्रकल्पाचा समावेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 02:29 IST

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आयोजिली जाते.

ठाणे : डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी राज्यस्तरीय परिषद नुकतीच पुण्यात पार पडली. एकूण ३० प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीसाठी निवड झाली असून यात ठाणे जिल्ह्यातील केवळ तीनच प्रकल्प निवडले गेले असून ते तीनही इंग्रजी माध्यमांचे आहेत. मुख्य म्हणजे जिल्ह्यातील एकाही मराठी माध्यमाच्या प्रकल्पाची निवड झालेली नसून गेल्या २७ वर्षांत प्रथमच असे घडल्याने ठाणे जिल्ह्यातील मराठीशाळांची पाटी कोरी राहिली आहे.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आयोजिली जाते. यंदाची ही २७ वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आहे. जिल्हास्तरीय फेरीतून ठाणे जिल्ह्यातील १६ प्रकल्प राज्यपातळीवर सादर केले गेले. ६ ते ८ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय परिषद पुण्यात बेल्हा येथे झाली. यात ठाण्यातील १२ प्रकल्प हे इंग्रजी, तर चार प्रकल्प मराठी माध्यमाचे होते. या परिषदेतून राष्ट्रीय पातळीसाठी ठाणे जिल्ह्यातील तीन प्रकल्पच निवडले गेले आहेत.

यापूर्वी राज्यातून ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकल्प राष्ट्रीय स्तरासाठी निवडले जायचे. यंदा तीन प्रकल्पच निवडले गेल्याने ठाण्याच्या शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातही निवडलेले तीन प्रकल्प हे इंग्रजी माध्यमातील आहेत. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे दोन, तर के.ई.एस. भगवती विद्यालयाचा एक असे तीन प्रकल्प आहेत. राष्ट्रीय पातळीसाठी ठाणे जिल्ह्यातील एकाही मराठी विज्ञान प्रकल्पाची निवड न होणे ही बाब मराठी शाळांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

यापूर्वी राष्ट्रीय पातळीसाठी निवड झालेल्या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकल्प तसेच त्यात मराठी माध्यमाच्या प्रकल्पांचा समावेश असायचा. मात्र, गेल्या २७ वर्षांत प्रथमच ठाण्यातील मराठी शाळा विज्ञान परिषदेत मागे पडल्या आहेत, अशी माहिती राज्य पातळीचे आयोजक जिज्ञासा ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.

इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी शाळांतील शिक्षक आणि पालकांची उदासीनता याला कारणीभूत आहे. मुलांमध्ये सहभागी होण्याचा उत्साह असतो, मात्र शिक्षक व पालकांमध्ये तो फारसा नसतो. हे विज्ञान प्रकल्प मुलांच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, परीक्षेसाठी नाही. त्यामुळे यात त्यांचा वेळ फुकट जातो, या हेतूने पालक मुलांना त्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देत नाही आणि शिक्षकही याचे महत्त्व पालकांना समजावून सांगत नाहीत. याचाच परिणाम मराठी माध्यमांच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर आणि निवडीवर झालेला आहे, असे मत दिघे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळा