शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

जिल्ह्यातील मराठी शाळांची पाटी कोरी; राष्ट्रीय पातळीवर मराठी माध्यमाच्या प्रकल्पाचा समावेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 02:29 IST

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आयोजिली जाते.

ठाणे : डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी राज्यस्तरीय परिषद नुकतीच पुण्यात पार पडली. एकूण ३० प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीसाठी निवड झाली असून यात ठाणे जिल्ह्यातील केवळ तीनच प्रकल्प निवडले गेले असून ते तीनही इंग्रजी माध्यमांचे आहेत. मुख्य म्हणजे जिल्ह्यातील एकाही मराठी माध्यमाच्या प्रकल्पाची निवड झालेली नसून गेल्या २७ वर्षांत प्रथमच असे घडल्याने ठाणे जिल्ह्यातील मराठीशाळांची पाटी कोरी राहिली आहे.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आयोजिली जाते. यंदाची ही २७ वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आहे. जिल्हास्तरीय फेरीतून ठाणे जिल्ह्यातील १६ प्रकल्प राज्यपातळीवर सादर केले गेले. ६ ते ८ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय परिषद पुण्यात बेल्हा येथे झाली. यात ठाण्यातील १२ प्रकल्प हे इंग्रजी, तर चार प्रकल्प मराठी माध्यमाचे होते. या परिषदेतून राष्ट्रीय पातळीसाठी ठाणे जिल्ह्यातील तीन प्रकल्पच निवडले गेले आहेत.

यापूर्वी राज्यातून ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकल्प राष्ट्रीय स्तरासाठी निवडले जायचे. यंदा तीन प्रकल्पच निवडले गेल्याने ठाण्याच्या शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातही निवडलेले तीन प्रकल्प हे इंग्रजी माध्यमातील आहेत. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे दोन, तर के.ई.एस. भगवती विद्यालयाचा एक असे तीन प्रकल्प आहेत. राष्ट्रीय पातळीसाठी ठाणे जिल्ह्यातील एकाही मराठी विज्ञान प्रकल्पाची निवड न होणे ही बाब मराठी शाळांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

यापूर्वी राष्ट्रीय पातळीसाठी निवड झालेल्या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकल्प तसेच त्यात मराठी माध्यमाच्या प्रकल्पांचा समावेश असायचा. मात्र, गेल्या २७ वर्षांत प्रथमच ठाण्यातील मराठी शाळा विज्ञान परिषदेत मागे पडल्या आहेत, अशी माहिती राज्य पातळीचे आयोजक जिज्ञासा ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.

इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी शाळांतील शिक्षक आणि पालकांची उदासीनता याला कारणीभूत आहे. मुलांमध्ये सहभागी होण्याचा उत्साह असतो, मात्र शिक्षक व पालकांमध्ये तो फारसा नसतो. हे विज्ञान प्रकल्प मुलांच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, परीक्षेसाठी नाही. त्यामुळे यात त्यांचा वेळ फुकट जातो, या हेतूने पालक मुलांना त्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देत नाही आणि शिक्षकही याचे महत्त्व पालकांना समजावून सांगत नाहीत. याचाच परिणाम मराठी माध्यमांच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर आणि निवडीवर झालेला आहे, असे मत दिघे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळा