शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना नव्हे, पालकांना हवी वॉटरबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 00:13 IST

आधी शाळेतील स्वच्छतागृहाकडे लक्ष द्या, शिक्षणतज्ज्ञांनी दिला सल्ला

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेत तीन वेळा वॉटरबेल वाजविण्याचे परिपत्रक शासनाने मंगळवारी काढले. मात्र, याबाबत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी पालकांना वॉटरबेल ही गरजेची वाटत असल्याच्या प्रतिक्रिया ठाण्यातून उमटत आहेत. तर, शिक्षणतज्ज्ञांनी मात्र वॉटरबेल गरजेची असली, तरी शाळेतील स्वच्छतागृहांकडे आधी लक्ष द्यावे. कारण, तिचे थेट कनेक्शन स्वच्छतागृहाशी जोडले जात असल्याचे म्हटले आहे.शाळेत आधीच दोन छोट्या सुट्या आणि मधली सुटी असल्याने तसेच प्रत्येक तासिकेनंतर पाणी पिण्याची विद्यार्थ्यांना मुभा असल्याने वॉटरबेलची गरज नाही, असे मत शाळेने व्यक्त केले आहे, तर मुलांना शाळेपासूनच पाणी पिण्याची सवय लागल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहील, असे पालकांचे म्हणणे आहे.केरळमधील एका शाळेत सगळ्यात आधी वॉटरबेलच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या धर्तीवर पुणे, दिल्ली, बंगळुरू येथेही हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत आवश्यक तेवढे पाणी प्यावे आणि त्यासाठी त्याची आठवण व्हावी, यासाठी तीन वेळा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाण्याची वॉटरबेल वाजविण्यात येणार आहे. परंतु, या वॉटरबेलला शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक यांनी गरज नसल्याचे सांगितले आहे. मात्र, ही खरोखर गरज असल्याचे पालकांचे मत आहे.वॉटरबेल या संकल्पनेची सुरुवात खरेतर केरळमधून झाली. मुलांनी दोन लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. शाळेत ते सहा तास असतात. त्यात त्यांनी किमान अर्धा लीटर तरी पाणी पिणे गरजेचे आहे. परंतु, प्रश्न असा की, बेल वाजवून मुले पाणी पितील का? शाळेतले पाणी पिण्यालायक आहे की नाही, याची खात्री विद्यार्थ्यांना नसते. खासकरून, मुली तर पाणी प्यायला दुर्लक्ष करतात. कारण, त्यांना बाथरूमला जावे लागते. त्यात शाळेतले स्वच्छतागृह चांगले नसल्याने तेथे जाण्यास टाळाटाळ करतात. पाण्याची बेल वाजवून उपयोग नाही, त्याचे थेट कनेक्शन हे स्वच्छतागृहाशी निगडित आहे. शासनाने दिलेले आदेश योग्य असले, तरी वॉटरबेल हा अर्धा भाग आहे. खरा मुख्य भाग हा स्वच्छतागृह आहे.- सुरेंद्र दिघे,शिक्षणतज्ज्ञहल्ली जे आजार वाढलेत, त्याला कमी प्रमाणात पाणी पिणे हे कारणीभूत आहे. लहानपणापासून मुलांना पाणी पिण्याची सवय लावली, तर त्यांच्या शरीराची चांगली जडणघडण होईल. परंतु, वॉटरबेल वाजल्यावर पाणी पिणे, ही जबाबदारी शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांची जास्त आहे.- किरण नाकती, संचालक,माझी शाळा उपक्रमविद्यार्थ्यांना मधल्या सुटीबरोबर १० मिनिटांच्या दोन छोट्या सुट्या असतात. त्यात ते पाणी पिऊ शकतात, बाथरूमलाही जाऊ शकतात. त्यामुळे वेगळ्या वॉटरबेलची गरज नाही. उलट, मुलांनी पाणी का प्यावे, याविषयी जागृती झाली तर वॉटरबेलची गरज लागणार नाही. वॉटरबेलची सवय लावण्यापेक्षा मुलांना पाणी का प्यावे, याचे महत्त्व पटवून द्यावे.- नूतन बांदेकर,शिक्षिका, ठामपावॉटरबेल म्हणजे जबरदस्तीने पाणी पाजल्यासारखे होते. मुलांना जेव्हा तहान लागते, तेव्हा ते पाणी पितात. तीन तासिकेनंतर पाणी पिण्यासाठी आणि बाथरूमला जाण्यासाठी १० मिनिटांच्या दोन छोट्या सुट्या आणि डबा खाण्यासाठी २५ मिनिटांची सुटी दिली जाते. मुलांच्या दप्तरातच पाण्याची बॉटल असल्याने तास संपल्यावर ते पाणी पितात. त्यामुळे वॉटरबेलचीगरज नाही.- प्रकाश पांचाळ, मुख्याध्यापक,डॉ. बेडेकर विद्यामंदिरवॉटरबेलची गरज नाही, कारण मुलांकडे पाण्याची बॉटल असते. एक तासिका संपल्यावर दुसरी तासिका सुरू होईपर्यंत त्या तीनचार मिनिटांच्या कालावधीत मुले पाणी पिऊ शकतात. खरेतर, पाणी पिण्याची सवय पालकांनीच लावायला हवी. वॉटरबेलमुळे संपूर्ण शाळा डिस्टर्ब होईल, त्यामुळे याची गरज वाटत नाही.- चंद्रकांत घोडके, मुख्याध्यापक, शिवसमर्थ विद्यालयविद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वॉटरबेल हा चांगला प्रयोग राबवला जात आहे. हल्लीची मुले जंकफूड जास्त खातात. याचा परिणाम त्यांच्या तारुण्यातील फिटनेसवर होतो. मानसशास्त्रानुसार एखादी सवय रुळायला २१ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ही सवय शाळेपासूनच लावली तर त्यांचे आरोग्य चांगले राहील. मुले शालेत पाणी पितात, घरी नाही, असे व्हायला नको. उन्हाळ्यात पालकांनी याकडे जास्त लक्ष द्यावे.- सीमा शेख देसाई, पालक, ठाणे

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र