शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिक्षकांना नव्हे, पालकांना हवी वॉटरबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 00:13 IST

आधी शाळेतील स्वच्छतागृहाकडे लक्ष द्या, शिक्षणतज्ज्ञांनी दिला सल्ला

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेत तीन वेळा वॉटरबेल वाजविण्याचे परिपत्रक शासनाने मंगळवारी काढले. मात्र, याबाबत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी पालकांना वॉटरबेल ही गरजेची वाटत असल्याच्या प्रतिक्रिया ठाण्यातून उमटत आहेत. तर, शिक्षणतज्ज्ञांनी मात्र वॉटरबेल गरजेची असली, तरी शाळेतील स्वच्छतागृहांकडे आधी लक्ष द्यावे. कारण, तिचे थेट कनेक्शन स्वच्छतागृहाशी जोडले जात असल्याचे म्हटले आहे.शाळेत आधीच दोन छोट्या सुट्या आणि मधली सुटी असल्याने तसेच प्रत्येक तासिकेनंतर पाणी पिण्याची विद्यार्थ्यांना मुभा असल्याने वॉटरबेलची गरज नाही, असे मत शाळेने व्यक्त केले आहे, तर मुलांना शाळेपासूनच पाणी पिण्याची सवय लागल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहील, असे पालकांचे म्हणणे आहे.केरळमधील एका शाळेत सगळ्यात आधी वॉटरबेलच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या धर्तीवर पुणे, दिल्ली, बंगळुरू येथेही हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत आवश्यक तेवढे पाणी प्यावे आणि त्यासाठी त्याची आठवण व्हावी, यासाठी तीन वेळा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाण्याची वॉटरबेल वाजविण्यात येणार आहे. परंतु, या वॉटरबेलला शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक यांनी गरज नसल्याचे सांगितले आहे. मात्र, ही खरोखर गरज असल्याचे पालकांचे मत आहे.वॉटरबेल या संकल्पनेची सुरुवात खरेतर केरळमधून झाली. मुलांनी दोन लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. शाळेत ते सहा तास असतात. त्यात त्यांनी किमान अर्धा लीटर तरी पाणी पिणे गरजेचे आहे. परंतु, प्रश्न असा की, बेल वाजवून मुले पाणी पितील का? शाळेतले पाणी पिण्यालायक आहे की नाही, याची खात्री विद्यार्थ्यांना नसते. खासकरून, मुली तर पाणी प्यायला दुर्लक्ष करतात. कारण, त्यांना बाथरूमला जावे लागते. त्यात शाळेतले स्वच्छतागृह चांगले नसल्याने तेथे जाण्यास टाळाटाळ करतात. पाण्याची बेल वाजवून उपयोग नाही, त्याचे थेट कनेक्शन हे स्वच्छतागृहाशी निगडित आहे. शासनाने दिलेले आदेश योग्य असले, तरी वॉटरबेल हा अर्धा भाग आहे. खरा मुख्य भाग हा स्वच्छतागृह आहे.- सुरेंद्र दिघे,शिक्षणतज्ज्ञहल्ली जे आजार वाढलेत, त्याला कमी प्रमाणात पाणी पिणे हे कारणीभूत आहे. लहानपणापासून मुलांना पाणी पिण्याची सवय लावली, तर त्यांच्या शरीराची चांगली जडणघडण होईल. परंतु, वॉटरबेल वाजल्यावर पाणी पिणे, ही जबाबदारी शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांची जास्त आहे.- किरण नाकती, संचालक,माझी शाळा उपक्रमविद्यार्थ्यांना मधल्या सुटीबरोबर १० मिनिटांच्या दोन छोट्या सुट्या असतात. त्यात ते पाणी पिऊ शकतात, बाथरूमलाही जाऊ शकतात. त्यामुळे वेगळ्या वॉटरबेलची गरज नाही. उलट, मुलांनी पाणी का प्यावे, याविषयी जागृती झाली तर वॉटरबेलची गरज लागणार नाही. वॉटरबेलची सवय लावण्यापेक्षा मुलांना पाणी का प्यावे, याचे महत्त्व पटवून द्यावे.- नूतन बांदेकर,शिक्षिका, ठामपावॉटरबेल म्हणजे जबरदस्तीने पाणी पाजल्यासारखे होते. मुलांना जेव्हा तहान लागते, तेव्हा ते पाणी पितात. तीन तासिकेनंतर पाणी पिण्यासाठी आणि बाथरूमला जाण्यासाठी १० मिनिटांच्या दोन छोट्या सुट्या आणि डबा खाण्यासाठी २५ मिनिटांची सुटी दिली जाते. मुलांच्या दप्तरातच पाण्याची बॉटल असल्याने तास संपल्यावर ते पाणी पितात. त्यामुळे वॉटरबेलचीगरज नाही.- प्रकाश पांचाळ, मुख्याध्यापक,डॉ. बेडेकर विद्यामंदिरवॉटरबेलची गरज नाही, कारण मुलांकडे पाण्याची बॉटल असते. एक तासिका संपल्यावर दुसरी तासिका सुरू होईपर्यंत त्या तीनचार मिनिटांच्या कालावधीत मुले पाणी पिऊ शकतात. खरेतर, पाणी पिण्याची सवय पालकांनीच लावायला हवी. वॉटरबेलमुळे संपूर्ण शाळा डिस्टर्ब होईल, त्यामुळे याची गरज वाटत नाही.- चंद्रकांत घोडके, मुख्याध्यापक, शिवसमर्थ विद्यालयविद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वॉटरबेल हा चांगला प्रयोग राबवला जात आहे. हल्लीची मुले जंकफूड जास्त खातात. याचा परिणाम त्यांच्या तारुण्यातील फिटनेसवर होतो. मानसशास्त्रानुसार एखादी सवय रुळायला २१ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ही सवय शाळेपासूनच लावली तर त्यांचे आरोग्य चांगले राहील. मुले शालेत पाणी पितात, घरी नाही, असे व्हायला नको. उन्हाळ्यात पालकांनी याकडे जास्त लक्ष द्यावे.- सीमा शेख देसाई, पालक, ठाणे

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र