शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

खाजगी शाळांच्या मनमानी फी वसूली विरुद्ध पालक उतरले रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 19:50 IST

 मीरा भाईंदर मधील पालकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे

मीरारोड - कोरोना संसर्गा मुळे आधीच आमच्या नोकऱ्या - व्यवसाय बंद असल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे . शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिकवण्याच्या आड पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापना कडून गलेलठ्ठ फी साठी तगादा लावून आमच्या मुलांना व आम्हाला वेठीस धरून छळ केला जात आहे . येथील लोकप्रतिनिधी - अधिकारी यांना सांगून देखील न्याय मिळत नसल्याने आता तुम्हीच शेवटचा आधार आहेत असे साकडे मीरा भाईंदर मधील पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे . 

मीरा भाईंदर मधील विविध मोठ्या खाजगी शाळांच्या पालकांनी आज सोमवरो शाळांच्या बाहेर जमून आपला संताप व्यक्त केला . कोरोना संकटा मुळे आमच्या नोकऱ्या गेल्या , व्यवसाय ठप्प झाला आहे . आमची अक्षरशः होरपळ चालली आहे . या आधी आम्ही या शाळांनी मागितल्या तेवढ्या लाख लाख रुपयांच्या फी भरल्या आहेत . पण आता फी भरणे अशक्य झालेले आहे . शाळांनी तर लेट फी सुद्धा आकारली आहे . 

आम्हा पालकांना विविध प्रकारे घाबरवले जातेय . ज्यांनी फी भरली त्यांच्या साठी ऑनलाईन वर्ग सुरु केले . परीक्षा घेतल्या जात आहेत . ज्यांना फी भरता आली नाही त्यांच्या मुलांना ओलनलाईन शिक्षण नाही व परीक्षा देखील नाही . दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील फी न भरल्याने अभ्यास बंद केला आहे . काही शाळा तर पालकां कडून हमीपत्र लिहून घेत आहेत . काही शाळा तर अजूनही कॅंटीन फी , मिसलेनियस शुल्क अजूनही आकारत आहेत . ज्या पालकांनी फी कमी करा म्हणून शाळांना ईमेल केला त्यांना शाळेच्या वकीला मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहे . 

शाळांनी त्यांचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे . ऑनलाईन शिकण्यासाठी आमची मुलं घरातूनच अभ्यास करणार व त्यांचा त्यासाठी लागणारा सर्व खर्च देखील पालकच करणार आहेत . शाळा बंद आहेत पण तरी देखील शाळेचे व्यवस्थापन मात्र संपूर्ण वर्षाची आणि पूर्वी प्रमाणेच फी भरण्याचा तगादा लावत आहे . 

आम्ही स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , महापौर ज्योत्स्ना हसनाळे , शिक्षणअधिकारी उर्मिला पारधी , पालिका आयुक्त व अधिकारी आदीं कडे तक्रारी केल्या , गाऱ्हाणी मांडली . पण कोणी दाद दिली नाही . पारधी यांनी तर तुम्ही आणि तुमची शाळा काय ते बघून घ्या असे सांगून उत्तर दिले . 

अश्या बिकट परिस्थिती मध्ये आता मुख्यमंत्री तुमचाच शेवटचा आधार आहे . आम्हाला व आमच्या मुलांना वाचवा . त्यांना शिक्षणा पासून वंचित होऊ देऊ नका असे साकडे या पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे . शाळांची सरसकट ५० टक्के फी कमी करा . फी भरली नाही म्हणून मुलांचे शिक्षण थांबवू नका अशी विनंती पालकांनी केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरSchoolशाळा