शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिलांचे ‘संकल्पपत्र’ घेण्यास मनाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या आईवडिलांना मतदानाची जाणीव करून देण्यात आली.

- सुरेश लोखंडे ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या आईवडिलांना मतदानाची जाणीव करून देण्यात आली. ‘मतदान करणारच’ असे त्यांचे ‘संकल्पपत्र’ स्वाक्षरीसह भरून घेण्यात आले. परंतु, त्यापासून आचारसंहितेचा भंग होत असल्याची जाणीव होताच निवडणूक यंत्रणेने ते पत्र भरून घेण्यास आता मनाई केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकवर्गद्विधा मन:स्थितीत दिसून येत आहे.मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्यापैकी एक ‘संकल्पपत्र’ हा उपक्रम आहे. जिल्ह्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून मतदार आईवडिलांना संकल्पपत्र दिले जात आहे. त्याद्वारे शिक्षण देत असल्याचे आभार मानण्यासह देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी आपल्या कुटुंबातील १८ वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदान अवश्य करावे, असा संकल्प करण्याची विनंती या विद्यार्थ्यांकडून आईवडिलांना करण्यात आली. या पत्रास उत्तर म्हणून या लोकसभा निवडणुकीत मी अवश्य मतदान करेन आणि माझ्या परिचितांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करेन, असे पालकांचे ‘संकल्पपत्र’ नाव, पत्ता व स्वाक्षरीसह शाळेत जमा करावे लागले. जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हे संकल्पपत्र शाळेत जमा केले आहे. काही विद्यार्थ्यांनी ते अद्याप शाळेत दिले नाही.परंतु, आता विद्यार्थ्यांच्या या संकल्पपत्रास मनाई करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याची जाणीव निवडणूक यंत्रणेस झाली आणि विद्यार्थ्यांकडून मतदानासाठीचे ‘संकल्पपत्र’ घेण्यात येऊ नये, असे जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदींना भ्रमणध्वनीद्वारे शिक्षण विभागाने कळवले आहे.>तोंडी आदेशामुळे संभ्रमनिवडणुकीच्या या काळात तोंडी आदेशास स्थान नसल्यामुळे शिक्षकवर्ग गोंधळात सापडला आहे. जिल्ह्याच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘संकल्पपत्र’ घेऊ नये, असे दूरध्वनीद्वारे कळवल्याचे मेसेज शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व शिक्षक यांना कळवले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांकडून ‘संकल्पपत्र’ घेण्याचे थांबवून विद्यार्थ्यांद्वारे परिवारातील मतदान जनजागृतीला रोख लागला आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे