शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पंढरपूर खून प्रकरण: संदीपच्या हत्येतून त्यांनी काढला विनायकच्या खुनाचा वचपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 21:31 IST

ठाण्यात लुटीसाठी आलेल्या टोळीला पकडल्यानंतर पंढरपूरातील नगरसेवचाच्या खूनाचा छडा लावण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. विनायक कांबळे याच्या खुनाचा वचपा काढल्याची कबुली या टोळीने दिली आहे.

ठळक मुद्देपैसे संपल्यानेच केली दरोड्याची तयारीदोघेजण झाले पसारचौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे : पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खूनातून विनायक कांबळे या आपल्या साथीदाराच्या खुनाचा वचपा काढल्याची कबुलीच अक्षय उर्फ बबलू सुरवसे आणि त्याच्या साथीदारांनी ठाणे पोलिसांना दिली आहे. या चौघांनाही सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ऐन पाडव्याच्या दिवशीच पंढरपूरमध्ये दिवसाढवळया नगरसेवक पवार यांच्यावर गोळी झाडून सहा जणांचे हे टोळके पसार झाले होते. त्यांच्याकडील पैसे संपल्यामुळे ठाण्यातील माजीवडा येथील पेट्रोलपंप लुटून जे पैसे मिळतील ते घेऊन घोडबंदरमार्गे पसार होण्याची त्यांची योजना होती. एक टोळके पेट्रोल पंप लुटीसाठी ठाण्यात येणार असल्याची टीप खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याच आधारे दोन पिस्टलसह १९ मार्च रोजी ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातून अक्षय सुरवसे (२२), पुंडलिक वनारे (३३), मनोज शिरसीकर (३२) आणि भक्तराज धुमाळ (२६, सर्व रा. पंढरपूर) या चौघांना अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, निरीक्षक शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास घोडके, उपनिरीक्षक विकास बाबर, अविनाश महाजन, विकास कुटे, एच. ए. ढोले आदींच्या पथकाने अटक केली. अधिक चौकशीमध्ये त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तुलसह मिरचीची पूड, नॉयलॉनची दोरी अशी दरोडयाची सामुग्री जप्त केली आहे. टोळीयुद्धातून नगरसेवक पवार यांच्यावर पाच गोळया झाडून खून केल्याची त्यांनी कबुली दिली. खूनानंतरही या टोळीने त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला होता. त्यांचे अन्य दोन साथीदार संदीप आधटराव आणि विकास उर्फ विकी मोरे हे मात्र पसार झाले आहेत. ठाण्यातून ही टोळी गुजरातला पसार होण्याच्या मार्गावर होती, तत्पूर्वीच ठाणे पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून अटक केली.खुनाचा वचपा काढला...नगरसेवक संदीप पवार आणि अक्षय उर्फ बबलू सुरवसे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वैमनस्य आहे. अक्षयवर पवार यांच्या टोळीकडून काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. याशिवाय, अक्षयच्या टोळीतील विनायक कांबळे याचा पाच वर्षांपूर्वी खून झाला होता. हा खून संदीपच्या टोळीनेच केल्याचा अक्षयच्या टोळीचा आरोप होता. याच संशयातून आता त्याचाही खून करून या टोळीने वचपा काढल्याची माहिती तपासामध्ये समोर येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMurderखूनCrimeगुन्हा