शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पंढरपूर खून प्रकरण: संदीपच्या हत्येतून त्यांनी काढला विनायकच्या खुनाचा वचपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 21:31 IST

ठाण्यात लुटीसाठी आलेल्या टोळीला पकडल्यानंतर पंढरपूरातील नगरसेवचाच्या खूनाचा छडा लावण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. विनायक कांबळे याच्या खुनाचा वचपा काढल्याची कबुली या टोळीने दिली आहे.

ठळक मुद्देपैसे संपल्यानेच केली दरोड्याची तयारीदोघेजण झाले पसारचौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे : पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खूनातून विनायक कांबळे या आपल्या साथीदाराच्या खुनाचा वचपा काढल्याची कबुलीच अक्षय उर्फ बबलू सुरवसे आणि त्याच्या साथीदारांनी ठाणे पोलिसांना दिली आहे. या चौघांनाही सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ऐन पाडव्याच्या दिवशीच पंढरपूरमध्ये दिवसाढवळया नगरसेवक पवार यांच्यावर गोळी झाडून सहा जणांचे हे टोळके पसार झाले होते. त्यांच्याकडील पैसे संपल्यामुळे ठाण्यातील माजीवडा येथील पेट्रोलपंप लुटून जे पैसे मिळतील ते घेऊन घोडबंदरमार्गे पसार होण्याची त्यांची योजना होती. एक टोळके पेट्रोल पंप लुटीसाठी ठाण्यात येणार असल्याची टीप खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याच आधारे दोन पिस्टलसह १९ मार्च रोजी ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातून अक्षय सुरवसे (२२), पुंडलिक वनारे (३३), मनोज शिरसीकर (३२) आणि भक्तराज धुमाळ (२६, सर्व रा. पंढरपूर) या चौघांना अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, निरीक्षक शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास घोडके, उपनिरीक्षक विकास बाबर, अविनाश महाजन, विकास कुटे, एच. ए. ढोले आदींच्या पथकाने अटक केली. अधिक चौकशीमध्ये त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तुलसह मिरचीची पूड, नॉयलॉनची दोरी अशी दरोडयाची सामुग्री जप्त केली आहे. टोळीयुद्धातून नगरसेवक पवार यांच्यावर पाच गोळया झाडून खून केल्याची त्यांनी कबुली दिली. खूनानंतरही या टोळीने त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला होता. त्यांचे अन्य दोन साथीदार संदीप आधटराव आणि विकास उर्फ विकी मोरे हे मात्र पसार झाले आहेत. ठाण्यातून ही टोळी गुजरातला पसार होण्याच्या मार्गावर होती, तत्पूर्वीच ठाणे पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून अटक केली.खुनाचा वचपा काढला...नगरसेवक संदीप पवार आणि अक्षय उर्फ बबलू सुरवसे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वैमनस्य आहे. अक्षयवर पवार यांच्या टोळीकडून काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. याशिवाय, अक्षयच्या टोळीतील विनायक कांबळे याचा पाच वर्षांपूर्वी खून झाला होता. हा खून संदीपच्या टोळीनेच केल्याचा अक्षयच्या टोळीचा आरोप होता. याच संशयातून आता त्याचाही खून करून या टोळीने वचपा काढल्याची माहिती तपासामध्ये समोर येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMurderखूनCrimeगुन्हा