शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

पालघरचे आठवडाबाजार सात महिन्यांनी आले रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 12:14 AM

पालघर : कोरोना महामारीच्या काळात मागील ७ महिन्यांपासून बंद असलेले पालघर जिल्ह्यातील आठवडा बाजार ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. नोकऱ्या ...

पालघर : कोरोना महामारीच्या काळात मागील ७ महिन्यांपासून बंद असलेले पालघर जिल्ह्यातील आठवडा बाजार ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. नोकऱ्या गमावून बसलेल्या आणि व्यवसायही ठप्प पडल्याच्या अवस्थेत सध्या हे आठवडा बाजार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत.

जिल्ह्यात पालघर, विक्रमगड, तलासरी, वाडा, वसई आदी तालुक्यातील अनेक गावांत आठवडा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला मदत करणारी ठरणारी होती. कपडे, मासे, मसाले, शोभिवंत वस्तू आदी साहित्याच्या विक्रीची मोठी उलाढाल या बाजारपेठेतून होत होती. परंतु मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न पुढे येऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने १४ ऑक्टोबरपासून हे आठवडा बाजार काही शर्ती अटीवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु हाताला काम नाही आणि व्यवसाय नसल्याने प्रथम आठवडा बाजारात गर्दीच दिसत नव्हती.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात शासकीय कर्मचारी व औद्योगिक वसाहतीमधील जवळपास ५० टक्के कारखाने ३५ ते ४० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झाले. या सर्वांचे पगार व दिवाळी बोनस आणि ॲडव्हान्समुळे पालघर जिल्ह्याच्या ठिकाणच्या बाजारात खरेदीसाठी लाख-दीड लाख लोक सकाळी आठ वाजल्यापासून आल्याने साथ आठ महिन्यांनंतर प्रथमच प्रचंड गर्दी झाली होती. केवळ आठवडा बाजारात साधारण तीन ते चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर पुढील बाजार १३ नोव्हेंबर रोजी असल्याने त्या वेळी औधोगिक क्षेत्रातील कामगारांचा पगार झालेला असेल. त्यामुळे याहीपेक्षा बाजारात अधिक गर्दी उसळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :palgharपालघर