शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पालघरच्या श्री राम संघाने मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाचा ३२-३०ने केला पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2023 13:25 IST

महिला गटातील दुसऱ्या सामन्यात वसईच्या ऋषी वाल्मिकी महिला संघाने मुंबई शहरच्या अमर हिंद महिला मंडळ संघाचा ३३-३१ असा २ गुणांनी पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

- विशाल हळदे

ठाणे- श्री मावळी मंडळ आयोजित ९८ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७० व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटात श्री राम कबड्डी संघ पालघर, शुर संभाजी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, जय भवानी तरुण मंडळ मुंबई उपनगर, जय हनुमान स्पोर्ट्स क्लब ठाणे या संघानी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर, महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर, नवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, ऋषी वाल्मिकी महिला संघ वसई, श्री राम पालघर या संघानी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

महिला गटाच्या अतिशय अटीतटीच्या सामन्यात पालघरच्या श्री राम संघाने मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाचा ३२-३०असा २ गुणांनी पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यांतराला स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाने १९-१०अशी  ९ गुणांची भक्कम आघाडी घेतली ती यशिका पुजारीच्या उत्कुष्ट लढायांमुळे व तिला नेहा पांडव हिने पक्कडीत सुंदर साथ दिली. परंतु मध्यन्तरानंतर श्री राम संघाच्या ऐश्वर्या धवन हिने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या  वाढवली. तिला श्रुती सोमासेने पक्कडीत चांगली साथ दिली व आपल्या संघाचा विजय खेचून आणला.

महिला गटातील दुसऱ्या सामन्यात वसईच्या ऋषी वाल्मिकी महिला संघाने मुंबई शहरच्या अमर हिंद महिला मंडळ संघाचा ३३-३१ असा २ गुणांनी पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यन्तराला ऋषी वाल्मिकी महिला संघाकडे १३-११ अशी २ गुणांची नाममात्र आघाडी होती. परंतु मध्यन्तरानंतरही हर्षा व दिव्या रेडकर यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची २ गुणांची आघाडी शेवटपर्यंत राखली. पराभूत संघाकडून श्रद्धा कदम एकाकी लढली.

पुरुष गटातील पहिल्या सामन्यात मुंबई उपनगरच्या वीर परशूराम कबड्डी संघाने उल्हासनगरच्या श्री साई क्रीडा मंडळ संघाचा ३१-२७ असा ४ गुणांनी पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यन्तराला वीर परशूराम कबड्डी संघाने  १५-०९ अशी ६ गुणांची  घेतली ती आदर्श चौरासियाच्या ४खोलवर चढाया व आदेश सावंतच्या बहारदार पक्कडीमुळे. उत्तरार्धात श्री साई क्रीडा मंडळ संघाच्या संदीप यादव याने अष्टपैलू खेळ करीत आपल्या संघासाठी गुण मिळवले. परंतु तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही.

पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या विजय स्पोर्ट्स काल्हेर संघाने मुंबई उपनगरच्या मुलुंड क्रीडा केंद्र संघाचा अतिशय रोमहर्षक सामन्यात ३८-३२ असा ६ गुणांनी पराभव केला. सदर सामन्यात मध्यन्तराला विजय स्पोर्ट्स काल्हेर संघाकडे १७-१६ अशी नाममात्र १ गुणांची आघाडी होती. सामना हा अनेक वेळा समसमान गुणांवरच होता. सामना संपायला शेवटची दोन मिनिटे शिल्लक असतानासुद्धा हा सामना ३१-३१ अशा समसमान गुणांवरच होता. परंतु   विजय स्पोर्ट्स काल्हेर संघाच्या अक्षय पाटीलने एकाच चढाईत ३ गुण मिळवत आपल्या संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. पराभूत संघाकडून योगेश गौरव एकाकी लढला.  

टॅग्स :thaneठाणे