शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

‘सेना-भाजपामुळे पालघरचा विकास मृत्युपंथाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:12 IST

राज्याचे मुख्यमंत्री हे निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे राजकीय रूप आहे.

पालघर : चार वर्षांत विकासाची कोणतीही कामे केली नाहीत त्यामुळेच मृत व्यक्तींचा वापर करण्याची वेळ भाजपा आणि शिवसेनेवर आली आहे. एकीकडे पालघर जिल्ह्याचा विकास हा सत्ताधाऱ्यांमुळे मरणासन्न अवस्थेत असून दुसरीकडे भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष ऊर बडवून मतांचा जोगवा मागत आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, समृद्धी महामार्ग व नाणारच्या शेतकºयांना फसवल्यानंतर आता यांचा डोळा इथल्या लोकांच्या जमिनीवर आहे. ही निवडणूक साधू विरुद्ध संधीसाधू, निष्ठावंत विरुद्ध गद्दार, नीती विरुद्ध अनीती आणि सत्य विरुद्ध असत्य अशी आहे. पालघरवासीय भाजपा, शिवसेना व बहुजन विकास आघाडी या तिन्ही सत्ताधाºयांचा आणि दलबदलूंचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही आणि जनसेवेचे व्रत घेतलेल्या दामू शिंगडा यांना विजयी करतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवली, भिवंडी, पेण या ठिकाणी वाँटेड आहेत. कल्याण-डोंबिवलीकर आमचे साडेसहा हजार कोटी कुठे गेले? आणि पेणवासीय पेण अर्बन बँकेकडे तारण असलेल्या जमिनी सिडको कधी विकत घेणार, याकरिता मुख्यमंत्र्यांचा शोध घेत असल्याचे सावंत म्हणाले.मुख्यमंत्री निरव मोदी व विजय मल्ल्याचे राजकीय अवतारराज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करताना सावंत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे राजकीय रूप आहे. मोदी, मल्ल्या या मंडळींनी ज्याप्रमाणे आमिषे दाखवून बँकांचे पैसे लुबाडून पोबारा केला, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री निवडणूक आली की आश्वासनांची खैरात करून सर्वसामान्यांची मते लुबाडून त्यांची फसवणूक करून पोबारा करतात.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018BJPभाजपा