शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सेना-भाजपामुळे पालघरचा विकास मृत्युपंथाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:12 IST

राज्याचे मुख्यमंत्री हे निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे राजकीय रूप आहे.

पालघर : चार वर्षांत विकासाची कोणतीही कामे केली नाहीत त्यामुळेच मृत व्यक्तींचा वापर करण्याची वेळ भाजपा आणि शिवसेनेवर आली आहे. एकीकडे पालघर जिल्ह्याचा विकास हा सत्ताधाऱ्यांमुळे मरणासन्न अवस्थेत असून दुसरीकडे भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष ऊर बडवून मतांचा जोगवा मागत आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, समृद्धी महामार्ग व नाणारच्या शेतकºयांना फसवल्यानंतर आता यांचा डोळा इथल्या लोकांच्या जमिनीवर आहे. ही निवडणूक साधू विरुद्ध संधीसाधू, निष्ठावंत विरुद्ध गद्दार, नीती विरुद्ध अनीती आणि सत्य विरुद्ध असत्य अशी आहे. पालघरवासीय भाजपा, शिवसेना व बहुजन विकास आघाडी या तिन्ही सत्ताधाºयांचा आणि दलबदलूंचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही आणि जनसेवेचे व्रत घेतलेल्या दामू शिंगडा यांना विजयी करतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवली, भिवंडी, पेण या ठिकाणी वाँटेड आहेत. कल्याण-डोंबिवलीकर आमचे साडेसहा हजार कोटी कुठे गेले? आणि पेणवासीय पेण अर्बन बँकेकडे तारण असलेल्या जमिनी सिडको कधी विकत घेणार, याकरिता मुख्यमंत्र्यांचा शोध घेत असल्याचे सावंत म्हणाले.मुख्यमंत्री निरव मोदी व विजय मल्ल्याचे राजकीय अवतारराज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करताना सावंत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे राजकीय रूप आहे. मोदी, मल्ल्या या मंडळींनी ज्याप्रमाणे आमिषे दाखवून बँकांचे पैसे लुबाडून पोबारा केला, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री निवडणूक आली की आश्वासनांची खैरात करून सर्वसामान्यांची मते लुबाडून त्यांची फसवणूक करून पोबारा करतात.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018BJPभाजपा