शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे जिल्ह्यात प्रथम

By नितीन पंडित | Updated: March 5, 2024 18:10 IST

या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यात सर्वाधिक शाळा असलेल्या ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारली असून या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी संस्थांच्या शाळा अशा दोन गटात शाळांमध्ये राबविण्यात आले.ठाणे जिल्हा हा सर्वाधिक शाळांची संख्या असलेला जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यात ही स्पर्धा अटीतटीची झाली.यामध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाने बाजी मारली आहे.

सध्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येला गळती लागलेली असताना भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आजही ३१२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.स्पर्धेतील सर्व विषयांच्या गुणांकनात केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तर या तीनही स्तरावर शाळेने प्रथम स्थान मिळवले आहे.संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव,उपाध्यक्षा अरुणा जाधव,शाळा समिती चेअरमन श्रीराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक सुधीर घागस तसेच उपमुख्याध्यापक,  पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून हे अभियान यशस्वीरित्या पार पाडले.

शासनाने ठरवून दिलेले सर्व निकष भविष्यातही सुरू ठेवून ते जास्तीत जास्त प्रभावी करण्याचा,विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिकाधिक वाढवण्याचा तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न सातत्याने करणार असल्याचे मुख्याध्यापक सुधीर घागस यांनी सांगितले.शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीSchoolशाळा