शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे जिल्ह्यात प्रथम

By नितीन पंडित | Updated: March 5, 2024 18:10 IST

या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यात सर्वाधिक शाळा असलेल्या ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारली असून या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी संस्थांच्या शाळा अशा दोन गटात शाळांमध्ये राबविण्यात आले.ठाणे जिल्हा हा सर्वाधिक शाळांची संख्या असलेला जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यात ही स्पर्धा अटीतटीची झाली.यामध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाने बाजी मारली आहे.

सध्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येला गळती लागलेली असताना भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आजही ३१२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.स्पर्धेतील सर्व विषयांच्या गुणांकनात केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तर या तीनही स्तरावर शाळेने प्रथम स्थान मिळवले आहे.संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव,उपाध्यक्षा अरुणा जाधव,शाळा समिती चेअरमन श्रीराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक सुधीर घागस तसेच उपमुख्याध्यापक,  पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून हे अभियान यशस्वीरित्या पार पाडले.

शासनाने ठरवून दिलेले सर्व निकष भविष्यातही सुरू ठेवून ते जास्तीत जास्त प्रभावी करण्याचा,विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिकाधिक वाढवण्याचा तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न सातत्याने करणार असल्याचे मुख्याध्यापक सुधीर घागस यांनी सांगितले.शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीSchoolशाळा