शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

उल्हासनगरात अतिधोकादायक ३ इमारतींवर पाडकाम कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 4:50 PM

हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतीवर अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

उल्हासनगर : महापालिकेने १५० धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी घोषित केल्या असून, त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या ३० इमारती खाली केल्या आहेत. त्यापैकी हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतीवर अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

उल्हासनगरात दरवर्षी इमारती कोसळून मृत्यू झाल्याचे प्रकार झाले आहेत. भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून ४०पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून, असंख्य जण जखमी झाले आहेत. भिवंडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका उपायुक्त मदन सोंडे यांनी कॅम्प नं -१ मधील हमलोग, कॅम्प नं-२ मधील शांती पॅलेस व कॅम्प नं-४ मधील ओम शिवगंगा या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. तसे प्रसिद्धिपत्रक काढले आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने तिन्ही इमारतीवर आज पाडकाम कारवाई सुरू केली आहे. तसेच धोकादायक इमारतीच्या यादीत नसलेल्या अन्य इमारतीचे सर्वेक्षण करण्याचे संकेत उपायुक्त मदन सोंडे यांनी दिले. 

शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई पहापलिकेने सुरू केली. तर दुसरीकडे १३० धोकादायक इमारतीला पावसाळ्यात पूर्वी नोटिसा देऊन नागरिकांना इमारती खाली करण्यास सांगितले. मात्र इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेकडे आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे. पालिकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने हजारो नागरिकांना धोकादायक इमारती राहावे लागत आहे. गेल्या वर्षी २० वर्ष जुन्या इमारतीचे ऑडिट करून घेण्याचा सल्ला पालिकेने इमारत धारकांना दिला होता. मात्र एकाही २० वर्ष जुन्या इमारती स्ट्रॅक्चर ऑडिट करून घेतले नाही. 

धोकादायक इमारतींचा आकडा चुकीचाशहरात सन १९९० ते ९५दरम्यान रेती पुरवठा बंद असल्याने, त्यावेळी बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींमध्ये रेतीऐवजी दगडाचा चुरा व वाळवा रेती याचा वापर करीत होते. त्या काळातील बहुतांश इमारती धोकादायक होत असल्याने त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.