शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

CoronaVirus in Thane: ठाण्यात धावपळ! महापालिकेच्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा संपला; रुग्णांना हलविण्याचे काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 20:27 IST

Oxygen stock in Thane: ऑक्सीजन आणि आयसीयुमधील २६ रुग्णांना तत्काळ गोल्बल रुग्णालयात हलविण्यास सुरवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाण्यात लसींचा आणि रेमडीसीव्हर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतांना आता महापालिकेच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या ज्युपीटर रुग्णालया शेजारी असलेल्या पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरमधील ऑक्सीजनचा साठा संपुष्टात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील ऑक्सीजन आणि आयसीयुमध्ये असलेल्या २६ रुग्णांना तत्काळ हलविण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले. त्यामुळे या रुग्णालयाबाहेर एकाच वेळेस २० ते २५ रुग्णवाहीका लागल्याचे दिसत आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे रुग्णांचे नातेवाईक मात्र भयभीत झाल्याचे दिसून आले.

ठाणे  शहरात रोजच्या रोज १५०० ते १८०० रुग्ण नव्याने वाढत आहेत. त्यात या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीव्हरचे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मागील काही दिवसापासून धावपळ सुरु आहे. दुसरीकडे लसीकरण देखील शहरात थांबले आहे. अशातच आता महापालिकेच्या पार्कीग प्लाझाच्या कोवीड सेंटरमधील ऑक्सीजनचा साठा संपुष्टात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सेंटरमध्ये अवघे दोन बाटले शिल्लक असल्याची माहिती पुढे आल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. शनिवारी संध्याकाळी या रुग्णालयासाठी ऑक्सीजनचा साठा उपलब्ध होणार होता. मात्र तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. तसेच जो साठा येणार आहे. तो केवळ ८ ते १० टनार्पयत रविवारी सकाळी किंवा दुपार र्पयत येणार आहे. परंतु तो देखील अपुरा पडणार असल्याने, आधीच दक्षता म्हणून रुग्णांना हलविण्याचे काम सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.

परंतु येथे काम करणा:या एका कर्मचा:याच्या म्हणन्यानुसार येथील ऑक्सीजनचा साठा संपला असून केवळ दोनच बाटले शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाशी संपर्क साधून रुग्ण हलवावे लागतील असे सांगितल्यानंतर प्रशासनाने ही पावले उचलली असल्याचे सांगितले. हे रुग्णालय जवळ जवळ १ हजार बेडचे आहे. मागील दोन आठवडय़ापूर्वीच हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी सध्याच्या घडीला ५५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर ११ आयसीयु, आणि ऑक्सीजनवर १६ असे मिळून २६ रुग्ण येथे ऑक्सीजनवर असून त्यांना शनिवारी सांयकाळी हलविण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यामुळे येथे २० ते २५ रुग्णवाहीका एका मागोमाग एक उभ्या झाल्या होत्या. त्यानंतर एक एक करुन रुग्णांना हलविण्याचे काम सुरु करण्यात आले. परंतु रुग्णांच्या नातेवाईंकाच्या चेह:यावरील चिंता मात्र अधिक वाढल्याचे दिसत होते. रुग्णालयाबाहेर रुग्णांचे नातेवाईक हिरमुसल्या सारखे बसून होते. प्रशासनाकडून झालेल्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईंका केला आहे. कोरोनामध्ये लंग्जला इनफेक्शन त्रस होत असतो, परंतु असे असतांना येथील रुग्णालयात सुविधा नाहीत, रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या औषधे वेळेत दिले जात नसल्याचा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकांना केला आहे. ज्या कंपन्याकडून ऑक्सीजनचा साठा घेतला जातो, त्यांच्याकडून प्रोडक्शन कमी निघाल्याने हा मुद्दा उपस्थित झाला आहे. परंतु रात्री २ ते ३ टन साठा मिळणार असून रविवारी सकाळ किंवा दुपार र्पयत ८ ते १० टन साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चिंता असणार नाही. परंतु ऑक्सीजनचा साठा संपला नसून सध्या रात्रभर पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. परंतु सकाळ साठा उपलब्ध झाला नाही तर रुग्णांचे हाल नको या उद्देशानेच येथील रुग्णांना ग्लोबलमध्ये हलविण्यात आले.(गणेश देशमुख - अतिरीक्त आयुक्त, ठामपा)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस