शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार रिक्षांमुळे कोंडीत भर, मुक्त परवान्यांमुळे बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:32 IST

राज्य सरकारने रिक्षांसाठी मुक्त परवाना धोरण अवलंबल्याने कल्याण आरटीओ हद्दीत १५ हजार नव्या रिक्षांची भर पडली आहे. त्यामुळे रिक्षांची एकूण संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे. रिक्षांची संख्या वाढली असली, तरी पुरेसे रिक्षातळ नाहीत.

- मुरलीधर भवारकल्याण - राज्य सरकारने रिक्षांसाठी मुक्त परवाना धोरण अवलंबल्याने कल्याण आरटीओ हद्दीत १५ हजार नव्या रिक्षांची भर पडली आहे. त्यामुळे रिक्षांची एकूण संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे. रिक्षांची संख्या वाढली असली, तरी पुरेसे रिक्षातळ नाहीत. पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.रिक्षांसाठी परमिट दिले जात नसल्याने राज्यभरातील रिक्षा-चालक-मालक संघटनांनी आवाज उठवला होता. त्याची दखल घेत सरकारच्या परिवहन विभागाने रिक्षाचालकांना मुक्त परवाने देण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार, जुलै २०१७ पासून मुक्त परवाने देण्यास सुरुवात केली.कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मुरबाड हा परिसर येतो. मुक्त परवाना देण्यापूर्वी आरटीओ हद्दीतील आयुर्मान संपलेल्या जवळपास दोन हजार रिक्षा भंगारात काढण्यात आल्या. या रिक्षावगळून १ जुलै २०१७ पूर्वी आरटीओ हद्दीत २५ हजार रिक्षा होत्या. मात्र, मुक्त परवाना धोरणानुसार या परिसरातील जवळपास २० हजार रिक्षाचालकांना इरादापत्र देण्यात आले. त्यानुसार, सध्या १५ हजार रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे सध्या ४० हजार रिक्षा आरटीओ हद्दीत आहेत. तर, आणखी पाच हजार रिक्षा लवकरच रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत रिक्षांची संख्या ४५ हजारांवर पोहोचणार आहे.कल्याण-डोंबिवली परिसरात वाहतूककोंडीची समस्या बिकट आहे. चौकाचौकांत, गल्लोगल्ली असलेले रिक्षातळही त्याला तितकेच जबाबदार आहेत. कल्याण व डोंबिवली स्टेशन परिसरांत बेकायदा रिक्षातळांची संख्या जास्त आहे. रिक्षांच्या संख्येत वाढ होत असताना महापालिकेने पार्किंगची सुविधा केली पाहिजे. दुसरीकडे रिक्षा वाढल्याने रिक्षाचालकांना भाडे मिळणे मुश्कील झाले आहे. मुक्त परवाना धोरणाचा लाभ घेणारे रिक्षाचालक संतोष भगत म्हणाले, मी कर्ज काढून रिक्षा घेतली आहे. १५ हजार परवाना शुल्क भरले आहे. धोरण चांगले आहे. त्याचा फायदाही झाला आहे. आधीचे आणि नवे रिक्षाचालक यांनी योग्य समन्वय, मदतीचे धोरण ठेवल्यास व्यवसायातील मारामार संपुष्टात येऊ शकते. अनेक रिक्षाचालक जादा प्रवासी (ओव्हरसीट) भरतात. मुक्त परवान्यामुळे ओव्हरसीट घेणे कमी झाले आहे, असा दावा केला जात असला, तरी अद्याप काही ठिकाणी रिक्षाचालक ओव्हरसीट घेतल्याशिवाय रिक्षा नेत नाहीत.मुक्त परवाने देणे थांबवावे - रिक्षा संघटनेची मागणीठाणे जिल्हा रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर म्हणाले, सरकारने मुक्त परवाने देणे थांबवावे. रिक्षा घेतली जाते. परंतु, कागदपत्रे नसतानाही स्टेशन परिसरात रिक्षा दिसतात.रिक्षा, टॅक्सी, बस तसेच सार्वजनिक परिवहनसेवा यांच्यात समन्वय साधला जाणे, हे मोटार वाहन कायद्यात नमूद आहे. रिक्षा वाढल्याने रिक्षाचालकांमध्ये भाडे मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. जीवघेणी आर्थिक स्पर्धा नसावी.जगण्याची संधी नियंत्रित करणे व त्याचे दर ठरवणे, हे दोन्ही विषय मोटार वाहन कायद्यात अंतर्भूत आहे. त्याचा विचार करून मुक्त परवाने तूर्तास स्थगित करावेत, अशी विनंती सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkalyanकल्याण