शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा

By अजित मांडके | Updated: March 20, 2024 14:52 IST

शिवतरे बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले, महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात असा इशारा राष्टÑवादी (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  शिवतारे यांची समजूत काढून देखील सातत्याने बारामती लोकसभे मध्ये फिरून महायुतीचे वातावरण खराब करण्याचे काम करण्याचे काम विजय शिवतरे करीत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री शिंदे यांचा आपल्या नेत्यांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. शिवतरे बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले, महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात असा इशारा राष्टÑवादी (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.शिवसेनेचे विजय शिवतरे यांच्याकडून वारंवार महायुतीचा धर्म तोडण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिल्यानतंरही त्यांच्याकडून वारंवार बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात आगपाखड सुरु आहे. आम्हाला महायुतीचे वातावरण खराब होईल असे कृत्य करायचे नसल्याचेही परांजपे यांनी सांगितले. शिवतरे यांच्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्टÑात मुख्यमंत्री शिंदे यांचे म्हणने त्यांचेच नेते ऐकत नाहीत असा मेसेज जात असून ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शिवतरे हे महायुतीच्या दुधात मीठ टाकत आहेत, परंतु पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा २०१९ ला दाखविली असल्याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे.  ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म  राष्ट्रवादी पाळत आहे. परंतु शिवसेनेकडून राष्टÑवादीचे शक्तीस्थळ राष्टÑवादीचा स्वाभिमान बारामती मध्ये महायुतीचे वातावरण खराब करण्याचे काम करीत आहे.संग्राम थोपटे यांना काँग्रेसच्या कोट्यातून मत्री पद का मिळाले नाही. त्यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रांत अध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तर तो अधिक संयुक्तिक राहील असा सल्लाही त्यांनी दिला.कल्याणमधील भाजपच्या काही पदाधिकाºयांनी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांना पत्र पाठवून मतदार संघाची मागणी केली आहे. यावर परांजपे यांनी भाष्य केले आहे. मतदार संघात आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षाचे चिन्ह उभ रहावे त्याची भावना असणे स्वाभाविक आहे. कल्याण मतदारसंघांमध्ये तीन आमदार  भाजपचे आहेत, भाजपच्या लोकांनी त्यांची भावना त्यांच्या वरिष्ठांकडे मांडली आहे. याच्यामध्ये गैर नसल्याचेही त्यांनी सांगितले. अमित शहा बरोबर राज ठाकरे यांची काय राजनीतिक चर्चा झाली आम्हाला माहीत नाही. जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना