शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

...अन्यथा राज्यातील उद्योग परराज्यांत हलवावे लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 04:45 IST

पूर्वीच्या सरकारने जो कित्ता गिरवला, तोच युती सरकारनेसुद्धा गिरवला आहे. वीजदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मागील काही महिन्यांत पुन्हा ती केली आहे.

ठाणे : पूर्वीच्या सरकारने जो कित्ता गिरवला, तोच युती सरकारनेसुद्धा गिरवला आहे. वीजदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मागील काही महिन्यांत पुन्हा ती केली आहे. त्यामुळे अशीच दरवाढ झाली तर येथील काही मोठ्या उद्योगांसह लघुउद्योग इतर राज्यांत हलवण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा वीजग्राहक व औद्योगिक संघटनांचे राज्यस्तरीय समन्वय समितीचे प्रमुख प्रताप होगाडे यांनी दिला. त्यामुळे वीजदरवाढ कमी करून ३४०० कोटींचे अनुदान द्यावे, अन्यथा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील औद्योगिक संघटना रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी गुरुवारी दिला.ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील सरकारने वीजदरवाढ रद्द करण्यासाठी व वीजदर स्थिर ठेवण्यासाठी महावितरण कंपनीला २०१४ पासून दहमहा ६०० कोटी रुपये याप्रमाणे १० महिन्यांसाठी सहा हजार कोटी अनुदान दिले होते.या सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० या १९ महिन्यांसाठी ३४०० कोटींचे अनुदान महावितरणला द्यावे व औद्योगिक वीजदर आॅगस्ट २०१८ च्या पातळीवर स्थिर ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या मागणीसाठी जानेवारीअखेरपर्यंत संपूर्ण राज्यभर जिल्हानिहाय रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.सत्तेवर येण्याआधी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आॅगस्ट २०१४ व्हिजन डॉक्युमेंट तसेच जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.यामध्ये वीजगळती व वीजखरेदी खर्च कमी करून स्वस्त वीज देऊ, असे स्पष्ट केले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर त्यांनी उद्योगांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. अनुदान द्यायचे नसेल तर वीजदर हा दोन रुपयांनी कमी करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.महाजेनको आणि रतन इंडियाकडून महागडी वीज उद्योगांना खरेदी करावी लागते. परंतु, त्यामध्ये ५० पैसे सूट देता येऊ शकते. तसेच महावितरणचे लॉसेस कमी झाले, तर त्यामुळेही वीजदर एक रुपयाने कमी होऊ शकतो.प्रशासकीय खर्च म्हणजेच यासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचा दर हा ९० पैसे असून इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. तोसुद्धा ४० ते ५० पैशांवर आला, तर ५० पैशांनी दर कमी होऊ शकतात. असे केल्यास आपोआप दोन रुपये वीजदर कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले.ठाणे जिल्ह्यात १५ एमआयडीसी आहेत. या उद्योगांना आधीच नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका बसला आहे. आता वीजदरवाढ स्थिर ठेवली नाही, तर मात्र राज्यातील उद्योग इतर राज्यांत हलवण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :electricityवीज