शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा राज्यातील उद्योग परराज्यांत हलवावे लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 04:45 IST

पूर्वीच्या सरकारने जो कित्ता गिरवला, तोच युती सरकारनेसुद्धा गिरवला आहे. वीजदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मागील काही महिन्यांत पुन्हा ती केली आहे.

ठाणे : पूर्वीच्या सरकारने जो कित्ता गिरवला, तोच युती सरकारनेसुद्धा गिरवला आहे. वीजदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मागील काही महिन्यांत पुन्हा ती केली आहे. त्यामुळे अशीच दरवाढ झाली तर येथील काही मोठ्या उद्योगांसह लघुउद्योग इतर राज्यांत हलवण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा वीजग्राहक व औद्योगिक संघटनांचे राज्यस्तरीय समन्वय समितीचे प्रमुख प्रताप होगाडे यांनी दिला. त्यामुळे वीजदरवाढ कमी करून ३४०० कोटींचे अनुदान द्यावे, अन्यथा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील औद्योगिक संघटना रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी गुरुवारी दिला.ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील सरकारने वीजदरवाढ रद्द करण्यासाठी व वीजदर स्थिर ठेवण्यासाठी महावितरण कंपनीला २०१४ पासून दहमहा ६०० कोटी रुपये याप्रमाणे १० महिन्यांसाठी सहा हजार कोटी अनुदान दिले होते.या सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० या १९ महिन्यांसाठी ३४०० कोटींचे अनुदान महावितरणला द्यावे व औद्योगिक वीजदर आॅगस्ट २०१८ च्या पातळीवर स्थिर ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या मागणीसाठी जानेवारीअखेरपर्यंत संपूर्ण राज्यभर जिल्हानिहाय रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.सत्तेवर येण्याआधी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आॅगस्ट २०१४ व्हिजन डॉक्युमेंट तसेच जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.यामध्ये वीजगळती व वीजखरेदी खर्च कमी करून स्वस्त वीज देऊ, असे स्पष्ट केले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर त्यांनी उद्योगांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. अनुदान द्यायचे नसेल तर वीजदर हा दोन रुपयांनी कमी करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.महाजेनको आणि रतन इंडियाकडून महागडी वीज उद्योगांना खरेदी करावी लागते. परंतु, त्यामध्ये ५० पैसे सूट देता येऊ शकते. तसेच महावितरणचे लॉसेस कमी झाले, तर त्यामुळेही वीजदर एक रुपयाने कमी होऊ शकतो.प्रशासकीय खर्च म्हणजेच यासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचा दर हा ९० पैसे असून इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. तोसुद्धा ४० ते ५० पैशांवर आला, तर ५० पैशांनी दर कमी होऊ शकतात. असे केल्यास आपोआप दोन रुपये वीजदर कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले.ठाणे जिल्ह्यात १५ एमआयडीसी आहेत. या उद्योगांना आधीच नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका बसला आहे. आता वीजदरवाढ स्थिर ठेवली नाही, तर मात्र राज्यातील उद्योग इतर राज्यांत हलवण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :electricityवीज