शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुंब्य्रातील गर्दीने आयोजक हबकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:36 IST

हजारो नागरिक उतरले रस्त्यावर : जमावाला रोखण्याचा पोलिसांनीही सोडला नाद

कुमार बडदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात बुधवारी मुंब्य्रात निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येनी लोक सहभागी झाले होते. तरुणांची संख्या लक्षणीय होती. मोर्चातील गर्दी इतकी वाढली की, त्यामुळे आयोजकही हबकून गेले. मोर्चा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रेल्वे स्थानकापर्यंत न नेता जैन मंदिराशेजारील मैदानावर विसर्जित करण्याकरिता आयोजक व पोलीस यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र मोर्चेकऱ्यांची आक्रमकता पाहता त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यापासून रोखल्यास कदाचित मोर्चाला हिंसक वळण लागू शकते, अशी भीती वाटल्याने मोर्चा पुढे जाऊ देण्यात आला.कुल जमातने काढलेल्या या मोर्चात जवळपास ४० हजार नागरिक सहभागी झाले होते, असा आयोजकांचा दावा आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक होती. त्यांनी विविध घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध नोंदवला. आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना देण्यात आले.आयोजकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कौसा, संजयनगर, आनंद कोळीवाडा, तसेच रेल्वेस्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठेतील दुकाने, हॉटेल्स बंद ठेवली होती. या आंदोलनास काही भागांत हिंसक वळण लागल्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्य्रातील मोर्चासाठी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.डोंबिवलीत विधेयकाचे जोरदार समर्थन,अभाविपचे कार्यकर्ते एकवटलेडोंबिवली : नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ डोंबिवलीत महाविद्यालयीन विद्यार्थी एकवटल्याचे चित्र बुधवारी दिसले. कायद्याच्या समर्थनासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घरडा सर्कल येथील शहीद कॅ. विनय सच्चान स्मारकाजवळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला मानपाडा पोलिसांनी अगोदर दिलेली परवानगी नंतर नाकारण्यात आली.विद्यार्थ्यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फडके पथ येथे एकत्र येत कायद्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या नागरिकता सुधारणा विधेयकातील तरतुदी, त्याबद्दल समाजात पसरवले जाणारे गैरसमज, त्यामुळे समाजाचे होणारे नुकसान इत्यादींची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.देशात केवळ २० विद्यापीठांत निदर्शने होत आहेत. काही समाजकंटक हिंसा पसरवत असल्याचा आरोप डोंबिवली शहरमंत्री अलोक तिवारी यांनी केला. यावेळी १५० विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा संघटनमंत्री प्रेरणा पवार, महाविद्यालय विद्यार्थीप्रमुख नितीन पाटील, जिल्हा विद्यार्थिनीप्रमुख श्रेया कर्पे, देवेश बाबरे, मिहिर देसाई आणि अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

चार तास वाहतूक ठप्पमुंब्य्रातील नागरी वसाहतीमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४ च्या एकेरी मार्गावरून मार्गक्र मण करत असलेला मोर्चा पोलीस ठाण्यासमोर पोहोचल्यानंतर मोर्चेकरी दोन्ही रस्त्यांवर पांगले. त्यामुळे दीड तासाहून अधिक काळ राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४ वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याचा फटका कर्तव्य बजावण्यासाठी चाललेल्या अग्निशमन दलाच्या वाहनालाही बसला. अग्निशमन दलाची गाडी ठाकूरपाडा परिसरातील रस्त्यावर बराच वेळ एकाच ठिकाणी उभी होती.

आंदोलकांच्या संख्येचा अंदाज चुकलामोर्चाला उपस्थित राहणाºया मोर्चेकऱ्यांच्या संख्येबाबत आयोजकांचा अंदाज चुकला. आंदोलकांची प्रचंड संख्या बघून त्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे पूर्वनियोजित घोषणेनुसार मोर्चा रेल्वेस्टेशनजवळ न नेता तो पोलीस ठाण्यासमोरील जैन मंदिराच्या मैदानात संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी घोषणा नगरसेवक अशरफ पठाण आणि मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शमीम खान वारंवार करत होते. परंतु, त्यांच्या या घोषणांना प्रतिसाद न देता मोर्चेकºयांनी स्टेशनच्या दिशेने कूच केले. आयोजक जैन मंदिराजवळ मोर्चा संपवण्याच्या अटीवर कायम राहिले असते, तर अस्थिरता माजून आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.