शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

काळातलाव विकासासाठी निविदा काढा, आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 01:39 IST

या कामाच्या पहिल्या टप्प्यातील निविदा काढा, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कल्याण : काळातलावाचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यातील निविदा काढा, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत.आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी अचानक काळातलाव परिसराला भेट दिली. यावेळी तेथे आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. काळातलाव येथील म्युझियम सुटीच्या दिवशी जास्त वेळ उघडे ठेवावे. तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ गाड्या उभ्या करू नयेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाभोवती फुलझाडे असावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. या वेळी त्यांच्यासोबत प्रकल्प अभियंते तरुण जुनेजा उपस्थित होते.ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या तलावाच्या शेजारी असलेल्या वस्तीत ठाकरे यांचे काही काळ वास्तव्य होते. काळातलाव २०१२ मध्ये आठ कोटी खर्चून विकसित करण्यात आला होता. त्यात रंगीत संगीत कारंजे लावण्यात आले होते. त्यापाठोपाठ १० कोटी खर्चून ठाकरे यांचे स्मारक तलाव परिसरात विकसित करण्यात आले. आता याच तलावाचा ५२ कोटी खर्चून स्मार्ट सिटीअंतर्गत विकास करण्यात येणार आहे.महापालिका हद्दीत अन्य सहा तलाव असून, त्यांचाही विकास केल्यास तेथे नैसर्गिक जलसाठ्यांचे संवर्धन होऊ शकते. तसेच शहराच्या सुशोभीकरणात भर पडू शकते. आयुक्तांनी अर्थसंकल्पात शहराला आर्थिक शिस्त व सुशासन देण्याचा प्रयत्न करीत असताना शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याचा मानस व्यक्त केला आहे. काळातलावापाठोपाठ अन्य तलावांचे सुशोभीकरण करण्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केलीजात आहे.>दोन टप्प्यांत असा होणार विकासकाळातलावाचा विकास दोन टप्प्यांत केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील १५ कोटी रुपये खर्चाची निविदा तातडीने काढण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या कामासाठी ५० टक्के निधी केंद्र सरकार व २५ टक्के निधी राज्य सरकारकडून मिळणार आहे. उर्वरित २५ टक्के निधी महापालिकेच्या हिश्श्यातून उभा करायचा आहे.दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी निविदा मागविण्यापूर्वी विकासासाठी तलाव परिसरालगतची जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी, असे आयुक्तांनी सांगितले आहे. दुसरा टप्पा हा ३७ कोटी रुपये खर्चाचा आहे. तलाव परिसरात अतिक्रमण असून, तेथील रहिवाशांना पर्यायी जागा दिल्यावर तलाव विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.