शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

काळातलाव विकासासाठी निविदा काढा, आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 01:39 IST

या कामाच्या पहिल्या टप्प्यातील निविदा काढा, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कल्याण : काळातलावाचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यातील निविदा काढा, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत.आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी अचानक काळातलाव परिसराला भेट दिली. यावेळी तेथे आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. काळातलाव येथील म्युझियम सुटीच्या दिवशी जास्त वेळ उघडे ठेवावे. तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ गाड्या उभ्या करू नयेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाभोवती फुलझाडे असावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. या वेळी त्यांच्यासोबत प्रकल्प अभियंते तरुण जुनेजा उपस्थित होते.ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या तलावाच्या शेजारी असलेल्या वस्तीत ठाकरे यांचे काही काळ वास्तव्य होते. काळातलाव २०१२ मध्ये आठ कोटी खर्चून विकसित करण्यात आला होता. त्यात रंगीत संगीत कारंजे लावण्यात आले होते. त्यापाठोपाठ १० कोटी खर्चून ठाकरे यांचे स्मारक तलाव परिसरात विकसित करण्यात आले. आता याच तलावाचा ५२ कोटी खर्चून स्मार्ट सिटीअंतर्गत विकास करण्यात येणार आहे.महापालिका हद्दीत अन्य सहा तलाव असून, त्यांचाही विकास केल्यास तेथे नैसर्गिक जलसाठ्यांचे संवर्धन होऊ शकते. तसेच शहराच्या सुशोभीकरणात भर पडू शकते. आयुक्तांनी अर्थसंकल्पात शहराला आर्थिक शिस्त व सुशासन देण्याचा प्रयत्न करीत असताना शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याचा मानस व्यक्त केला आहे. काळातलावापाठोपाठ अन्य तलावांचे सुशोभीकरण करण्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केलीजात आहे.>दोन टप्प्यांत असा होणार विकासकाळातलावाचा विकास दोन टप्प्यांत केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील १५ कोटी रुपये खर्चाची निविदा तातडीने काढण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या कामासाठी ५० टक्के निधी केंद्र सरकार व २५ टक्के निधी राज्य सरकारकडून मिळणार आहे. उर्वरित २५ टक्के निधी महापालिकेच्या हिश्श्यातून उभा करायचा आहे.दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी निविदा मागविण्यापूर्वी विकासासाठी तलाव परिसरालगतची जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी, असे आयुक्तांनी सांगितले आहे. दुसरा टप्पा हा ३७ कोटी रुपये खर्चाचा आहे. तलाव परिसरात अतिक्रमण असून, तेथील रहिवाशांना पर्यायी जागा दिल्यावर तलाव विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.