शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

डिसॅलिनेशनला विरोध, योग्य मोबदल्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:22 IST

ठाणे महापालिकेचा वादग्रस्त ठरलेल्या डिसॅलिनेशन प्रकल्पाला पूर्वीपासूनच राजकीय विरोध होता. त्याला आता ठाण्यातील शेतकऱ्यांनीदेखील विरोध केला आहे. डिसॅलिनेशन ( खाडी जलशुद्धीकरण प्रकल्प ) प्रकल्पासाठी वाघबीळ ते गायमुख परिसरातील २८ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून ती देण्यास शेतक-यांचा तीव्र विरोध आहे.

ठाणे - ठाणे महापालिकेचा वादग्रस्त ठरलेल्या डिसॅलिनेशन प्रकल्पाला पूर्वीपासूनच राजकीय विरोध होता. त्याला आता ठाण्यातील शेतकऱ्यांनीदेखील विरोध केला आहे. डिसॅलिनेशन ( खाडी जलशुद्धीकरण प्रकल्प ) प्रकल्पासाठी वाघबीळ ते गायमुख परिसरातील २८ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून ती देण्यास शेतकºयांचा तीव्र विरोध आहे. बुधवारी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागामध्ये यासंदर्भात पालिका अधिकाºयांचा समोर जनसुनावणी झाली. त्यात शेतकºयांच्या सूचना आणि हरकती नोंदवण्यात आल्या. वाघबीळ आणि गायमुख याच पट्ट्यात भातशेती होत असून ही शेतजमीन देखील गेल्यास ठाणे शहरात शेतीच राहणार नसल्याचे या शेतकºयांचे म्हणणे आहे.भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून ठामपाने खाडी जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे. खाडीच्या पाण्यावर प्रक्रिया करून ठाणेकरांना दररोज २०० दशलक्ष लिटर पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. खाडी किनारी तांत्रिक दृष्ट्या सुयोग्य ठिकाणी २० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या पाण्याचे प्रक्रि या (विक्षारण) करून पिण्याचे पाणी तयार करण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पाला पूर्वीपासूनच राजकीय विरोध आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी या प्रकल्पाच्या विरोधात थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. शहरात पाण्यासाठी एवढे नैसर्गिक स्त्रोत असताना खाडीच्या अतिशय प्रदूषित पाण्यावर प्रक्रि या करून त्याचा वापर पिण्यासाठी करणे किती योग्य आहे असा मुद्दा विरोधी त्यांनी उपस्थित केला होता. आता वाघबीळ आणि कोलशेत परिसरातील शेतजमिनीदेखील या प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणार असल्याने शेतकºयांनीदेखील या प्रकल्पाला विरोध करून शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे.वाघबीळ आणि कोलशेत परिसरात ७० ते ८० एकर जागेवर भातशेती सुरू आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांपासून सुमारे १५० शेतकरी या जमिनीवर भातशेती करत आहेत. मात्र, आता डिसॅलिनेशन प्रकल्पासाठी जमिनी संपादित करण्याच्या नोटिसा त्यांना मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शहरीकरणामुळे वाघबीळ, वडवली, ओवळा मोगरपाडा, गायमुख दरम्यान भातशेतीचे खूपच कमी क्षेत्र उरले आहे. त्यात २८ हेक्टर जमिनीमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असल्याच्या नोटिसा शेतकºयांना पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये ७/१२ चा उल्लेखदेखील केलेला नाही. या शेतजमिनीवर या सर्व शेतकºयांचा उदरनिर्वाह असून ती संपादित केल्यास शहरातून शेतीचे अस्तित्वच संपणार असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनदेखील संपणार आहे. त्यामुळे जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत जमीन न देण्याची शेतकºयांची भूमिका असल्याची माहिती सागर पाटील यांनी दिली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे