शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

सर्वधर्मीयांच्या स्मशानाला विरोध

By admin | Updated: March 16, 2017 02:54 IST

भार्इंदरपाडा येथे एकाच ठिकाणी सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमीचा अनोखा प्रस्ताव तयार करून तो पहिल्याच महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्याच्या

ठाणे : भार्इंदरपाडा येथे एकाच ठिकाणी सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमीचा अनोखा प्रस्ताव तयार करून तो पहिल्याच महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्याच्या हालचाली सुरू असतानाच या प्रस्तावाला जोरदार विरोध सुरू झाला आहे. आपल्या कंपनीचा विकास प्रकल्प त्या जागेच्या ठिकाणी सुरु असल्याने व्यवसायावर या स्मशानभूमीचा परिणाम होऊ शकतो, असे सांगत शिवसेनेचे नगरसेवक पूर्वेश सरनाईक आणि परिषा सरनाईक यांनी या प्रस्तावाविरोधात लक्षवेधी मांडली आहे. या स्मशानभूमीचा विचार करण्यापूर्वी पोखरण १ आणि २ परिसरातील स्मशानभूमीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणीही त्यांनी या लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे. प्रशासनाच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांनीच विरोध दर्शविल्याने महासभेत याचे पडसाद काय उमटणार, हे पाहणे महत्वाचे ठरले आहे. ज्या ठिकाणी ही स्मशानभूमी बांधण्याचा प्रस्ताव आहे, ती जागा विहंग ग्रूप कंपनीच्या जागेत येते. या ठिकाणी कंपनीच्या गृहप्रकल्पाचे काम देखील सुरु आहे. भार्इंदरपाड्याच्या आधी पोखरण रोड नं १ आणि २ परिसरात स्मशानभूमीची गरज असताना याकडे मात्र पालिका विकासकाच्या फायद्यासाठी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक पूर्वेश सरनाईक नगरसेविका परिषा सरनाईक यांनी केला आहे. या दोन्ही स्मशानभूमीमुळे संघर्ष सुरु झाला असून या मुद्द्यावरून पहिल्याच महासभेत गदारोळ होण्याची चिन्हे आहेत. सर्वधर्मियांकडून स्मशानभूमीची मागणी जोर धरू लागल्याने पालिका प्रशासनाने भार्इंदरपाडा येथील जागेवर एकाच ठिकाणी स्मशानभूमी तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला. मात्र या प्रस्तावरुन राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. स्मशानभूमीच्या मालकी हक्काबाबत प्रश्न उपस्थित करून भार्इंदरपाडा येथील स्मशानभूमीपूर्वी ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीची आवश्यकता आहे त्यात्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित केल्यानंतरच या स्मशानभूमीस मंजुरी द्यावी व तोपर्यंत हा प्रस्ताव स्थगित ठेवावा अथवा महापालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमीच्या जागांच्या तपशिलासह फेरप्रस्ताव मांडावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)