शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यातील पूल वाहतुकीसाठी खुला करा; माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 10:42 IST

ज्याला ठाण्याला जायचे असते त्याला कळवा पुल ओलांडावाच लागतो. पण, तो पुल ओलांडत असताना ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कळव्यात वाहतुक कोंडी निर्माण करते.

ठाणे - पावसाळा सुरु झाल्यापासून ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी सुरु आहे. रस्त्यावरील खड्डे आणि शहरात येणारी जड वाहने याला कारणीभूत आहेत. याच विषयावर लक्ष वेधत राष्ट्रवादी नेते माजी मंत्री डॉ जितेंद्र आव्हाडांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कळव्यातील तिसरा पुल बांधून तयार असून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून विशिष्ट वेळेतच जड वाहनांना परवानगी देण्याची मागणी केली आहे. 

पत्रामध्ये आव्हाड म्हणतात "2013-14 साली जेव्हा असीम गुप्ता हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते, तेव्हा कळव्याचा खचल्यानंतर दुस-या पुलाची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता त्यावर पहिला पुल उपाय म्हणून कळवा खाडीवर तिस-या पुलाची निर्मिती करावी अशी मी त्याच्याकडे मागणी केली आणि त्याला असीम गुप्ता यानी त्वरीत मान्यता दिली व त्या कामाला सुरुवात देखील झाली. कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता जवळ-जवळ वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोंडीने लोक हैराण झाले आहेत. कळव्यातल्या कळव्यात प्रवासासाठी नागरिकांना कुठेही अडचण येत नाही. कारण कळव्यात कुठल्याही रस्त्यांवर खड्डे नाहीत. परंतु मात्र ज्याला ठाण्याला जायचे असते त्याला कळवा पुल ओलांडावाच लागतो. पण, तो पुल ओलांडत असताना ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कळव्यात वाहतुक कोंडी निर्माण करते. खरतरं उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कळव्यामध्ये विशिष्ट वेळेत जड वाहनांना वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण त्या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.आतामात्र सगळ असाह्य व्हायला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा बुडत आहेत. नोकरीला जाण्यासाठी उशीर होत आहे आणि ही अस्वस्थता आता शिगेला पोहचली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच नागरिकांची काहीच चूक नाही. चूक कोणाची हेही मला सांगायचे नाही. परंतु कमीत कमी जो ब्रिज तयार झाला आहे तो नागरिकांच्या वापरासाठी सुरु करा. जेणेकरुन थोडीफार वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल. आपण त्वरीत हा निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. खरतर पोलीस आयुक्तांनी उच्च न्यायालयाचा आदेश मानायला पाहिजे व तशी वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. पण, हे कितीवेळा आणि कोणाला सांगायचे. उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवणार असाल तर मग तक्रारच कोणाकडे करायची. मला वाटते कायद्याचे पालन व्हायला हवे. उच्च न्यायालयाचे आदेश मानायला हवेत." अशी मागणी आव्हाडांनी पत्राद्वारे पोलीस आयुक्ताकडे केली आहे. त्यामुळे हा पूल कधी  सुरु होईल हे पाहणं महत्वाचं आहे

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड