शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कळव्यातील पूल वाहतुकीसाठी खुला करा; माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 10:42 IST

ज्याला ठाण्याला जायचे असते त्याला कळवा पुल ओलांडावाच लागतो. पण, तो पुल ओलांडत असताना ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कळव्यात वाहतुक कोंडी निर्माण करते.

ठाणे - पावसाळा सुरु झाल्यापासून ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी सुरु आहे. रस्त्यावरील खड्डे आणि शहरात येणारी जड वाहने याला कारणीभूत आहेत. याच विषयावर लक्ष वेधत राष्ट्रवादी नेते माजी मंत्री डॉ जितेंद्र आव्हाडांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कळव्यातील तिसरा पुल बांधून तयार असून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून विशिष्ट वेळेतच जड वाहनांना परवानगी देण्याची मागणी केली आहे. 

पत्रामध्ये आव्हाड म्हणतात "2013-14 साली जेव्हा असीम गुप्ता हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते, तेव्हा कळव्याचा खचल्यानंतर दुस-या पुलाची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता त्यावर पहिला पुल उपाय म्हणून कळवा खाडीवर तिस-या पुलाची निर्मिती करावी अशी मी त्याच्याकडे मागणी केली आणि त्याला असीम गुप्ता यानी त्वरीत मान्यता दिली व त्या कामाला सुरुवात देखील झाली. कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता जवळ-जवळ वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोंडीने लोक हैराण झाले आहेत. कळव्यातल्या कळव्यात प्रवासासाठी नागरिकांना कुठेही अडचण येत नाही. कारण कळव्यात कुठल्याही रस्त्यांवर खड्डे नाहीत. परंतु मात्र ज्याला ठाण्याला जायचे असते त्याला कळवा पुल ओलांडावाच लागतो. पण, तो पुल ओलांडत असताना ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कळव्यात वाहतुक कोंडी निर्माण करते. खरतरं उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कळव्यामध्ये विशिष्ट वेळेत जड वाहनांना वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण त्या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.आतामात्र सगळ असाह्य व्हायला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा बुडत आहेत. नोकरीला जाण्यासाठी उशीर होत आहे आणि ही अस्वस्थता आता शिगेला पोहचली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच नागरिकांची काहीच चूक नाही. चूक कोणाची हेही मला सांगायचे नाही. परंतु कमीत कमी जो ब्रिज तयार झाला आहे तो नागरिकांच्या वापरासाठी सुरु करा. जेणेकरुन थोडीफार वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल. आपण त्वरीत हा निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. खरतर पोलीस आयुक्तांनी उच्च न्यायालयाचा आदेश मानायला पाहिजे व तशी वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. पण, हे कितीवेळा आणि कोणाला सांगायचे. उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवणार असाल तर मग तक्रारच कोणाकडे करायची. मला वाटते कायद्याचे पालन व्हायला हवे. उच्च न्यायालयाचे आदेश मानायला हवेत." अशी मागणी आव्हाडांनी पत्राद्वारे पोलीस आयुक्ताकडे केली आहे. त्यामुळे हा पूल कधी  सुरु होईल हे पाहणं महत्वाचं आहे

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड