शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील पर्यटनाच्या धर्तीवर 'कचरा बेट' ठाणेकरांसाठी खुले करा!

By अजित मांडके | Updated: March 27, 2023 19:46 IST

मनसेचे पालिका प्रशासनाला उपहासात्मक आव्हान

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मालदीव, बाली आणि सिंगापूर येथे कचऱ्याच्या ढिगावर शास्रोक्तक पद्धतीने बेट तयार करून पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रबिंदू बनवण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर ठाण्याच्या कापूरबावडी परिसरातील नाल्यात तब्बल १०० ते १५० मीटरपर्यंत कचऱ्याचे अनोखे बेट तयार झाले आहे. या बेटाचे लवकरच लोकार्पण करून ठाणेकरांसाठी पालिका प्रशासनाने नवीन पर्यटन केंद्र खुले करावे, अशी उपहासात्मक मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाने अनोख्या आंदोलनानंतर केली. यावेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी नाल्यातील या कचऱ्याच्या बेटावर उतरून पालिका प्रशासनातील निद्रिस्त अधिकाऱ्यांविरोधात सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली.

लवकरात लवकर येथील कचरा स्वच्छ न केल्यास हे कचऱ्याचे ढीग पालिका अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर नेऊन टाकले जातील असा इशाराही मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला.  ठाण्यातील गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा येथील वीस हजार नागरिकांना या नाल्यातील कचऱ्याच्या ढिगामुळे त्रास होतो. याठिकाणी कचरा साठून बेट तयार झाले आहे. याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी पालिकेच्या वतीने या बेटाचे नामकरण करावे तसेच ठाण्यातील नागरिकांना कचऱ्याचे बेट बघण्याचा अनुभव उपलब्ध करून द्यावा, अशी बोचरी टीका आंदोलनानंतर केली. नागरिकांना महानगरपालिकेच्या स्वच्छ ठाणे धोरणाची पुरेपूर माहिती या बेटामुळे मिळेल व त्यांना विदेशात जे बेट बघण्याचा अनुभव येतो तोच अनुभव ठाण्यात घेता येईल, असा टोलाही शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी लगावला. याप्रसंगी मनसेचे दत्ता चव्हाण, मीनल नवर, मनीष सावंत, हिरा पासी, कामिनी शेवाळे, अर्चना शिर्के, निलेश माळी आदी उपस्थित होते.

पालिकेच्या धोरणालाच हरताळ- नवीन अर्थसंकल्पामध्ये पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छ ठाणे या लेखा शीर्षक अंतर्गत ठाणे शहर कचरा मुक्त करण्यासाठी अंदाजे ८५ कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. तसेच ठाण्यातील कचरा संकलित करण्यासाठी उभारण्यात आलेले सीपी तलाव येथे हस्तांतरण केंद्र अद्यावत करण्याच्या अनुषंगाने २३ कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. पालिकेच्या वतीने वर्षाला करोडो रुपये फक्त घनकचरा विभागाच्या विविध प्रकल्पावर खर्च केले जातात. तसेच दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये ठाणे शहर कचरामुक्त करण्यासाठी निधी प्रस्तावित केला जातो. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ठाणे कचरा मुक्त होण्यापासून वंचित राहते, असेही शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसे