शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

कल्याणमध्ये ग्राहकाला वीजबिल फक्त दोन लाख ६३ लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 00:49 IST

वीज वितरण कंपनीचा प्रताप; डोळे पांढरे होण्याची वेळ

कल्याण : एखाद्या महिन्यात शंभर-दोनशे रुपयांनी बिल वाढवून आले, तरी जीव कासावीस होतो. मग, लाखांचे बिल अचानक हाती पडले तर काय होईल? पश्चिमेकडील गांधी चौकात राहणारे शैलेश मारू यांचे कुटुंब सध्या याचा अनुभव घेत आहेत. डिसेंबर-जानेवारीच्या बिलावरील दोन लाख ६० हजारांपेक्षा जास्त रक्कम पाहून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आलेले हे बिल कसे भरावे, या विवंचनेत हे कुटुंब सापडले आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या भीतीने शैलेश यांच्या ६५ वर्षीय वडिलांनी तर धसकाच घेतला आहे.गांधी चौक परिसरात राहणारे शैलेश हे ऐरोली येथील एका खासगी कंपनीत काम करतात, तर त्यांचे वडील विनोद मारू यांचे शिलाईचे दुकान आहे. मारू यांचा विजेचा घरगुती वापर केला जातो. त्यांच्या घरात चार पंखे, चार ट्युबलाइट, गरज भासल्यास इस्त्री व मिक्सरचा वापर केला जातो. घरात वातानुकूलित यंत्रणाही नाही. मारू यांना एप्रिल २०१८ मध्ये साधारण २१०० रुपयांचे वीजबिल आले. त्यानंतर, त्यांना सारख्याच रकमेची वीजबिले आली. त्यावर रीडिंगही सारखेच होते. त्यामुळे मारू यांनी या बिलांविषयी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे तक्रार केली. तेव्हा तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जुने मीटर बदलून घेण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवून घेतले. त्यानंतरही त्यांना सारख्याच रीडिंगचे बिल आले. त्याची रक्कमही कमी करून न दिल्याने ते भरावे लागले. नवे इलेक्ट्रॉनिक वीजमीटर बसवल्यानंतर आलेल्या बिलाने तर मारू कुटुंबीयांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. जुन्या मीटरद्वारे १७ हजार युनिटचा वापर करण्यात आल्याचे दाखवून त्याचा समावेश करून डिसेंबरचे दोन लाख ६३ हजारांचे बिल काढण्यात आले.याविषयीही मारू यांनी हरकत घेऊ न वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे तक्रार केली. तेव्हा तुमच्या बिलाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगून बोळवण केली. विजेची बिले वापरलेल्या युनिटपेक्षा जास्तीची आकारली जातात. वीजबिले भरली नाहीत तर लगेच वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे ग्राहक जास्तीची बिले भरून मोकळे होतात. वास्तविक, वापर आणि त्यानुसार आलेले बिल त्याची होणारी शहानिशा त्यानंतर ग्राहकाला त्याने भरलेली जास्तीची रक्कम परत केली गेली, असे एकही उदाहरण सापडत नाही. त्यामुळे वीजकंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड भरावा लागत असल्याची नाराजी मारू कुटुंबीयांनी व्यक्त केली.‘शहानिशा करून निर्णय घेऊ ’वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मारू यांच्या तक्रारीची नोंद घेऊन शहानिशा केली जाईल. शहानिशा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :electricityवीज