शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कल्याणमध्ये ग्राहकाला वीजबिल फक्त दोन लाख ६३ लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 00:49 IST

वीज वितरण कंपनीचा प्रताप; डोळे पांढरे होण्याची वेळ

कल्याण : एखाद्या महिन्यात शंभर-दोनशे रुपयांनी बिल वाढवून आले, तरी जीव कासावीस होतो. मग, लाखांचे बिल अचानक हाती पडले तर काय होईल? पश्चिमेकडील गांधी चौकात राहणारे शैलेश मारू यांचे कुटुंब सध्या याचा अनुभव घेत आहेत. डिसेंबर-जानेवारीच्या बिलावरील दोन लाख ६० हजारांपेक्षा जास्त रक्कम पाहून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आलेले हे बिल कसे भरावे, या विवंचनेत हे कुटुंब सापडले आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या भीतीने शैलेश यांच्या ६५ वर्षीय वडिलांनी तर धसकाच घेतला आहे.गांधी चौक परिसरात राहणारे शैलेश हे ऐरोली येथील एका खासगी कंपनीत काम करतात, तर त्यांचे वडील विनोद मारू यांचे शिलाईचे दुकान आहे. मारू यांचा विजेचा घरगुती वापर केला जातो. त्यांच्या घरात चार पंखे, चार ट्युबलाइट, गरज भासल्यास इस्त्री व मिक्सरचा वापर केला जातो. घरात वातानुकूलित यंत्रणाही नाही. मारू यांना एप्रिल २०१८ मध्ये साधारण २१०० रुपयांचे वीजबिल आले. त्यानंतर, त्यांना सारख्याच रकमेची वीजबिले आली. त्यावर रीडिंगही सारखेच होते. त्यामुळे मारू यांनी या बिलांविषयी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे तक्रार केली. तेव्हा तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जुने मीटर बदलून घेण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवून घेतले. त्यानंतरही त्यांना सारख्याच रीडिंगचे बिल आले. त्याची रक्कमही कमी करून न दिल्याने ते भरावे लागले. नवे इलेक्ट्रॉनिक वीजमीटर बसवल्यानंतर आलेल्या बिलाने तर मारू कुटुंबीयांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. जुन्या मीटरद्वारे १७ हजार युनिटचा वापर करण्यात आल्याचे दाखवून त्याचा समावेश करून डिसेंबरचे दोन लाख ६३ हजारांचे बिल काढण्यात आले.याविषयीही मारू यांनी हरकत घेऊ न वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे तक्रार केली. तेव्हा तुमच्या बिलाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगून बोळवण केली. विजेची बिले वापरलेल्या युनिटपेक्षा जास्तीची आकारली जातात. वीजबिले भरली नाहीत तर लगेच वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे ग्राहक जास्तीची बिले भरून मोकळे होतात. वास्तविक, वापर आणि त्यानुसार आलेले बिल त्याची होणारी शहानिशा त्यानंतर ग्राहकाला त्याने भरलेली जास्तीची रक्कम परत केली गेली, असे एकही उदाहरण सापडत नाही. त्यामुळे वीजकंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड भरावा लागत असल्याची नाराजी मारू कुटुंबीयांनी व्यक्त केली.‘शहानिशा करून निर्णय घेऊ ’वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मारू यांच्या तक्रारीची नोंद घेऊन शहानिशा केली जाईल. शहानिशा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :electricityवीज