शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

ठाण्यात दहा टक्केच रेस्टॉरंट्स, बार उघडले; संध्याकाळी ७ नंतरच्या बंदच्या आदेशाने हॉटेल्स व्यवसायिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 18:49 IST

Thane Newsअनलॉक च्या पाचव्या टप्प्यात  केंद्र व राज्य शासनाने अनेक व्यावसायिकांना सूटदिली आहे ,अखेर हॉटेल आणि बार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे .

 ठाणेहॉटेल्स, बार आणि रेस्टोरेंट ५० टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी,सात नंतरच खरा व्यवसाय असल्याने हॉटेल्स व्यवसायिकांकडून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी परवानगी देऊनही ठाण्यात सोमवारी १० टक्के सुद्धा रेस्टोरेंट आणि बार उघडले नव्हते. मार्चपासून या सर्व आस्थापना बंद असल्याने पुरेसा स्टाफ देखील उपलब्ध नाही , आहेत त्या स्टाफला पूर्ण पगार द्यावा लागलं असल्याने जर संध्याकाळी ७ नंतर हॉटेल्स बंद होणार असतील तर उघडण्यात तरी काय अर्थ आहे असा प्रश्न रेस्टोरेंट व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. 

अनलॉक च्या पाचव्या टप्प्यात  केंद्र व राज्य शासनाने अनेक व्यावसायिकांना सूटदिली आहे ,अखेर हॉटेल आणि बार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे . असे असले तरी केंद्र व राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना निर्णायक अधिकार दिले आहेत ,महापालिका अथवा नगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची व्याप्ती बघून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या अखत्यारीत आवश्यक ते निर्णय घ्यायचे आहेत .ठाणे महापालिका क्षेत्रात हॉटेल आणि  रेस्टॉरंट बार सुरु करताना महापालिकेने काही आवश्यक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून हॉटेल व्यावसायिकांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे,अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार  आहे .ठाणे महापालिकेच्या निर्देशां नुसार व्यावसायिक आपल्या क्षमतेच्या  पन्नास टक्के ग्राहकांना बसण्यास परवानगी देऊ शकतात  तसेच संध्याकाळी सात च्या  आत हॉटेल ,रेस्टॉरंट बंद करणे आवश्यक आहे या निर्णया मुळे हॉटेल  व्यावसायिकां मध्ये नाराजी आहे ,संध्याकाळी सात च्य नंतर हॉटेल रेस्टॉरंट मध्ये ग्राहक येण्यास सुरवात होते असे असताना त्या वेळेत हॉटेलला टाळे कसे मारणार ? असा त्यांचा  प्रश्न  आहे .तसेच निर्धारित वेळेत बनवण्यात आलेले पदार्थ विकले न गेल्यास संध्याकाळी सात नंतर ते पदार्थ फेकून देण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच अवस्था होणार आहे.

दरम्यान हॉटेल रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बरेच हॉटेल व्यावसायिक सध्या लगेच व्यवासाय सुरु करण्याच्या मानसिकतेत नसून कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने त्यांच्या पुढे अडचणींचा डोंगर उभा आहे . मुख्य म्हणजे व्यवसायाला लागणारा  मोठ्या प्रमाणात  कुशल कर्मचारी वर्ग कुठून आणायचा हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. 

हॉटेल्स व्यवसायिकांनी हॉटेल्स केली बंद .... बरेचसे कर्मचारी परराज्यात आपल्या गावी परतले असल्याने त्यांना त्वरित कामावर बोलावणे शक्य होणार नसल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवणार आहे.कोरोना संक्रमण काळात वाढत चाललेला लॉकडाऊनचा कालावधी बघून भाडे तत्वावर असलेल्या हॉटेल मालकांनी भाडे भरण्या पेक्षा हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ठाणे शहरात अनेक हॉटेल बंद झाली आहेत .  ठाणे शहरात हॉटेल रेस्टॉरंट व्यवसाय अनलॉक  असला तरी व्यवसाय पूर्वपदा येण्यास आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक देत आहेत. 

मॉलमधील आस्थापनांना मात्र रात्री ११ पर्यंतची वेळ ... शहरातील हॉटेल्स,बार आणि रेस्टोरेंटला एकीकडे ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंतच व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी दुसरीकडे मॉलमधील आस्थापनांना मात्र वेगळे नियम आहेत का ? असा प्रश्न हॉटेल्स व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. मॉल मधील काही आस्थापनांच्या वतीने रात्री ११ पर्यंत आस्थापना सुरु राहणार असल्याचे फलक लावण्यात आले असल्याची माहिती हॉटेल्स व्यवसायिकांनी दिली आहे. 

व्यवसाय करायचा कसा ?" एक तर मार्च पासून हॉटेल्स बंद आहेत त्यामुळे स्टाफ देखील पुरेसा नाही. याशिवाय संध्यकाळी ७ नंतरच ग्राहक येण्याची वेळ असल्याने यावेळीच जर हॉटेल्स बंद करायची आहेत तर मग कोणता व्यवसायिक हॉटेल्स उघडेल. त्यामुळे बहुतांश व्यवसायिकांनी हॉटेल्स न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात व्यवसायिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून किमान रात्री ९ पर्यंत तरी परवानगी द्यावी . - रत्नाकर शेट्टी, सदस्य, ठाणे हॉटेल्स ओनर्स असोशिएशन

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेलthaneठाणे