शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ठाण्यात दहा टक्केच रेस्टॉरंट्स, बार उघडले; संध्याकाळी ७ नंतरच्या बंदच्या आदेशाने हॉटेल्स व्यवसायिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 18:49 IST

Thane Newsअनलॉक च्या पाचव्या टप्प्यात  केंद्र व राज्य शासनाने अनेक व्यावसायिकांना सूटदिली आहे ,अखेर हॉटेल आणि बार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे .

 ठाणेहॉटेल्स, बार आणि रेस्टोरेंट ५० टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी,सात नंतरच खरा व्यवसाय असल्याने हॉटेल्स व्यवसायिकांकडून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी परवानगी देऊनही ठाण्यात सोमवारी १० टक्के सुद्धा रेस्टोरेंट आणि बार उघडले नव्हते. मार्चपासून या सर्व आस्थापना बंद असल्याने पुरेसा स्टाफ देखील उपलब्ध नाही , आहेत त्या स्टाफला पूर्ण पगार द्यावा लागलं असल्याने जर संध्याकाळी ७ नंतर हॉटेल्स बंद होणार असतील तर उघडण्यात तरी काय अर्थ आहे असा प्रश्न रेस्टोरेंट व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. 

अनलॉक च्या पाचव्या टप्प्यात  केंद्र व राज्य शासनाने अनेक व्यावसायिकांना सूटदिली आहे ,अखेर हॉटेल आणि बार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे . असे असले तरी केंद्र व राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना निर्णायक अधिकार दिले आहेत ,महापालिका अथवा नगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची व्याप्ती बघून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या अखत्यारीत आवश्यक ते निर्णय घ्यायचे आहेत .ठाणे महापालिका क्षेत्रात हॉटेल आणि  रेस्टॉरंट बार सुरु करताना महापालिकेने काही आवश्यक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून हॉटेल व्यावसायिकांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे,अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार  आहे .ठाणे महापालिकेच्या निर्देशां नुसार व्यावसायिक आपल्या क्षमतेच्या  पन्नास टक्के ग्राहकांना बसण्यास परवानगी देऊ शकतात  तसेच संध्याकाळी सात च्या  आत हॉटेल ,रेस्टॉरंट बंद करणे आवश्यक आहे या निर्णया मुळे हॉटेल  व्यावसायिकां मध्ये नाराजी आहे ,संध्याकाळी सात च्य नंतर हॉटेल रेस्टॉरंट मध्ये ग्राहक येण्यास सुरवात होते असे असताना त्या वेळेत हॉटेलला टाळे कसे मारणार ? असा त्यांचा  प्रश्न  आहे .तसेच निर्धारित वेळेत बनवण्यात आलेले पदार्थ विकले न गेल्यास संध्याकाळी सात नंतर ते पदार्थ फेकून देण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच अवस्था होणार आहे.

दरम्यान हॉटेल रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बरेच हॉटेल व्यावसायिक सध्या लगेच व्यवासाय सुरु करण्याच्या मानसिकतेत नसून कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने त्यांच्या पुढे अडचणींचा डोंगर उभा आहे . मुख्य म्हणजे व्यवसायाला लागणारा  मोठ्या प्रमाणात  कुशल कर्मचारी वर्ग कुठून आणायचा हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. 

हॉटेल्स व्यवसायिकांनी हॉटेल्स केली बंद .... बरेचसे कर्मचारी परराज्यात आपल्या गावी परतले असल्याने त्यांना त्वरित कामावर बोलावणे शक्य होणार नसल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवणार आहे.कोरोना संक्रमण काळात वाढत चाललेला लॉकडाऊनचा कालावधी बघून भाडे तत्वावर असलेल्या हॉटेल मालकांनी भाडे भरण्या पेक्षा हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ठाणे शहरात अनेक हॉटेल बंद झाली आहेत .  ठाणे शहरात हॉटेल रेस्टॉरंट व्यवसाय अनलॉक  असला तरी व्यवसाय पूर्वपदा येण्यास आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक देत आहेत. 

मॉलमधील आस्थापनांना मात्र रात्री ११ पर्यंतची वेळ ... शहरातील हॉटेल्स,बार आणि रेस्टोरेंटला एकीकडे ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंतच व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी दुसरीकडे मॉलमधील आस्थापनांना मात्र वेगळे नियम आहेत का ? असा प्रश्न हॉटेल्स व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. मॉल मधील काही आस्थापनांच्या वतीने रात्री ११ पर्यंत आस्थापना सुरु राहणार असल्याचे फलक लावण्यात आले असल्याची माहिती हॉटेल्स व्यवसायिकांनी दिली आहे. 

व्यवसाय करायचा कसा ?" एक तर मार्च पासून हॉटेल्स बंद आहेत त्यामुळे स्टाफ देखील पुरेसा नाही. याशिवाय संध्यकाळी ७ नंतरच ग्राहक येण्याची वेळ असल्याने यावेळीच जर हॉटेल्स बंद करायची आहेत तर मग कोणता व्यवसायिक हॉटेल्स उघडेल. त्यामुळे बहुतांश व्यवसायिकांनी हॉटेल्स न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात व्यवसायिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून किमान रात्री ९ पर्यंत तरी परवानगी द्यावी . - रत्नाकर शेट्टी, सदस्य, ठाणे हॉटेल्स ओनर्स असोशिएशन

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेलthaneठाणे