शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
4
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
5
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
6
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
7
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
8
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
11
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
14
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
15
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
16
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
17
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
18
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
19
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
20
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे केवळ आश्वासन, तीन वर्षे होऊन मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 01:17 IST

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राची वास्तू बांधून तयार आहे. मात्र, तीन वर्षांपासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्याची तारीख विद्यापीठाकडून दिली जात आहे.

कल्याण - मुंबई विद्यापीठाच्याकल्याण उपकेंद्राची वास्तू बांधून तयार आहे. मात्र, तीन वर्षांपासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्याची तारीख विद्यापीठाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात एकही डेडलाइन विद्यापीठाने पाळलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला दिलेली महापालिकेची जागा परत घेण्याचे हत्यार शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपसले आहे.कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर व शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर आणि रमेश जाधव हे विद्यापीठाला दिलेली जागा परत घेण्याचा ठराव येत्या महासभेत मांडणार आहेत. तसेच उपकेंद्र सुरू होत नसल्याने देवळेकर व जाधव हे याप्रकरणी युवासेनाप्रमुख ठाकरे यांची भेट घेणार आहेत.उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारा परिसरांतील विद्यार्थ्यांना सांताक्रूझ येथील कलिना विद्यापीठात जावे लागते. परंतु, हे अंतर लांब असल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे कल्याण येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू केल्यास विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल, या उद्देशाने विद्यापीठाचे उपकेंद्र पश्चिमेतील वायलेनगरातील वसंत व्हॅली संकुलासमोर सुरू करण्यास मान्यता दिली गेली. महापालिकेने त्यासाठी १० एकरांचा भूखंड विद्यापीठाला मोफत दिला. विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या वास्तूचे भूमिपूजन २०१० मध्ये तत्कालीन उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. मात्र, उपकेंद्राच्या इमारतीचे काम २०१६ अखेरीस पूर्णत्वास आले. विद्यापीठाने त्यावर जवळपास २० कोटी रुपये खर्च केले आहेत. आणखी २० कोटींचे काम प्रस्तावित आहे. कंत्राटदाराला विद्यापीठाकडून बिल दिले जात नसल्याने काही कामे रखडली होती. तत्कालीन कुलगुरू डॉ. राजन वेळूकर तसेच त्यानंतर डॉ. संजय देशमुख यांनीही हे उपकेंद्र लवकरच सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, डॉ. देशमुख यांच्या कार्यकाळात पेपरतपासणी व विलंबाने लागलेला निकाल, यामुळे त्यांची कुलगुरूपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्याचकाळात एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हे उपकेंद्र सुरू केले जाणार नसेल, तर महापालिकेने विद्यापीठाला दिलेला भूखंड परत घ्यावा, असा इशारा दिला होता. त्यानंतर, पुन्हा हालचाली सुरू झाल्या. त्यालाही ब्रेक लागल्यावर शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील वायले यांनी जागा परत घेण्यासाठी पत्रव्यवहार केला.नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी जून २०१८ मध्ये त्याची दखल घेत केडीएमसीचे आयुक्त व महापौरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आम्ही हे उपकेंद्र तीन महिन्यांत सुरू करू, असे आश्वासन दिले होेते. मात्र, तेही हवेत विरले आहे. २०१९ चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरी येथे अद्याप पदव्युत्तर विभाग सुरू झालेला नाही.स्कूल आॅफ इंजिनीअरिंगसाठी हवा निधीकल्याणचे विद्यापीठ उपकेंद्र हे परदेशातील स्कूल आॅफ इंजिनीअरिंगच्या धर्तीवर सुरू करायचे आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे, असे मत विद्यापीठाचे डॉ. प्रशांत उकरांडे यांनी डोंबिवलीत डिसेंबरमध्ये झालेल्या एका परिसंवादप्रसंगी व्यक्त केले होते. यावेळी माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्रही उपस्थित होते.ठाण्यातील उपकेंद्रात स्कूल आॅफ इंजिनीअरिंग सुरू करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निधी देण्यास अनुकूलता दर्शवली होती. त्याच धर्तीवर केडीएमसी आयुक्त व महापौरांनी निधी देण्याचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली होती.इंजिनीअरिंग विभागाचा ना-हरकत दाखला मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय कल्याणचे उपकेंद्र सुरू करता येत नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठkalyanकल्याण