शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

कांद्याने केले शतक पार, खरेदी-विक्री घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 02:53 IST

अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे.

ठाणे : अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे. जुना कांदा संपत आल्याने आणि नव्या कांद्याचा दर्जा खालावल्याने कांद्याची आवक प्रचंड घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे कांदाविक्रेत्यांनी लोकमतला सांगितले.अवकाळी पावसाने कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओतूर, जुन्नर, नगर या ठिकाणांहून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याची आवक होत असते. जुना कांदा आता संपत आला आहे. जुन्या कांद्याचे प्रमाण पाच ते १० टक्क्यांवरून आता एक ते दोन टक्क्यांवर आले आहे. विक्रेत्यांकडे आता इतकाच जुना कांदा शिल्लक आहे. अशातच अवकाळी पावसाचा फटका नवीन कांद्याला बसल्यामुळे नवीन कांदाही चांगला येत नाही. एकूणच परिस्थितीमुळे कांद्याची आवक ५० टक्के घटली असल्याची माहिती कांदाविक्रेते संदीप चौधरी यांनी दिली.२२ आॅक्टोबरपासून बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ होत गेली. त्यावेळी कांदा किरकोळ बाजारात ५० रुपये, तर होलसेल बाजारात ४० रुपये किलो, चार ते पाच दिवसांनंतर हाच कांदा १० रुपयांनी वाढून किरकोळ बाजारात ६० रुपये, तर होलसेल बाजारात ५० रुपये किलोवर भाव पोहोचले. ३० आॅक्टोबर रोजी पुन्हा कांद्याचे दर वाढून किरकोळ बाजारात ७० आणि होलसेल बाजारात ६० रुपये किलो दराने कांदा विकला जाऊ लागला.४ नोव्हेंबरपासून हाच कांदा होलसेल बाजारात ६५ ते ७० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने विकला जात होता. काही दिवसांनी कांद्याचे दर पुन्हा कडाडले. ठाण्याच्या होलसेल बाजारात जुना कांदा ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने तसेच नवीन कांदा होलसेल बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. रविवारी होलसेल बाजारात जुना कांदा ९0 ते १00 रुपये, तर किरकोळ बाजारात हाच कांदा १00 ते ११0 रुपये किलोने विकला गेला. नवीन कांदा होलसेल बाजारपेठेत ७0 ते ८0 रुपये आणि किरकोळ बाजारपेठेते ९0 ते १00 रुपये किलोप्रमाणे विकला. नवीन कांद्याचा दर्जा चांगला नसल्याने ५० टक्के चांगला आणि ५० टक्के खराब कांदा येत आहे. कांद्याचे दर कमी व्हायला कमीतकमी एक महिना तरी जाईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.मागणीत मोठी घसरणहॉटेलवाल्यांना एरव्ही दररोज १० कांद्याच्या गोण्या विकल्या जात होत्या. आता तीन ते चार गोण्याच जात आहेत. ठाणे शहरात एरव्ही १५०० ते १६०० टन कांदा दररोज विकला जातो. परंतु, सध्या १०० टनच विकला जात असल्याचे कांदा विक्रेते संदीप चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदाMarketबाजारthaneठाणे