शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कांद्याने केले शतक पार, खरेदी-विक्री घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 02:53 IST

अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे.

ठाणे : अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे. जुना कांदा संपत आल्याने आणि नव्या कांद्याचा दर्जा खालावल्याने कांद्याची आवक प्रचंड घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे कांदाविक्रेत्यांनी लोकमतला सांगितले.अवकाळी पावसाने कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओतूर, जुन्नर, नगर या ठिकाणांहून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याची आवक होत असते. जुना कांदा आता संपत आला आहे. जुन्या कांद्याचे प्रमाण पाच ते १० टक्क्यांवरून आता एक ते दोन टक्क्यांवर आले आहे. विक्रेत्यांकडे आता इतकाच जुना कांदा शिल्लक आहे. अशातच अवकाळी पावसाचा फटका नवीन कांद्याला बसल्यामुळे नवीन कांदाही चांगला येत नाही. एकूणच परिस्थितीमुळे कांद्याची आवक ५० टक्के घटली असल्याची माहिती कांदाविक्रेते संदीप चौधरी यांनी दिली.२२ आॅक्टोबरपासून बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ होत गेली. त्यावेळी कांदा किरकोळ बाजारात ५० रुपये, तर होलसेल बाजारात ४० रुपये किलो, चार ते पाच दिवसांनंतर हाच कांदा १० रुपयांनी वाढून किरकोळ बाजारात ६० रुपये, तर होलसेल बाजारात ५० रुपये किलोवर भाव पोहोचले. ३० आॅक्टोबर रोजी पुन्हा कांद्याचे दर वाढून किरकोळ बाजारात ७० आणि होलसेल बाजारात ६० रुपये किलो दराने कांदा विकला जाऊ लागला.४ नोव्हेंबरपासून हाच कांदा होलसेल बाजारात ६५ ते ७० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने विकला जात होता. काही दिवसांनी कांद्याचे दर पुन्हा कडाडले. ठाण्याच्या होलसेल बाजारात जुना कांदा ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने तसेच नवीन कांदा होलसेल बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. रविवारी होलसेल बाजारात जुना कांदा ९0 ते १00 रुपये, तर किरकोळ बाजारात हाच कांदा १00 ते ११0 रुपये किलोने विकला गेला. नवीन कांदा होलसेल बाजारपेठेत ७0 ते ८0 रुपये आणि किरकोळ बाजारपेठेते ९0 ते १00 रुपये किलोप्रमाणे विकला. नवीन कांद्याचा दर्जा चांगला नसल्याने ५० टक्के चांगला आणि ५० टक्के खराब कांदा येत आहे. कांद्याचे दर कमी व्हायला कमीतकमी एक महिना तरी जाईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.मागणीत मोठी घसरणहॉटेलवाल्यांना एरव्ही दररोज १० कांद्याच्या गोण्या विकल्या जात होत्या. आता तीन ते चार गोण्याच जात आहेत. ठाणे शहरात एरव्ही १५०० ते १६०० टन कांदा दररोज विकला जातो. परंतु, सध्या १०० टनच विकला जात असल्याचे कांदा विक्रेते संदीप चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदाMarketबाजारthaneठाणे