शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

कांद्याने केले शतक पार, खरेदी-विक्री घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 02:53 IST

अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे.

ठाणे : अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे. जुना कांदा संपत आल्याने आणि नव्या कांद्याचा दर्जा खालावल्याने कांद्याची आवक प्रचंड घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे कांदाविक्रेत्यांनी लोकमतला सांगितले.अवकाळी पावसाने कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओतूर, जुन्नर, नगर या ठिकाणांहून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याची आवक होत असते. जुना कांदा आता संपत आला आहे. जुन्या कांद्याचे प्रमाण पाच ते १० टक्क्यांवरून आता एक ते दोन टक्क्यांवर आले आहे. विक्रेत्यांकडे आता इतकाच जुना कांदा शिल्लक आहे. अशातच अवकाळी पावसाचा फटका नवीन कांद्याला बसल्यामुळे नवीन कांदाही चांगला येत नाही. एकूणच परिस्थितीमुळे कांद्याची आवक ५० टक्के घटली असल्याची माहिती कांदाविक्रेते संदीप चौधरी यांनी दिली.२२ आॅक्टोबरपासून बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ होत गेली. त्यावेळी कांदा किरकोळ बाजारात ५० रुपये, तर होलसेल बाजारात ४० रुपये किलो, चार ते पाच दिवसांनंतर हाच कांदा १० रुपयांनी वाढून किरकोळ बाजारात ६० रुपये, तर होलसेल बाजारात ५० रुपये किलोवर भाव पोहोचले. ३० आॅक्टोबर रोजी पुन्हा कांद्याचे दर वाढून किरकोळ बाजारात ७० आणि होलसेल बाजारात ६० रुपये किलो दराने कांदा विकला जाऊ लागला.४ नोव्हेंबरपासून हाच कांदा होलसेल बाजारात ६५ ते ७० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने विकला जात होता. काही दिवसांनी कांद्याचे दर पुन्हा कडाडले. ठाण्याच्या होलसेल बाजारात जुना कांदा ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने तसेच नवीन कांदा होलसेल बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. रविवारी होलसेल बाजारात जुना कांदा ९0 ते १00 रुपये, तर किरकोळ बाजारात हाच कांदा १00 ते ११0 रुपये किलोने विकला गेला. नवीन कांदा होलसेल बाजारपेठेत ७0 ते ८0 रुपये आणि किरकोळ बाजारपेठेते ९0 ते १00 रुपये किलोप्रमाणे विकला. नवीन कांद्याचा दर्जा चांगला नसल्याने ५० टक्के चांगला आणि ५० टक्के खराब कांदा येत आहे. कांद्याचे दर कमी व्हायला कमीतकमी एक महिना तरी जाईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.मागणीत मोठी घसरणहॉटेलवाल्यांना एरव्ही दररोज १० कांद्याच्या गोण्या विकल्या जात होत्या. आता तीन ते चार गोण्याच जात आहेत. ठाणे शहरात एरव्ही १५०० ते १६०० टन कांदा दररोज विकला जातो. परंतु, सध्या १०० टनच विकला जात असल्याचे कांदा विक्रेते संदीप चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदाMarketबाजारthaneठाणे