शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अर्धे शतक पार; नवे पीक न आल्याने जुन्या कांद्याने खाल्ला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 23:54 IST

लॉकडाऊनमध्ये कांद्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कांद्याचे दर वाढले की गृहिणींचे बजेटच कोलमडते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढत चालले असून मंगळवारी त्याच्या दराने अर्धे शतक पार केले. पावसामुळे नवीन कांदा न आल्याने आणि जुना खराब झाल्याने तो संपत आला आहे. यामुळे वाढत्या मागणीने कांद्याचे दरही वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये कांद्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कांद्याचे दर वाढले की गृहिणींचे बजेटच कोलमडते. कांदा निर्यातीवर सरकारने बंदी आणल्यानंतर कांद्याचे दर कमी होतील अशी अपेक्षा असली तरी मुंबई, ठाण्यामध्ये कांद्याच्या दराची परिस्थिती वेगळी आहे.१३ आॅगस्टपासून होलसेल आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढू लागले असले तरी सप्टेंबर महिन्यात जास्तच भाव खाल्ला आहे. मंगळवारी ठाण्याच्या बाजारपेठेत कांदा तब्बल ५० ते ६० रुपये प्रतीकिलो या भावाने विकला गेला.

बाजारपेठेत नवीन कांदा आलेला नाही. जून महिन्यात चांगलाच वादळी पाऊस झाला होता. त्याचा विपरीत परिणाम कांद्यावर झाल्याने उपलब्ध असलेला जुना कांदा हा खराब झाला आहे. त्यामुळे तो संपत आल्याने बाजापरेठेत ग्राहकांकडून मागणी जास्त आणि त्या तुलनेत पुरवठा मात्र कमी अशी परिस्थिती कांद्याच्या बाजारपेठेत असल्याने त्याचे दर सद्य:स्थितीत चांगलेच कडाडले आहेत. दीड महिना तरी नवीन पीक येणार नाही़ यामुळे कांदे महागच राहतील, असे कांद्याच्या विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ठाणे बाजारपेठेतील कांद्याच्या दराचा चढता आलेखतारिख होलसेल किरकोळ१३ ते २० आॅगस्ट १० ते १२ १५ ते २०२० ते ३० आॅगस्ट १५ ते १६ २० ते २५१ ते १० सप्टेंबर २० ते २५ ३० ते ३५१० ते १९ सप्टेंबर २५ ते ३२ ३५ ते ४०आजचा भाव (२० सप्टेंबर) ४० ते ४३ ५० ते ६०जुुना कांदा १० ते १५ टक्केच उपलब्ध आहे. नवीन पीक येईपर्यंत जुनाच कांदा विकायचा आहे. लॉकडाऊनमध्ये बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची निगा राखली नाही. त्यात वादळी पाऊस झाल्याने तो खराब होत गेला. त्यामुळे नुकसान जास्त झाले आणि त्याचे भाव वाढले.- संदीप चौधरी,विक्रेते, ठाणेआॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात कर्नाटकमधून कांदा राज्यात येतो. परंतु, पावसामुळे तो खराब झाल्याने बाजारात येऊ शकत नाही. तसेच, कांदा बी तयार करणाºया कंपन्याही चांगल्या दर्जाचे कांदे मागत आहेत. त्यांना महाग असले तरी चांगले कांदे हवे आहेत. त्यामुळे कंपन्या आणि ग्राहकांकडून मागणी आणि जुन्या कांद्याचा संपत आलेला माल यामुळे भाव वाढलेत.- शिवप्रसाद गोळवा, व्यापारी, आळेफाटा

टॅग्स :onionकांदा