शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मंदीमुळे कारखान्यांना एक हजार कोटींचा तोटा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:33 IST

डोंबिवली, अंबरनाथमध्ये उद्योग डबघाईला : उत्पादनांच्या आॅर्डर ३० टक्क्यांनी घटल्याचा केला दावा; कारखानदार कठोर निर्णय घेणार?

मुरलीधर भवारकल्याण : जागतिक मंदीचा फटका कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील औद्योगिक कारखान्यांना बसायला सुरुवात झाली असून या कारखान्यांतील उत्पादनाच्या आॅर्डर ३० टक्क्यांनी घटल्याने कारखान्यांना या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे काही कारखान्यांच्या मालकांपुढे कामगारांचा पगार कुठून द्यायचा, असा प्रश्न उभा आहे. सध्या कारखानदारांनी कामगारांना ‘ले आॅफ’ अथवा ‘ब्रेक’ दिलेला नसला, तरी लागलीच आर्थिक परिस्थिती सुधारली नाही तर भविष्यात अनेक कटू निर्णय घेण्याची वेळ कारखान्यांच्या मालकांवर येऊ शकते. काही कारखानदारांनी कामगारांना गणपतीची सुटी दिली आहे.कल्याण, अंबरनाथ कारखानदार संघटनेचे सभासद ७५० कारखानामालक आहेत. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात जवळपास एक हजारच्या आसपास कारखाने आहे. त्यापैकी ४३२ कारखाने हे केवळ डोंबिवली औद्योगिक परिसरात आहेत. त्यामध्ये टेक्सटाइल्स, इंजिनीअरिंग, फॅब्रिकेशन, औषध कंपन्या, रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. या औद्योगिक कारखान्यांत जवळपास ७५ हजार कामगार काम करतात. या कंपन्यांना लहान आकाराचे सुटे पार्ट पुरवणारे छोटे उद्योजकही आहेत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या ३० हजार आहे. ठाणे जिल्ह्यातील या औद्योगिक क्षेत्राला जागतिक मंदीची झळ बसायला सुरुवात झाल्याने एक लाख पाच हजार कामगारांची रोजीरोटी धोक्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले की, सध्या ३० टक्के आॅर्डर घटल्या आहे. ही स्थिती सुधारली नाही, तर पुढे काय होईल, याविषयी अनिश्चिततेचे वातावरण आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून कामगारांना अद्याप कारखानामालकांनी घरी बसवले नाही. गणपतीची सुट्टी दिली आहे. ७० टक्के कारखान्यांत ही स्थिती आहे. आॅर्डर मिळाली नाही. तयार केलेले उत्पादन विकले गेले नाही तर कामगारांचा पगार कुठून द्यायचा आणि प्लांट कसा चालवायचा, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे.जीएसटी कमी केल्यास फरक पडेल?संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी म्हणाले की, मी संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याचबरोबर माझा कारखाना आहे. माझ्याकडे बॉयलर तयार करण्याच्या आॅर्डर येत नाहीत. काही कारखानदारांच्या मते जीएसटी कमी केल्यावर फरक जाणवेल. मात्र, जीएसटी कमी करूनही मंदीची झळ काही कमी होणार नाही.मंदीची झळ सुरू असताना केडीएमसी आणि औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक परिसरात चांगले रस्ते करून देत नाही. एखादा ४० टन वजनाचा स्क्रॅपचा ट्रक कळंबोलीवरून डोंबिवलीत यायचा असेल, तर ट्रकचा चालक १० हजार रुपये जास्तीचे भाडे मागतो. कोंडी आणि खराब रस्त्यामुळे ही जास्तीच्या भाड्याची मागणी होते.अलीकडेच डोंबिवलीतील रस्त्यांसाठी ४०० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झाल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्या रस्त्यांच्या यादीत औद्योगिक विभागातील एकही रस्ता नाही. औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना रस्त्याच्या सुविधेपासून वाळीत टाकले आहे का व कारखानदार मतदार नाही का, असा त्यांचा सवाल आहे. 

टॅग्स :thaneठाणेGSTजीएसटीEconomyअर्थव्यवस्था