शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

मंदीमुळे कारखान्यांना एक हजार कोटींचा तोटा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:33 IST

डोंबिवली, अंबरनाथमध्ये उद्योग डबघाईला : उत्पादनांच्या आॅर्डर ३० टक्क्यांनी घटल्याचा केला दावा; कारखानदार कठोर निर्णय घेणार?

मुरलीधर भवारकल्याण : जागतिक मंदीचा फटका कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील औद्योगिक कारखान्यांना बसायला सुरुवात झाली असून या कारखान्यांतील उत्पादनाच्या आॅर्डर ३० टक्क्यांनी घटल्याने कारखान्यांना या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे काही कारखान्यांच्या मालकांपुढे कामगारांचा पगार कुठून द्यायचा, असा प्रश्न उभा आहे. सध्या कारखानदारांनी कामगारांना ‘ले आॅफ’ अथवा ‘ब्रेक’ दिलेला नसला, तरी लागलीच आर्थिक परिस्थिती सुधारली नाही तर भविष्यात अनेक कटू निर्णय घेण्याची वेळ कारखान्यांच्या मालकांवर येऊ शकते. काही कारखानदारांनी कामगारांना गणपतीची सुटी दिली आहे.कल्याण, अंबरनाथ कारखानदार संघटनेचे सभासद ७५० कारखानामालक आहेत. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात जवळपास एक हजारच्या आसपास कारखाने आहे. त्यापैकी ४३२ कारखाने हे केवळ डोंबिवली औद्योगिक परिसरात आहेत. त्यामध्ये टेक्सटाइल्स, इंजिनीअरिंग, फॅब्रिकेशन, औषध कंपन्या, रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. या औद्योगिक कारखान्यांत जवळपास ७५ हजार कामगार काम करतात. या कंपन्यांना लहान आकाराचे सुटे पार्ट पुरवणारे छोटे उद्योजकही आहेत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या ३० हजार आहे. ठाणे जिल्ह्यातील या औद्योगिक क्षेत्राला जागतिक मंदीची झळ बसायला सुरुवात झाल्याने एक लाख पाच हजार कामगारांची रोजीरोटी धोक्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले की, सध्या ३० टक्के आॅर्डर घटल्या आहे. ही स्थिती सुधारली नाही, तर पुढे काय होईल, याविषयी अनिश्चिततेचे वातावरण आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून कामगारांना अद्याप कारखानामालकांनी घरी बसवले नाही. गणपतीची सुट्टी दिली आहे. ७० टक्के कारखान्यांत ही स्थिती आहे. आॅर्डर मिळाली नाही. तयार केलेले उत्पादन विकले गेले नाही तर कामगारांचा पगार कुठून द्यायचा आणि प्लांट कसा चालवायचा, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे.जीएसटी कमी केल्यास फरक पडेल?संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी म्हणाले की, मी संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याचबरोबर माझा कारखाना आहे. माझ्याकडे बॉयलर तयार करण्याच्या आॅर्डर येत नाहीत. काही कारखानदारांच्या मते जीएसटी कमी केल्यावर फरक जाणवेल. मात्र, जीएसटी कमी करूनही मंदीची झळ काही कमी होणार नाही.मंदीची झळ सुरू असताना केडीएमसी आणि औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक परिसरात चांगले रस्ते करून देत नाही. एखादा ४० टन वजनाचा स्क्रॅपचा ट्रक कळंबोलीवरून डोंबिवलीत यायचा असेल, तर ट्रकचा चालक १० हजार रुपये जास्तीचे भाडे मागतो. कोंडी आणि खराब रस्त्यामुळे ही जास्तीच्या भाड्याची मागणी होते.अलीकडेच डोंबिवलीतील रस्त्यांसाठी ४०० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झाल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्या रस्त्यांच्या यादीत औद्योगिक विभागातील एकही रस्ता नाही. औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना रस्त्याच्या सुविधेपासून वाळीत टाकले आहे का व कारखानदार मतदार नाही का, असा त्यांचा सवाल आहे. 

टॅग्स :thaneठाणेGSTजीएसटीEconomyअर्थव्यवस्था