शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील दोन भावांचं मलेशियात अपहरण; सुटकेसाठी एक कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 06:52 IST

परदेशात व्यापारासाठी गेलेल्या कौस्तुभ वैद्य व रोहन वैद्य या दोन भावांचे मलेशियात अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.

डोंबिवली : परदेशात व्यापारासाठी गेलेल्या कौस्तुभ वैद्य व रोहन वैद्य या दोन भावांचे मलेशियात अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.डोंबिवलीत राहणाऱ्या वैद्य बंधूंची रॉक फ्रोझन फूड नावाची कंपनी असून फ्रोजन फूड डिमांड आणि सप्लाय हा त्यांचा व्यवसाय आहे. विशेषकरून मलेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांत दोन्ही बंधूंचे व्यवसायानिमित्त येणेजाणे असते.काही दिवसांपूर्वीच वैद्य बंधूंच्या रॉक फ्रोजन फूड्स कंपनीला मलेशियातील ग्राहक मिस ली फ्रोझन फूड्स यांच्याकडून व्यवसायाकरिता फोन आला. फोन आणि मेलवरून औपचारिक व्यवहार पूर्ण झाल्यावर १ आॅगस्टला उरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी रोहन आणि कौस्तुभ मलिंडो एअर लाइन्सच्या विमानाने मलेशियाला गेले. तेथे ते दोघे ग्रॅण्ड आर्चेड नावाच्या हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती कौस्तुभने आपली पत्नी सायली यांना दिली. ठरल्याप्रमाणे २ आॅगस्टच्या दुपारी मलेशियातील ग्राहक मिस ली फ्रोजन फूडसोबत मीटिंग झाल्याचेही कौस्तुभने आपल्या पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर कळवले. त्यानंतर, संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मिस ली फ्रोजन फूडच्या प्रतिनिधींसोबत मीटिंग असून मीटिंगनंतर जेवणार असल्याचे कौस्तुभने पत्नीला कळवले.दि. २ आॅगस्टच्या रात्री साडेदहा वाजता रोहन आणि कौस्तुभचे वडील प्रकाश वैद्य यांच्या फोनवर मलेशिया येथील +६०११५१२२४९३६ या नंबरवरून फोन आला आणि पलीकडून घाबरलेल्या आवाजात कौस्तुभ बोलत होता. ‘‘आमचं अपहरण झालं आहे. एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे...’’ हा फोन येताच प्रकाश यांनी लगेच मलेशिया दूतावासाला फोन करून मुलांच्या अपहरणाची माहिती दिली. त्यांनी स्थानिक मलेशियन पोलिसांना तक्र ार करण्यास सांगितले.यानंतरच, दि. ३ आॅगस्टच्या रात्री १०.२६ ते ११.०२ पर्यंत रोहनने वडील प्रकाश यांच्या +६०१९५५६८१०४ या नंबरवरून ११ फोन कॉल केले. प्रत्येक फोन कॉल २८ सेकंदांचा होता. यामध्ये रोहन आम्ही ४८ तासांत परत येतोय एवढंच सांगत होता.दरम्यान, कौस्तुभच्या बँक खात्यातून २५ हजार रुपये काढण्यात आले. त्यानंतर, अपहरणकर्त्याने फोन करून ०४१३२३८५४७ हा फोन नंबर दिला आणि या नंबरवरून जी व्यक्ती फोन करील आणि ती जो बँक अकाउंट नंबर सांगेल, त्या अकाउंटमध्ये एक कोटी रूपये ट्रान्सफर करायला सांगितले. पण, वरील नंबरवरून अजूनही फोन आला नाही आणि कौस्तुभ तसेच रोहनचादेखील पुन्हा फोन आलेला नाही.याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कझाला आहे. मात्र, रोहन आणि कौस्तुभचे अपहरण नक्की कोणत्या कारणांमुळे झाले? अपहरणकर्ता कोण? याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.>कुटुंबाचे वाटेकडे लक्षया दोघांच्या अपहरणाची बातमी कळताच वैद्य कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, दोनतीन दिवसांपासून त्यांच्या घरी नातेवाइकांची रीघ लागली आहे. त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Kidnappingअपहरणdombivaliडोंबिवली