शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उल्हासनगरातील वालधुनी नदीत  पडून एक इसम गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 23:00 IST

वडोलगाव व उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी नदीच्या पुलावरून एक व्यक्ती पडून वाहून गेला. रात्री साडे नऊ वाजता घटना घडली.

उल्हासनगर - वडोलगाव व उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी नदीच्या पुलावरून एक व्यक्ती पडून वाहून गेला. रात्री साडे नऊ वाजता घटना घडली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्र असल्याने उद्या सकाळी शोध घेणार आहेत.वडोलगावला जोडणारा वालधुनी पूल गेल्या वर्षी कोसळल्याने, पालिकेने नवीन  पूल बांधणीला पालिकेने परवानगी दिली.

तसेच गावकऱ्यांसह शालेय मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा कच्चा पुल बांधला. पावसाळ्या पूर्वी नवीन पूल बांधण्याची अट होती. मात्र पुलाच्या सल्लागाराने पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. असा अहवाल पालिका आयुतांना दिल्यावर, तत्कालीन आयुक सुधाकर शिंदे यांनी  सुरक्षाची उपाय म्हणून पुलाचे काम बंद केले. त्याच दरम्यान पावसाळ्यात नदीवर बांधलेला पूल वाहून गेला. 

वडोलगावातील नागरिकांना 3 की.मी. चा वळसा घेउन शहरात यावे लागत असे. पालिकेने गावकरी व शालेय मुलांसाठी मोफत बससेवा चालू केली. मात्र गावकऱ्यांनी बस नको, पुलच हवा. अशी मागणी करून बस सेवा ठप्प पाडली. तसेच स्वखर्चाने व श्रमाने पुन्हा सिमेंटचा कच्चा पूल बांधला. त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू केली. तसेच अर्धवट पुलाचे काम सोमवार पासून सुरू झाले. यापूर्वी पुला अभावी एक लहान मुलांचा पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर एक तरुणांचा गावात रेल्वे रुळावरून जात असताना अपघात होउन मूत्यू झाला आहे.

याप्रकाराने गावात पालिके बाबत संताप व्यक्त होत आहे. पुन्हा शनिवारी रात्री साडे नऊ वाजता एक इसम सिमेंटच्या पुलावरून जात असताना नदीत पडून वाहून गेला. त्याचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांनी काहीवेळ घेतल्याची माहिती स्थानिक नगरसेवक गजानन शेळके यांनी दिली. अंधारामुळे अग्निशमन दलाचे जवान परत गेले असून सकाळी नदी पात्रात शोध घेणार आहेत.