शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी एक कोटीची जेवणावळ, डाळभातासह लाडूंची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 06:08 IST

भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांसाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी मतदानाचा हक्क मिळालेले ६२ लाख २५ हजार १९४ मतदार सहा हजार ७१५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत

ठाणे : भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांसाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी मतदानाचा हक्क मिळालेले ६२ लाख २५ हजार १९४ मतदार सहा हजार ७१५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. त्यांच्या सेवेसाठी मतदानकेंद्रांवरील अधिकारी- कर्मचारी व जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या निवडणूक यंत्रणेचे कार्यालयांमधील कर्मचारी अशा सुमारे ६७ हजार कर्मचाऱ्यांच्या जेवणावळीवर सुमारे एक कोटी रुपये खर्च होणार आहेत.

एका मतदानकेंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यावरील नियंत्रण व व्यवस्थापन आदी १० जणांचे मनुष्यबळ एका केंद्रासाठी नियोजित असल्याचे जिल्हा उपनिवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांनी सांगितले. या अधिकारी, कर्मचाºयांना मतदानाच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे १५० रुपये भोजनभत्ता मिळतो. त्यातूनच, ही भोजनव्यवस्था करण्यात आल्याचे सोमाणी यांनी नमूद केले. त्यांना फूड पॅकेट दिले जाणार आहेत. संध्याकाळी ईव्हीएम मशीन व अन्य साहित्य जमा करण्यासाठी जाणाºया अधिकारी-कर्मचाºयांना जेवण देण्याचीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे.

मतदानाच्या दिवशी जिल्ह्णातील सहा हजार ७१५ या मतदानकेंद्रांवर दुपारच्या वेळी वर्किंग लंच आणि मतदान संपल्यानंतर साहित्य जमा करावयाच्या ठिकाणी संध्याकाळी चहापाणी व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा निवडणूक शाखेने केली आहे. यानुसार, फूड पॅकेट देण्याचे निश्चित झाले आहे. यात उन्हामुळे अन्न खराब होणार नाही, अशा पदार्थांची निवड केली आहे. त्यामध्ये डाळ, भात आणि स्वीट म्हणून लाडू या फूड पॅकेटमध्ये राहणार आहेत. अधिकारी व कर्मचाºयांना हे एकाच प्रकारचे शाकाहारी पॅकेट देण्याचे निश्चित केले आहे. वर्र्किं ग अवर्समध्ये देण्यात येणाऱ्या या पॅकेटमधील अन्नपदार्थ उन्हाच्या वाढत्या तापमानातही खराब होणार नाहीत, याची काळजी घेतल्याचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने या भत्त्याच्या रकमेत पुलाव, दोन लाडू आणि आलूमटारची भाजी देण्याचा मेनू निश्चित केलेला आहे. परंतु, या अन्नपदार्थांचे पॅकेट आपल्याकडील हवामानात लवकर खराब होईल, तसे होऊ नये म्हणून जिल्ह्णातील हवामानास अनुसरून पॅकेटमधील अन्नपदार्थ निश्चित केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

ई-निविदेद्वारे भोजनाचे दर निश्चित

१) सुमारे ६७ हजार कर्मचाऱ्यांच्या या मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळाच्या जेवणावळीसाठी ई-टेंडरिंगद्वारे ठेकेदार निश्चित केला आहे. यासाठी १६० रुपये दराने अंदाजे ५५ हजार मनुष्यबळासाठी ई-निविदा काढल्या. परंतु, साहाय्यकारी मतदानकेंद्रांची संख्या वाढल्यामुळे मनुष्यबळाची संख्या सुमारे ६७ हजारांपेक्षा जास्त दिसून येत आहे. यामुळे निविदेद्वारे १५० रूपये दर निश्चित होऊन जेवणावळीचे फूड पॅकेट देण्याचे ठरवण्यात आले. दीडशे रुपयाच्या भोजनभत्त्यातून केली सोय

२) एका मतदानकेंद्रासाठी दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे नियोजन आहे. यानुसार, सहा हजार ७१५ केंद्रांवर ६७ हजार मनुष्यबळ उपयुक्त आहे. यात मतदानकेंद्रांसाठी निश्चित केलेल्या २८ हजार ९६९ मनुष्यबळासह त्यावरील नियंत्रणासाठी असलेल्या कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी आदी ६७ हजार कर्मचाऱ्यांना वर्किंग अवर्समध्ये मिळणाऱ्या १५० रुपये भोजनभत्त्यातून या जेवणावळीचे नियोजन केले आहे.

टॅग्स :thaneठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक