शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी एक कोटीची जेवणावळ, डाळभातासह लाडूंची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 06:08 IST

भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांसाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी मतदानाचा हक्क मिळालेले ६२ लाख २५ हजार १९४ मतदार सहा हजार ७१५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत

ठाणे : भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांसाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी मतदानाचा हक्क मिळालेले ६२ लाख २५ हजार १९४ मतदार सहा हजार ७१५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. त्यांच्या सेवेसाठी मतदानकेंद्रांवरील अधिकारी- कर्मचारी व जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या निवडणूक यंत्रणेचे कार्यालयांमधील कर्मचारी अशा सुमारे ६७ हजार कर्मचाऱ्यांच्या जेवणावळीवर सुमारे एक कोटी रुपये खर्च होणार आहेत.

एका मतदानकेंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यावरील नियंत्रण व व्यवस्थापन आदी १० जणांचे मनुष्यबळ एका केंद्रासाठी नियोजित असल्याचे जिल्हा उपनिवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांनी सांगितले. या अधिकारी, कर्मचाºयांना मतदानाच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे १५० रुपये भोजनभत्ता मिळतो. त्यातूनच, ही भोजनव्यवस्था करण्यात आल्याचे सोमाणी यांनी नमूद केले. त्यांना फूड पॅकेट दिले जाणार आहेत. संध्याकाळी ईव्हीएम मशीन व अन्य साहित्य जमा करण्यासाठी जाणाºया अधिकारी-कर्मचाºयांना जेवण देण्याचीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे.

मतदानाच्या दिवशी जिल्ह्णातील सहा हजार ७१५ या मतदानकेंद्रांवर दुपारच्या वेळी वर्किंग लंच आणि मतदान संपल्यानंतर साहित्य जमा करावयाच्या ठिकाणी संध्याकाळी चहापाणी व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा निवडणूक शाखेने केली आहे. यानुसार, फूड पॅकेट देण्याचे निश्चित झाले आहे. यात उन्हामुळे अन्न खराब होणार नाही, अशा पदार्थांची निवड केली आहे. त्यामध्ये डाळ, भात आणि स्वीट म्हणून लाडू या फूड पॅकेटमध्ये राहणार आहेत. अधिकारी व कर्मचाºयांना हे एकाच प्रकारचे शाकाहारी पॅकेट देण्याचे निश्चित केले आहे. वर्र्किं ग अवर्समध्ये देण्यात येणाऱ्या या पॅकेटमधील अन्नपदार्थ उन्हाच्या वाढत्या तापमानातही खराब होणार नाहीत, याची काळजी घेतल्याचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने या भत्त्याच्या रकमेत पुलाव, दोन लाडू आणि आलूमटारची भाजी देण्याचा मेनू निश्चित केलेला आहे. परंतु, या अन्नपदार्थांचे पॅकेट आपल्याकडील हवामानात लवकर खराब होईल, तसे होऊ नये म्हणून जिल्ह्णातील हवामानास अनुसरून पॅकेटमधील अन्नपदार्थ निश्चित केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

ई-निविदेद्वारे भोजनाचे दर निश्चित

१) सुमारे ६७ हजार कर्मचाऱ्यांच्या या मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळाच्या जेवणावळीसाठी ई-टेंडरिंगद्वारे ठेकेदार निश्चित केला आहे. यासाठी १६० रुपये दराने अंदाजे ५५ हजार मनुष्यबळासाठी ई-निविदा काढल्या. परंतु, साहाय्यकारी मतदानकेंद्रांची संख्या वाढल्यामुळे मनुष्यबळाची संख्या सुमारे ६७ हजारांपेक्षा जास्त दिसून येत आहे. यामुळे निविदेद्वारे १५० रूपये दर निश्चित होऊन जेवणावळीचे फूड पॅकेट देण्याचे ठरवण्यात आले. दीडशे रुपयाच्या भोजनभत्त्यातून केली सोय

२) एका मतदानकेंद्रासाठी दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे नियोजन आहे. यानुसार, सहा हजार ७१५ केंद्रांवर ६७ हजार मनुष्यबळ उपयुक्त आहे. यात मतदानकेंद्रांसाठी निश्चित केलेल्या २८ हजार ९६९ मनुष्यबळासह त्यावरील नियंत्रणासाठी असलेल्या कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी आदी ६७ हजार कर्मचाऱ्यांना वर्किंग अवर्समध्ये मिळणाऱ्या १५० रुपये भोजनभत्त्यातून या जेवणावळीचे नियोजन केले आहे.

टॅग्स :thaneठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक