शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

एक कोटी ६६ लाख विद्यार्थ्यांना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:43 IST

मुद्दा ऑनलाइन शिक्षणाचा; ग्रामीण, दुर्गम भागांतील स्थिती अभ्यासणे आवश्यक

ठाणे : कोरोना प्रादुर्भावामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शाळा नियमित उघडणे अवघड झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने आॅनलाइन अध्यापनाचा पर्याय निवडला आहे. मात्र, या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोन याचा अभाव असल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील एक कोटी ६६ लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याचा धोका श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केला आहे.      शासनाने याचा गांभीर्याने विचार करून या आवश्यक बाबी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत पुरवून शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत आणि सक्तीचे शिक्षण तत्त्वाचे पालन होऊ शकेल, असे पंडित यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासन आॅनलाइन शिक्षणाची पद्धत सुरू करण्याच्या तयारीत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आणि कोरोना संकटाशी लढण्यासाठी घेतलेला हा आॅनलाइन शिक्षण पद्धतीचा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास पात्र आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. आॅनलाइन शिक्षणप्रणाली हा तंत्रज्ञानाचा भाग असून नेटवर्क व इंटरनेटशी संबंधित आहे. तरी याबाबत महाराष्ट्रातील विशेष करून ग्रामीण व दुर्गम भागातील स्थिती अभ्यासणे आवश्यक ठरेल, असे पंडित यांनी शासनाच्या निदर्शनात आणून दिले आहे.महाराष्ट्रात एक लाख सहा हजार ३२७ प्राथमिक शाळा असून २७ हजार ४४६ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधून दोन कोटी २४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांची संख्या ९९ हजार १४४ (७४.१६ टक्के) इतकी मोठी आहे. तर विद्यार्थी संख्या किमान एक कोटी ६६ लाख (७४ टक्के) इतकी आहे. या भागात विशेषत: दुर्गम आदिवासी क्षेत्रात वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही, हे वास्तव आहे. दुर्गम भागातील चार हजार ९४९ शाळांमध्ये आजही वीज जोडणी झालेली नाही. त्यापैकी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या २७४ आहे. ही आपलीच शासनाची आकडेवारी सांगते असल्याचे त्यांनी राज्य शासनाच्या लक्षात आणून दिले.राज्य शासनाकडे मागण्याराज्यातील एकूण शाळांपैकी ५१ हजार ६७७ (४८.६५ टक्के) शाळांमध्ये संगणक व इंटरनेटची सुविधाच नाही. या विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञानही मिळालेले नाही. त्यांच्यासह आधी शिक्षकांना प्रशिक्षण द्या.  शासनाने राज्यभर आॅनलाइन शिक्षण पद्धती अमलात आणण्याआधी ग्रामीण व दुर्गम भागात तत्काळ विद्यार्थ्यांना आॅनलाइन शालेय अभ्यास करण्यासाठी प्रत्येक गावपाड्यात वीजजोडणी व वीजपुरवठा सुरळीत करावा, मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करावी. प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला लॅपटॉप, टॅब किंवा अण्ड्रॉइड मोबाइल द्यावेत. तसेच यासाठी लागणारा इंटरनेटचा पुरेसा डेटा मोफत द्यावा .