शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांसाठी साडेतीन हजार कोटींचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 06:19 IST

महादेव जानकर : उत्तनमधील मच्छीमारांच्या नुकसानीचा घेतला आढावा

मीरा रोड : सततचा पाऊस, वादळामुळे ऐन मासेमारीच्या हंगामात मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी राज्याचे मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी भार्इंदरच्या उत्तन भागास भेट दिली. मच्छीमारांच्या मदतीसाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी आला असून, तुमच्यासाठी शासन तिजोरी रिकामी करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मच्छीमारांसह त्यांच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणकरांनी जाणून घेतल्या. तसेच त्यांनी समुद्रकिनारी पाहणी केली. मच्छीमारांसह मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. त्यांनी दिलेली निवेदने स्वीकारली. मच्छीमारांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी जानकर यांनी दिले. मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजेत. मच्छीमारांसाठी मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केले असून, त्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये आले असल्याचे जानकर म्हणाले. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा भाजप व शिवसेना या मोठ्या पक्षांनी सोडवला पाहिजे, असे सांगत राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार येईल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कोळी महिलांनी यावेळी जानकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, यावेळी आम्ही कोळीबांधवांसाठी काहीतरी करणार. पण, प्रत्येक वेळेला मंत्री येतात आणि कोळीबांधवांना फक्त आश्वासनं देऊन निघून जातात. आमच्या बोटी वादळ-पावसामुळे घरी आहेत. एकेका बोटीवर २५ खलाशी जातात. म्हणजे २५ कुटुंबेएका बोटीवर उदरनिर्वाहासाठी जात असतात. एका खेपेसाठी सुमारे ५० हजारांचा खर्च येतो. पण वादळ-पावसामुळे बोटी रिकाम्या परततात वा जाणेच शक्य होत नाही. समुद्रात अपघात झाला तरी मदत मिळत नाही. आमची तरुण मुलं अपघातात गेली. पण आम्हाला काय मिळतेय, असा सवाल संतापलेल्या महिलांनी केला.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरfishermanमच्छीमार