शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

पुन्हा एकदा विकास आराखड्याचे लॉलीपॉप

By admin | Updated: February 3, 2017 03:36 IST

महापालिका निवडणुकीत शहर विकास आराखडा हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला असून भाजपाच्या ‘विकास आघाडी’ला पालिकेची सत्ता दिल्यास १५ दिवसात आराखडा

- सदानंद नाईक,  उल्हासनगर

महापालिका निवडणुकीत शहर विकास आराखडा हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला असून भाजपाच्या ‘विकास आघाडी’ला पालिकेची सत्ता दिल्यास १५ दिवसात आराखडा मंजूर करण्याचे अभिवचन भाजपाचे नेते भाषणात देत आहेत. उल्हासनगर महापालिकेवर भाजपा-शिवसेना, रिपाइं व साई पक्षाची सत्ता असताना शहराचा विकास आराखडा मंजुर झाला असून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी धूळखात पडला आहे. विकास आराखडयाला सर्वप्रथम शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह माजी आमदार पप्पू कलानी, भाजपाचे नेते नरेंद्र राजानी, दीपक गाजरीया आदी स्थानिक नेत्यांनी कडाडून विरोध केला. शहरवासीयांसाठी नव्हे तर बिल्डरांच्या हितासाठी विकास आराखडा बनवल्याची टीका त्यावेळी झाली. पप्पू कलानी यांनी शहरातील प्रत्येक चौकात सभा घेवून शहर विकास आराखडा कसा चुकीचा आहे हे समजावून सांगितले. मात्र अचानक सर्व चित्र बदलून महासभेत सर्वांनुमते शहर विकास आराखडयाला मंजुरी दिली गेली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी हातमिळवणी करून बिल्डरांच्या हितासाठी असलेल्या विकास आराखड्याला पाठिंबा दिल्याचा आरोप झाला. पालिकेने अधिकृत घोषित केलेल्या ४८ झोपडपट्ट्यांसह एकूण १०६ झोपडपट्ट्यांच्या जागी हरित पट्टा अथवा खुल्या जागा, आरक्षित भूखंड व बंद कंपन्यांच्या जागेवर रहिवासी क्षेत्र दाखवण्यात आल्याने झोपडपट्टीवासीयांत भीतीचे वातावरण त्यावेळी पसरले होते. अगोदर ज्यांनी विकास आराखड्याविरोधात ‘उल्हासनगर बचाव समिती’ची स्थापना करून आंदोलनाची भाषा केली होती. त्यांनीच झोपडपट्टी विकासाकरिता क्लस्टरची योजना राबवून झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देण्याचे स्वप्न दाखवले.मतदारांना आराखड्याची लालूच- महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी भाजपा, ओमी कलानी आघाडी तसेच शिवसेना-रिपाइं युती शहर विकास आराखडा मंजुरीचे वचन देत आहेत. मात्र विकास आराखड्याचा सर्वाधिक फायदा बिल्डरांना होणार असल्याचे जाणकारांचे मत असून याच मुद्द्यावर याच आराखड्याला विरोध केल्याचा या राजकीय पक्षांना साफ विसर पडला आहे. - निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आराखड्याची लालूच दाखवणारे राजकीय पक्ष प्रत्यक्षात बिल्डरांना डोळा घालत असल्याची चर्चा आहे. यापूर्वी झोपडपट्टीधारकांचे कैवारी बनलेले राजकीय नेते रातोरात विकास आराखडयाचे समर्थक कसे बनले ते जनतेने पाहिले आहे. या आराखड्यावर त्यावेळी तब्बल १७ हजार हरकती व सूचना आल्या होत्या. त्यापैकी ६ हजारांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. मात्र अचानक सर्वसमंतीने आराखड्याला मंजुरी दिल्याचा इतिहास स्मरणात असल्याने झोपडपट्टीवासीय धास्तावले आहेत.