शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

पुन्हा एकदा विकास आराखड्याचे लॉलीपॉप

By admin | Updated: February 3, 2017 03:36 IST

महापालिका निवडणुकीत शहर विकास आराखडा हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला असून भाजपाच्या ‘विकास आघाडी’ला पालिकेची सत्ता दिल्यास १५ दिवसात आराखडा

- सदानंद नाईक,  उल्हासनगर

महापालिका निवडणुकीत शहर विकास आराखडा हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला असून भाजपाच्या ‘विकास आघाडी’ला पालिकेची सत्ता दिल्यास १५ दिवसात आराखडा मंजूर करण्याचे अभिवचन भाजपाचे नेते भाषणात देत आहेत. उल्हासनगर महापालिकेवर भाजपा-शिवसेना, रिपाइं व साई पक्षाची सत्ता असताना शहराचा विकास आराखडा मंजुर झाला असून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी धूळखात पडला आहे. विकास आराखडयाला सर्वप्रथम शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह माजी आमदार पप्पू कलानी, भाजपाचे नेते नरेंद्र राजानी, दीपक गाजरीया आदी स्थानिक नेत्यांनी कडाडून विरोध केला. शहरवासीयांसाठी नव्हे तर बिल्डरांच्या हितासाठी विकास आराखडा बनवल्याची टीका त्यावेळी झाली. पप्पू कलानी यांनी शहरातील प्रत्येक चौकात सभा घेवून शहर विकास आराखडा कसा चुकीचा आहे हे समजावून सांगितले. मात्र अचानक सर्व चित्र बदलून महासभेत सर्वांनुमते शहर विकास आराखडयाला मंजुरी दिली गेली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी हातमिळवणी करून बिल्डरांच्या हितासाठी असलेल्या विकास आराखड्याला पाठिंबा दिल्याचा आरोप झाला. पालिकेने अधिकृत घोषित केलेल्या ४८ झोपडपट्ट्यांसह एकूण १०६ झोपडपट्ट्यांच्या जागी हरित पट्टा अथवा खुल्या जागा, आरक्षित भूखंड व बंद कंपन्यांच्या जागेवर रहिवासी क्षेत्र दाखवण्यात आल्याने झोपडपट्टीवासीयांत भीतीचे वातावरण त्यावेळी पसरले होते. अगोदर ज्यांनी विकास आराखड्याविरोधात ‘उल्हासनगर बचाव समिती’ची स्थापना करून आंदोलनाची भाषा केली होती. त्यांनीच झोपडपट्टी विकासाकरिता क्लस्टरची योजना राबवून झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देण्याचे स्वप्न दाखवले.मतदारांना आराखड्याची लालूच- महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी भाजपा, ओमी कलानी आघाडी तसेच शिवसेना-रिपाइं युती शहर विकास आराखडा मंजुरीचे वचन देत आहेत. मात्र विकास आराखड्याचा सर्वाधिक फायदा बिल्डरांना होणार असल्याचे जाणकारांचे मत असून याच मुद्द्यावर याच आराखड्याला विरोध केल्याचा या राजकीय पक्षांना साफ विसर पडला आहे. - निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आराखड्याची लालूच दाखवणारे राजकीय पक्ष प्रत्यक्षात बिल्डरांना डोळा घालत असल्याची चर्चा आहे. यापूर्वी झोपडपट्टीधारकांचे कैवारी बनलेले राजकीय नेते रातोरात विकास आराखडयाचे समर्थक कसे बनले ते जनतेने पाहिले आहे. या आराखड्यावर त्यावेळी तब्बल १७ हजार हरकती व सूचना आल्या होत्या. त्यापैकी ६ हजारांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. मात्र अचानक सर्वसमंतीने आराखड्याला मंजुरी दिल्याचा इतिहास स्मरणात असल्याने झोपडपट्टीवासीय धास्तावले आहेत.