शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

ओमी टीमने घातला खो

By admin | Updated: October 13, 2016 03:41 IST

शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ बेकायदा वाहने पार्किंग करणाऱ्यांवर पालिका पथकाने पाच कोटींची दंडात्मक कारवाई करून नोटिसा पाठवल्या

सदानंद नाईक / उल्हासनगरशहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ बेकायदा वाहने पार्किंग करणाऱ्यांवर पालिका पथकाने पाच कोटींची दंडात्मक कारवाई करून नोटिसा पाठवल्या होत्या. दरम्यान, ओमी कलानी टीमने विरोध केल्यावर कारवाई ठप्प झाली असून कोट्यवधींच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगरमध्ये पालिकेने चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. पार्किंगच्या समस्येमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. तत्कालीन पालिका आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त नितीन कापडनीस व मालमत्ता व्यवस्थापक गणेश शिंपी यांनी बेकायदा पार्किंग केलेल्या गाडीमालकावर दंड आकारण्याचा निर्णय घेतला. कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ पार्किंग केलेल्या ८९ गाडीमालकांवर तब्बल पाच कोटींची दंडात्मक कारवाई केली. कल्याण-अंबरनाथ रस्त्याजवळ पार्किंग करत असलेल्या गाडीमालकांवर दंडात्मक कारवाई चार महिन्यांपूर्वी केली. ८९ गाडीमालकांविरोधात पाच कोटींची दंडात्मक कारवाई करून रकमेसाठी नोटिसा पाठवल्या. दंडात्मक रक्कम वेळेत न दिल्यास त्यांच्या मालमत्ताकर बिलात ती समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये एकच गदारोळ झाला. ओमी कलानी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली.