शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

पॅकेजवरून ओमी टीम, साईचे भाजपा नेत्यांसोबत खटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:09 IST

कल्याण-डोंबिवलीच्या पॅकेजप्रमाणेच उल्हासनगरचे पॅकेजही निवडणुकीनंतर हवेत विरले का, असा प्रश्न ओमी टीमसह साई पक्षाने विचारल्याने भाजपाच्या आघाडीतील असंतोषाला तोंड फुटले आहे.

उल्हासनगर : कल्याण-डोंबिवलीच्या पॅकेजप्रमाणेच उल्हासनगरचे पॅकेजही निवडणुकीनंतर हवेत विरले का, असा प्रश्न ओमी टीमसह साई पक्षाने विचारल्याने भाजपाच्या आघाडीतील असंतोषाला तोंड फुटले आहे. भाजपाच्याही काही नगरसेवकांनी त्यांच्या सूरात सूर मिसळल्याने स्तताधारी पक्षातच सारे आलबेल नसल्याचे चित्र उभे राहिले आहे. उल्हासनगरच्या विकास आराखड्याबद्दलही कोणी तोंड उघडण्यास तयार नसल्याने सत्ताधाºयांत अस्वस्थता आहे.महापालिकेवर भाजपाची सत्ता येऊन सहा महिने झाले. पण शहर विकास आराखडा, मोठ्या योजनेसह विशेष पॅकेज दिले नाही. उल्हासनगर महापालिका स्वबळावर ताब्यात घेण्यासाठी थेट ओमी टीमला भाजपामध्ये घेतले. ओमी टीमच्या सर्व समर्थकांना भाजपाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरूनही स्वबळावर येण्यासाठी संख्याबळ कमी पडले. अखेर भाजपाने साई पक्षाचा पाठिंबा घेऊन त्यांना महत्वाचे पदे दिली. महापौरपद भाजपाकडे तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद साई पक्षाकडे गेले. ओमी टीमला महत्वाचे पदे न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी वाढली आहे. सव्वा वर्षांनी महापौरपद ओमी टीमला देण्याचे आश्वासन दिले आहे.महापालिका निवडणुकीच्यावेळी भाजपाने शहर विकासासाठी विशेष पॅकेजचे आश्वासन दिले होते. शहरविकास आराखडा १५ दिवसात मंजूर करणे, नगररचनाकाराची नियुक्ती तसेच विशेष निधी देण्याचे मान्य केले होते.भाजपाचा महापौर बसून सहा महिन्याचा कालावधी होऊनही सरकारने शहरासाठी कोणतीही आकर्षक योजना जाहीर केलेली नाही.शहर विकास आराखडयाला मंजुरी नाही. मोठ्या योजनेला मान्यता नाही किंवा विशेष पॅकेज नाही. त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढली आहे. भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी हे महापौर मीना आयलानींसोबत मुख्यमंत्र्यांना भेटून शहर विकासाबाबत निवेदन देतात. मात्र आश्वासनापलिकडे मुख्यमंत्री काहीएक देत नसल्याने भाजपाच्या नगरसेवकांसह ओमी टीम व साई पक्षातील नगरसेवकांमध्ये असंतोष वाढला आहे.