शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

ओम शिव गणेश इमारतीला गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 3:13 AM

पूर्वेकडील डीएनसी भागातील पी.एस. म्हात्रे कम्पाउंड येथील ओम शिव गणेश सोसायटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळ मजल्यावरील खांबांना तडे गेल्याची घटना सोमवारी घडली.

डोंबिवली : पूर्वेकडील डीएनसी भागातील पी.एस. म्हात्रे कम्पाउंड येथील ओम शिव गणेश सोसायटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळ मजल्यावरील खांबांना तडे गेल्याची घटना सोमवारी घडली. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या भिंतींना चिरादेखील गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या इमारतीमधील २२ कुटुंबांना तत्काळ बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली. यामुळे हे रहिवासी रस्त्यावर आले आहेत.ओम शिव गणेश सोसायटी २५ वर्षे जुनी असून, त्यात ‘ए’ आणि ‘बी’ अशा दोन विंग आहेत. सोसायटीची इमारत तळ अधिक तीन मजली आहे. काही महिन्यांपूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यात इमारत दुरुस्तीलायक झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे महिनाभरापूर्वी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. सोमवारी ते काम सुरू असताना सायंकाळी तळ मजल्यावरील दोन खांब खचल्याचे दुरुस्ती करणाºया कंत्राटदाराच्या निदर्शनास आले. या वेळी मोठा आवाजही झाला. त्यामुळे कंत्राटदाराने लागलीच रहिवाशांना खाली उतरण्यास सांगून इमारत रिकामी करून घेतली. याची माहिती अग्निशामक विभाग, महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्थायी समिती सभापती राहुल दामले, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजन मराठे, पप्पू म्हात्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली. राजन यांच्या पत्नी ज्योती मराठे आणि पप्पू यांच्या पत्नी अलका म्हात्रे यांच्या प्रभागात ही इमारत आहे. दरम्यान, येथील रहिवाशांची सोय रात्रनिवारा केंद्रात करणार असल्याची माहिती पप्पू म्हात्रे यांनी दिली.>दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीनेइमारतीची दुरुस्ती चुकीच्या पद्धतीने सुरू होती, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. इमारतीच्या या अवस्थेला कंत्राटदार आणि सोसायटीचे पदाधिकारी जबाबदार आहेत, असा आरोपही या वेळी करण्यात आला.विशेष म्हणजे काही रहिवाशांच्या रोषालाही कंत्राटदार आणि पदाधिकाºयांना सामोरे जावे लागले. घटनास्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.इमारतीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू होते, हे मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, पण माझे कोणी ऐकले नाही, अशा शब्दांत नाराजी रहिवासी कैलास पवार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.यासंदर्भात महापालिकेचे ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, रोहिणी लोकरे यांनी तातडीने आरसीसी कन्सल्टंट माधव चिकोडी यांना इमारतीची पाहणी करण्यासाठी पाचारण केले. चिकोडी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार इमारत आधी तातडीने रिकामी करणे महत्त्वाचे आहे. वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इमारत रिकामी झाल्यावर काही वेळातच तेथे लोखंडी मुंडे लावणे आवश्यक आहे. त्यानंतर, एकेका कुटुंबप्रमुखाला घरात सोडून महत्त्वाचा ऐवज तातडीने काढून घेण्याची तरतूद करावी लागेल. तसेच सुरक्षिततेच्या कारणामुळे शेजारची इमारतही तातडीने रिकामी करावी आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन चिकोडी यांनी केले.>आता यांच्याही पुनर्वसनाचा प्रश्न?इमारत तातडीने रिकामी करायची झाल्यास येथे राहणाºया २२ कुटुंबीयांना तात्पुरता निवारा तरी कसा, कुठे, कधी देता येणार, हे प्रश्न महापालिका अधिकाºयांसमोर उभे राहिले आहेत. पर्यायी व्यवस्था न केल्यास ते बाहेर निघतील का? हा मोठा प्रश्न आहे. नागूबाई निवासच्या रहिवाशांना कचोºयातील बीएसयूपीच्या घरांमध्ये जसा निवारा मिळाला, तशी घरे ‘ओम शिव गणेश’च्या रहिवाशांना मिळणार का? आणि जर घरे मिळाली, तर त्या ठिकाणी येथील रहिवासी वास्तव्याला जाणार का? अशी चर्चा सुरू होती.