शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल आज 5 तास वाहतुकीसाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 07:54 IST

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मीरारोड/ठाणे, दि. 16- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे. मुंबईला जोडणारा वसई खाडीवरील जुना वरसावे पूल हा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गर्डरला तडा गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. 

सकाळी 8 वाजल्यापासून तपासणीसाठी जुना पूल वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे.  तपासणीचे काम जवळपास 5 तास चालणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक नवीन पुलावरुन वळवली जाणार आहे. जेणे करुन वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने पोलीस व वाहतूक पोलिसांसह प्राधिकरणदेखील तयारीला लागले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतूक शाखेचे 18,  पालघर शाखेचे 22 तर महामार्ग वाहतूक शाखेचे 11 असे मिळून ५१ अधिकारी व कर्मचारी येथे तैनात केले जाणार आहेत. शिवाय पालिकेच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डनसुद्धा दिले जाणार आहेत. 

कुठल्या पद्धतीनं या पुलाची दुरुस्ती करायची यावर मोठा काथ्याकुट झाल्यावर अखेर उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस )चा आधार देऊन दुरुस्ती करण्यात आली. पूल बंद असल्याच्या काळात नवीन पुलावरुनच दोन्ही बाजूची वाहतुक सुरू होती. परंतु यामुळे काही तास वाहतूक कोंडीत लोकांना घालवावे लागत होते. 9 महिन्यांपासून बंद असलेला हा पूल अखेर मे मध्ये सुरु करण्यात आला.

सध्या जुना पुलावरुन एका मार्गिकेतून लहान तर एका मार्गिकेतून मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमित तपासणी करणे गरजेचे बनले आहे. कारण महाड पूल दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. नियमित तपासणीमध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या ट्रसची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.

अवजड व मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळवण्यासाठी सांगण्यात आले आहे. दर वीस मिनिटांनी नवीन पुलावरुन एका एका बाजूची वाहनं सोडली जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिली आहे.