शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल आज 5 तास वाहतुकीसाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 07:54 IST

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मीरारोड/ठाणे, दि. 16- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे. मुंबईला जोडणारा वसई खाडीवरील जुना वरसावे पूल हा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गर्डरला तडा गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. 

सकाळी 8 वाजल्यापासून तपासणीसाठी जुना पूल वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे.  तपासणीचे काम जवळपास 5 तास चालणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक नवीन पुलावरुन वळवली जाणार आहे. जेणे करुन वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने पोलीस व वाहतूक पोलिसांसह प्राधिकरणदेखील तयारीला लागले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतूक शाखेचे 18,  पालघर शाखेचे 22 तर महामार्ग वाहतूक शाखेचे 11 असे मिळून ५१ अधिकारी व कर्मचारी येथे तैनात केले जाणार आहेत. शिवाय पालिकेच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डनसुद्धा दिले जाणार आहेत. 

कुठल्या पद्धतीनं या पुलाची दुरुस्ती करायची यावर मोठा काथ्याकुट झाल्यावर अखेर उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस )चा आधार देऊन दुरुस्ती करण्यात आली. पूल बंद असल्याच्या काळात नवीन पुलावरुनच दोन्ही बाजूची वाहतुक सुरू होती. परंतु यामुळे काही तास वाहतूक कोंडीत लोकांना घालवावे लागत होते. 9 महिन्यांपासून बंद असलेला हा पूल अखेर मे मध्ये सुरु करण्यात आला.

सध्या जुना पुलावरुन एका मार्गिकेतून लहान तर एका मार्गिकेतून मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमित तपासणी करणे गरजेचे बनले आहे. कारण महाड पूल दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. नियमित तपासणीमध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या ट्रसची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.

अवजड व मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळवण्यासाठी सांगण्यात आले आहे. दर वीस मिनिटांनी नवीन पुलावरुन एका एका बाजूची वाहनं सोडली जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिली आहे.