शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल आज 5 तास वाहतुकीसाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 07:54 IST

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मीरारोड/ठाणे, दि. 16- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळावा,  असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी केले आहे. मुंबईला जोडणारा वसई खाडीवरील जुना वरसावे पूल हा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गर्डरला तडा गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. 

सकाळी 8 वाजल्यापासून तपासणीसाठी जुना पूल वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे.  तपासणीचे काम जवळपास 5 तास चालणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक नवीन पुलावरुन वळवली जाणार आहे. जेणे करुन वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने पोलीस व वाहतूक पोलिसांसह प्राधिकरणदेखील तयारीला लागले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतूक शाखेचे 18,  पालघर शाखेचे 22 तर महामार्ग वाहतूक शाखेचे 11 असे मिळून ५१ अधिकारी व कर्मचारी येथे तैनात केले जाणार आहेत. शिवाय पालिकेच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डनसुद्धा दिले जाणार आहेत. 

कुठल्या पद्धतीनं या पुलाची दुरुस्ती करायची यावर मोठा काथ्याकुट झाल्यावर अखेर उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस )चा आधार देऊन दुरुस्ती करण्यात आली. पूल बंद असल्याच्या काळात नवीन पुलावरुनच दोन्ही बाजूची वाहतुक सुरू होती. परंतु यामुळे काही तास वाहतूक कोंडीत लोकांना घालवावे लागत होते. 9 महिन्यांपासून बंद असलेला हा पूल अखेर मे मध्ये सुरु करण्यात आला.

सध्या जुना पुलावरुन एका मार्गिकेतून लहान तर एका मार्गिकेतून मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमित तपासणी करणे गरजेचे बनले आहे. कारण महाड पूल दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. नियमित तपासणीमध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या ट्रसची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.

अवजड व मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळवण्यासाठी सांगण्यात आले आहे. दर वीस मिनिटांनी नवीन पुलावरुन एका एका बाजूची वाहनं सोडली जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिली आहे.