शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जुना पत्रीपूल दीड महिन्यात पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 04:11 IST

वाहतुकीसाठी धोकादायक झालेला कल्याणचा जुना पत्रीपूल पाडण्याच्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली. हा पूल पूर्णपणे पाडण्यास दीड महिना लागणार आहे.

कल्याण : वाहतुकीसाठी धोकादायक झालेला कल्याणचा जुना पत्रीपूल पाडण्याच्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली. हा पूल पूर्णपणे पाडण्यास दीड महिना लागणार आहे.कल्याण रेल्वे मार्गावर असलेला हा पूल ब्रिटिशकालीन होता. पूल धोकादायक होऊनही त्यावरून जड वाहनांची वाहतूक सुरू होती. हा मुद्दा उघड होताच तो वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक शेजारील नव्या पत्रीपुलावरून वाहतूक वळवण्यात आली. परिणामी या परिसरात प्रचंड कोंडी होत आहे.जुना पूल पाडून नव्याने पुलाचे बांधकाम करावे लागणार आहे. त्यासाठी रेल्वेने जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारपासून पूल पाडण्याचे काम सुरू केले. सध्या पुलावरील डांबरीकरण उखडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण पूल पाडण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर करावा लागणार आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेला पॉवर ब्लॉक घ्यावा लागणार आहे. पुलाखालून रेल्वे मार्ग जात असल्याने ते काम अत्यंत जिकरीचे आहे. कल्याण हे जंक्शन असून, येथे सतत गाड्यांची वाहतूक होते. ती सुरळीत ठेवून पूल पाडण्याचे काम करावे लागणार आहे.नागरिकांचे हाल कायममुंब्रा बायपास रस्त्याची दुरुस्ती सुरू असतानाच जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे कल्याण शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण आल्याने नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला होता.१० सप्टेंबरपासून मुंब्रा बायपास रस्ता पुन्हा सुरू झाल्याने वाहतुकीचा ताण काही अंशी कमी झाला आहे. मात्र, नवीन पत्रीपूल हा वाहतुकीसाठी अरुंद व अपुरा असल्याने पुलाच्या परिसरात कोंडी होत आहे. कल्याण पूर्वे-पश्चिमेतून ये-जा करणाऱ्या रिक्षांना एक तास लागतो. त्यामुळे नागरिक हैैराण आहेत.

टॅग्स :kalyanकल्याण