शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

उल्हासनगरात भुयारी गटार कामात जुनेच चेंबर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 19:49 IST

भुयारी गटार व पाणी योजना वादात, रिपाइं व काँग्रेस ठोठावणार न्यायालायचा दरवाजा.

उल्हासनगर : शहरातील विविध भागात रस्ते खोदून भुयारी गटारीचे नवीन पाईप टाकण्याचे काम एकीकडे सुरू असताना दुसरीकडे गटारीच्या जुन्याच चेंबरचा वापर होत आहे. याकामाच्या अनियमित बाबत रिपाइं व काँग्रेसने चौकशीची मागणी करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा दिला आहे. 

उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजनेच्या तिसऱ्या टप्याचे काम सुरू झाले. पहिल्या टप्यात शहराबाहेरील मुख्य गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात वडोलगाव, खडेगोळविली व शांतीनगर आदी ठिकाणी मलनिस्सारण केंद्र सुरू केली. तर तिसऱ्या टप्यात शहर अंतर्गत भुयारी गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात येत आहे. याच बरोबर नव्याने गटारीचे चेंबर बांधण्याचा उल्लेख ठेक्यात असून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे व आयुक्त अजीज शेख यांनी दिली. प्रत्यक्षात योजनेच्या ब्ल्यूप्रिंट शिवाय भुयारी गटारीचे काम सुरू असल्याचा आरोप शहरातून होत आहे. 

रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या टेंडरवॉर पत्रकार परिषेदेत भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा वितरण योजनेच्या कामाबाबत न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे संकेत दिले. तसेच काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीही भुयारी गटारीच्या अनियमित कामावर नाराजी व्यक्त करून महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली. भुयारी गटार योजनेत रस्ते खोदून गटारीचे नवीन पाईप टाकल्यानंतर नव्याने भुयारी चेंबर बांधून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची अट आहे. प्रत्यक्षात जुन्याच चेंबरला दुरस्तीला मुलायमा दिला जात असून गेल्या ३ महिन्यात खोदलेल्या एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याचे चित्र शहरात आहे. खोदलेले रस्ते दुरस्त केले नसल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच गटारीचे चेंबर नव्याने बांधण्यात येत असल्याचे सांगितले आहे. 

 भुयारी गटारीमुळे खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती कधी? शहरात गेल्या ३ महिन्यापासून रस्ते खोदून नव्याने गटारीचे काम सुरू आहे. खोदलेले रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची अट असतांना आजपर्यंत एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नाही. तसेच गटारीचे नव्याने चेंबर न बांधता जुनेच चेंबर वापरत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर