शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

उल्हासनगरात भुयारी गटार कामात जुनेच चेंबर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 19:49 IST

भुयारी गटार व पाणी योजना वादात, रिपाइं व काँग्रेस ठोठावणार न्यायालायचा दरवाजा.

उल्हासनगर : शहरातील विविध भागात रस्ते खोदून भुयारी गटारीचे नवीन पाईप टाकण्याचे काम एकीकडे सुरू असताना दुसरीकडे गटारीच्या जुन्याच चेंबरचा वापर होत आहे. याकामाच्या अनियमित बाबत रिपाइं व काँग्रेसने चौकशीची मागणी करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा दिला आहे. 

उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजनेच्या तिसऱ्या टप्याचे काम सुरू झाले. पहिल्या टप्यात शहराबाहेरील मुख्य गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात वडोलगाव, खडेगोळविली व शांतीनगर आदी ठिकाणी मलनिस्सारण केंद्र सुरू केली. तर तिसऱ्या टप्यात शहर अंतर्गत भुयारी गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात येत आहे. याच बरोबर नव्याने गटारीचे चेंबर बांधण्याचा उल्लेख ठेक्यात असून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे व आयुक्त अजीज शेख यांनी दिली. प्रत्यक्षात योजनेच्या ब्ल्यूप्रिंट शिवाय भुयारी गटारीचे काम सुरू असल्याचा आरोप शहरातून होत आहे. 

रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या टेंडरवॉर पत्रकार परिषेदेत भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा वितरण योजनेच्या कामाबाबत न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे संकेत दिले. तसेच काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीही भुयारी गटारीच्या अनियमित कामावर नाराजी व्यक्त करून महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली. भुयारी गटार योजनेत रस्ते खोदून गटारीचे नवीन पाईप टाकल्यानंतर नव्याने भुयारी चेंबर बांधून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची अट आहे. प्रत्यक्षात जुन्याच चेंबरला दुरस्तीला मुलायमा दिला जात असून गेल्या ३ महिन्यात खोदलेल्या एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याचे चित्र शहरात आहे. खोदलेले रस्ते दुरस्त केले नसल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच गटारीचे चेंबर नव्याने बांधण्यात येत असल्याचे सांगितले आहे. 

 भुयारी गटारीमुळे खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती कधी? शहरात गेल्या ३ महिन्यापासून रस्ते खोदून नव्याने गटारीचे काम सुरू आहे. खोदलेले रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची अट असतांना आजपर्यंत एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नाही. तसेच गटारीचे नव्याने चेंबर न बांधता जुनेच चेंबर वापरत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर