शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात भुयारी गटार कामात जुनेच चेंबर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 19:49 IST

भुयारी गटार व पाणी योजना वादात, रिपाइं व काँग्रेस ठोठावणार न्यायालायचा दरवाजा.

उल्हासनगर : शहरातील विविध भागात रस्ते खोदून भुयारी गटारीचे नवीन पाईप टाकण्याचे काम एकीकडे सुरू असताना दुसरीकडे गटारीच्या जुन्याच चेंबरचा वापर होत आहे. याकामाच्या अनियमित बाबत रिपाइं व काँग्रेसने चौकशीची मागणी करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा दिला आहे. 

उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजनेच्या तिसऱ्या टप्याचे काम सुरू झाले. पहिल्या टप्यात शहराबाहेरील मुख्य गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात वडोलगाव, खडेगोळविली व शांतीनगर आदी ठिकाणी मलनिस्सारण केंद्र सुरू केली. तर तिसऱ्या टप्यात शहर अंतर्गत भुयारी गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात येत आहे. याच बरोबर नव्याने गटारीचे चेंबर बांधण्याचा उल्लेख ठेक्यात असून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे व आयुक्त अजीज शेख यांनी दिली. प्रत्यक्षात योजनेच्या ब्ल्यूप्रिंट शिवाय भुयारी गटारीचे काम सुरू असल्याचा आरोप शहरातून होत आहे. 

रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या टेंडरवॉर पत्रकार परिषेदेत भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा वितरण योजनेच्या कामाबाबत न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे संकेत दिले. तसेच काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीही भुयारी गटारीच्या अनियमित कामावर नाराजी व्यक्त करून महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली. भुयारी गटार योजनेत रस्ते खोदून गटारीचे नवीन पाईप टाकल्यानंतर नव्याने भुयारी चेंबर बांधून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची अट आहे. प्रत्यक्षात जुन्याच चेंबरला दुरस्तीला मुलायमा दिला जात असून गेल्या ३ महिन्यात खोदलेल्या एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याचे चित्र शहरात आहे. खोदलेले रस्ते दुरस्त केले नसल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच गटारीचे चेंबर नव्याने बांधण्यात येत असल्याचे सांगितले आहे. 

 भुयारी गटारीमुळे खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती कधी? शहरात गेल्या ३ महिन्यापासून रस्ते खोदून नव्याने गटारीचे काम सुरू आहे. खोदलेले रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची अट असतांना आजपर्यंत एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नाही. तसेच गटारीचे नव्याने चेंबर न बांधता जुनेच चेंबर वापरत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर