शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात भुयारी गटार कामात जुनेच चेंबर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 19:49 IST

भुयारी गटार व पाणी योजना वादात, रिपाइं व काँग्रेस ठोठावणार न्यायालायचा दरवाजा.

उल्हासनगर : शहरातील विविध भागात रस्ते खोदून भुयारी गटारीचे नवीन पाईप टाकण्याचे काम एकीकडे सुरू असताना दुसरीकडे गटारीच्या जुन्याच चेंबरचा वापर होत आहे. याकामाच्या अनियमित बाबत रिपाइं व काँग्रेसने चौकशीची मागणी करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा दिला आहे. 

उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजनेच्या तिसऱ्या टप्याचे काम सुरू झाले. पहिल्या टप्यात शहराबाहेरील मुख्य गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात वडोलगाव, खडेगोळविली व शांतीनगर आदी ठिकाणी मलनिस्सारण केंद्र सुरू केली. तर तिसऱ्या टप्यात शहर अंतर्गत भुयारी गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात येत आहे. याच बरोबर नव्याने गटारीचे चेंबर बांधण्याचा उल्लेख ठेक्यात असून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे व आयुक्त अजीज शेख यांनी दिली. प्रत्यक्षात योजनेच्या ब्ल्यूप्रिंट शिवाय भुयारी गटारीचे काम सुरू असल्याचा आरोप शहरातून होत आहे. 

रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या टेंडरवॉर पत्रकार परिषेदेत भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा वितरण योजनेच्या कामाबाबत न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे संकेत दिले. तसेच काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीही भुयारी गटारीच्या अनियमित कामावर नाराजी व्यक्त करून महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली. भुयारी गटार योजनेत रस्ते खोदून गटारीचे नवीन पाईप टाकल्यानंतर नव्याने भुयारी चेंबर बांधून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची अट आहे. प्रत्यक्षात जुन्याच चेंबरला दुरस्तीला मुलायमा दिला जात असून गेल्या ३ महिन्यात खोदलेल्या एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याचे चित्र शहरात आहे. खोदलेले रस्ते दुरस्त केले नसल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच गटारीचे चेंबर नव्याने बांधण्यात येत असल्याचे सांगितले आहे. 

 भुयारी गटारीमुळे खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती कधी? शहरात गेल्या ३ महिन्यापासून रस्ते खोदून नव्याने गटारीचे काम सुरू आहे. खोदलेले रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची अट असतांना आजपर्यंत एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नाही. तसेच गटारीचे नव्याने चेंबर न बांधता जुनेच चेंबर वापरत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर