शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

पन्नास दिवसांत जिल्ह्यात रुग्णसंख्येचा दोन लाखांचा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या रुग्णवाढीचा वेग हा इतका जास्त होता की, अवघ्या ५० दिवसांत ठाणे जिल्ह्यात तिने ...

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या रुग्णवाढीचा वेग हा इतका जास्त होता की, अवघ्या ५० दिवसांत ठाणे जिल्ह्यात तिने दोन लाखांचा आकडा पार केला. यामध्ये पहिले एक लाख रुग्ण हे २० दिवसांत तर दुसरे एक लाख रुग्ण हे पुढील ३० दिवसांत नोंदवले गेले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचेही गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्येच्या आकडेवारी दिसत आहे.

या ५० दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या प्रामुख्याने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन महापालिकांमध्ये जास्त आहे. दोन लाख रुग्ण संख्येपैकी एक लाख रुग्ण संख्या ही ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील असल्याचे शासकीय आकडेवारी स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या लाटेत या दोन्ही महापालिकांमध्ये रुग्णवाढीची जणू स्पर्धाच पाहण्यास मिळाली.

ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार एक कोटी १० लाख ५४ हजारांहून अधिक आहे, तर जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. तसेच सहा महापालिका आणि दोन नगरपालिका तसेच जिल्हा परिषदही अस्तित्वात आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागात जिल्हा विभागाला गेला आहे. अजून ही शहापूर आणि मुरबाड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्त्या आहे, तर शहरी भाग हा दाटीवाटीने पसरलेला आहे. त्यातच परराज्यातून आलेल्या लोकांची संख्या ही जास्त असून नोकरदारांची संख्या अधिक आहे. नोकरीधंद्यासाठी ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात (लाखोंनी) नागरिक लोकलने दररोज ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे असो या एसटीस्थानके गर्दीने नेहमी गजबजलेली असतात. २०२० च्या मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर रुग्ण जरी वाढले गेली असली तरी, तो वेग अगदी कमी होता. ११ जुलै रोजी जिल्ह्याची रुग्णसंख्या ही ५० हजार झाली आणि अवघ्या ३० दिवसांत म्हणजे १२ ऑगस्टला तीच रुग्णसंख्या एक लाखांवर पोहोचली. १९ ऑक्टोबरला तिने दोन लाखांचा टप्पा पार केला. याचदरम्यान दुसऱ्याची लाटेची भीती व्यक्त होत असताना रुग्णसंख्या कमी झाल्याने जवळपास कोरोना संपला की काय, असे वाटत होते. त्यातच अचानक कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखीच आली. २६ मार्च रुग्णसंख्या तीन लाख झाली. मात्र, पाच लाखांचा आकडा गाठण्यासाठी अवघे ५० दिवसांचा कालावधी लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठाणेसह कल्याण-डोंबिवलीत रुग्णवाढीची स्पर्धा

या दोन महापालिकांमध्ये ५० दिवसांत एक लाख नऊ हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत प्रभाव या महापालिकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आहे. ठामपात २६ मार्च ते १६ मे दरम्यान ५३ हजार ५२२ रुग्ण आढळले आहेत, तर केडीएमसीत ५५ हजार १५१, नवी मुंबईत ३४, हजार २४९, उल्हासनगर ६ हजार ६६३, भिवंडीत नऊ हजार ४९६, मीरा-भाईंदर १७ हजार ७४४, अंबरनाथ आठ हजार ६७७, बदलापूर आठ हजार ३८३ तर ग्रामीणमध्ये ११ हजार ५३९ रुग्ण दुसऱ्या लाटेतील ५० दिवसांत मिळाले आहेत.