शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पन्नास दिवसांत जिल्ह्यात रुग्णसंख्येचा दोन लाखांचा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या रुग्णवाढीचा वेग हा इतका जास्त होता की, अवघ्या ५० दिवसांत ठाणे जिल्ह्यात तिने ...

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या रुग्णवाढीचा वेग हा इतका जास्त होता की, अवघ्या ५० दिवसांत ठाणे जिल्ह्यात तिने दोन लाखांचा आकडा पार केला. यामध्ये पहिले एक लाख रुग्ण हे २० दिवसांत तर दुसरे एक लाख रुग्ण हे पुढील ३० दिवसांत नोंदवले गेले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचेही गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्येच्या आकडेवारी दिसत आहे.

या ५० दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या प्रामुख्याने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन महापालिकांमध्ये जास्त आहे. दोन लाख रुग्ण संख्येपैकी एक लाख रुग्ण संख्या ही ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील असल्याचे शासकीय आकडेवारी स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या लाटेत या दोन्ही महापालिकांमध्ये रुग्णवाढीची जणू स्पर्धाच पाहण्यास मिळाली.

ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार एक कोटी १० लाख ५४ हजारांहून अधिक आहे, तर जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. तसेच सहा महापालिका आणि दोन नगरपालिका तसेच जिल्हा परिषदही अस्तित्वात आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागात जिल्हा विभागाला गेला आहे. अजून ही शहापूर आणि मुरबाड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्त्या आहे, तर शहरी भाग हा दाटीवाटीने पसरलेला आहे. त्यातच परराज्यातून आलेल्या लोकांची संख्या ही जास्त असून नोकरदारांची संख्या अधिक आहे. नोकरीधंद्यासाठी ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात (लाखोंनी) नागरिक लोकलने दररोज ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे असो या एसटीस्थानके गर्दीने नेहमी गजबजलेली असतात. २०२० च्या मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर रुग्ण जरी वाढले गेली असली तरी, तो वेग अगदी कमी होता. ११ जुलै रोजी जिल्ह्याची रुग्णसंख्या ही ५० हजार झाली आणि अवघ्या ३० दिवसांत म्हणजे १२ ऑगस्टला तीच रुग्णसंख्या एक लाखांवर पोहोचली. १९ ऑक्टोबरला तिने दोन लाखांचा टप्पा पार केला. याचदरम्यान दुसऱ्याची लाटेची भीती व्यक्त होत असताना रुग्णसंख्या कमी झाल्याने जवळपास कोरोना संपला की काय, असे वाटत होते. त्यातच अचानक कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखीच आली. २६ मार्च रुग्णसंख्या तीन लाख झाली. मात्र, पाच लाखांचा आकडा गाठण्यासाठी अवघे ५० दिवसांचा कालावधी लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठाणेसह कल्याण-डोंबिवलीत रुग्णवाढीची स्पर्धा

या दोन महापालिकांमध्ये ५० दिवसांत एक लाख नऊ हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत प्रभाव या महापालिकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आहे. ठामपात २६ मार्च ते १६ मे दरम्यान ५३ हजार ५२२ रुग्ण आढळले आहेत, तर केडीएमसीत ५५ हजार १५१, नवी मुंबईत ३४, हजार २४९, उल्हासनगर ६ हजार ६६३, भिवंडीत नऊ हजार ४९६, मीरा-भाईंदर १७ हजार ७४४, अंबरनाथ आठ हजार ६७७, बदलापूर आठ हजार ३८३ तर ग्रामीणमध्ये ११ हजार ५३९ रुग्ण दुसऱ्या लाटेतील ५० दिवसांत मिळाले आहेत.