शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

एनआरसी कामगारांचा लढा करणार अधिक तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:40 IST

कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांचे थकीत देण्यांसाठी २० दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ...

कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांचे थकीत देण्यांसाठी २० दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी भेट दिली. कामगारांच्या या लढ्यास ‘वंचित’चा पाठिंबा असून, हा लढा अधिक तीव्र केला जाईल. कामगारांसोबत बैठक घेऊन या प्रकरणी कोणाची भेट घ्यायची हे ठरविले जाईल, अशी ग्वाही आंबेडकर यांनी या वेळी दिली.

या वेळी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उदय चौधरी, भीमराव डोळ, रामदास वळसे आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पाताळगंगा येथे आयपीएलचा प्लॅण्ट उभारला जातो. दुसरीकडे एनआरसी कंपनी बंद होऊन दहा वर्षे लोटली तरी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिली जात नाहीत. सरकार त्यासाठी काहीच करीत नाही. सरकारचे धोरण कामगारविरोधी आहे. सरकारच्या कामगारविरोधी आणि अन्य नागरिकांच्या विरोधातील धोरणांना जो विरोध करतो, त्याला जेलमध्ये टाकले जाते. ‘एनआरसी’च्या कामगारांची थकीत देणी देण्याऐवजी कामगार वसाहतीत राहणाऱ्यांची घरे तोडून त्यांना बेघर केले जात आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने निकाल देताना कामगारांना त्रास देऊ नका, असे स्पष्ट म्हटले आहे. तरीही पोलिसांना हाताशी धरून घरे तोडण्यात येत आहेत. पोलिसांनी कामगार जात्यात आहेत आणि ते सुपात आहे, असे समजू नये. त्यांच्यावरही अशी वेळ येऊ शकते. कामगारांना त्यांनी कायदेशीररीत्या सहकार्य करावे.

मुंबईपासून ७० किलोमीटरच्या अंतरात कोणतीही कंपनी बंद पडली तर ती पुन्हा सुरू केली जात नाही. सरकारने एनआरसी कंपनी अदानीला विकली. विकलेल्या जागेपैकी बहुतांश जागा ही सरकारची आहे. राज्यात मराठी माणसाचे सरकार आहे, असे असताना कामगारांची देणी न देता जमीन विकली कशी जाते? मात्र, या आधीच्या कंपनी व्यवस्थापनाने हजारो कोटी रुपये कर्ज बँकांकडून घेतले होते. ते कोण चुकते करणार? त्याची हमी अदानीने दिली आहे का, असा सवालही आंबेडकर यांनी केला आहे. राज्यातील एखाद्या उद्योजकाला दिल्लीत मोदींच्या शेजारी बसावे वाटले तर ते होणार नाही. त्याला मोदी बगलेत घेणार नाहीत. मात्र, तोच उद्योजक जर गुजरातचा असेल तर त्याला लगेच मोदी बगलेत घेतील. केंद्रातील सरकार अंबानी, अदानीच्या बाजूचे असल्याचे ते पुढे म्हणाले.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. आंबेडकरांनी उपस्थितांना गर्दी करू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन केले. मात्र कार्यकर्ते व उपस्थित त्यांच्या आवाहनाला जुमानत नव्हते. याविषयी आंबेडकर यांनी संतापही व्यक्त केला.

---------------------------