शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्याची हीच वेळ - नाना पटोले

By अजित मांडके | Updated: June 20, 2024 22:00 IST

कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकसभा निवडणूक महायुतीने षडयंत्रणे जिंकली आहे. मात्र आता ही निवडणूक बॅलेट पेपरवर होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या निवडणुकीला एकजुटीने आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बदला घेण्यासाठी ही निवडणूक लढायची असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. 

कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांचे कोकणामध्ये काहीच नाही असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणूक इविहीएम जिंकली. मात्र बॅलेटनेच मतदान झालं पाहिजे हे या देशातील जनतेचे मत आहे, मात्र इविहीएम मुले आपल मत ज्याला देतोय त्याला जात की नाही हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळं  या निवडणुकीत धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी हे कळेल असेही ते म्हणाले. लोकसभेत धनशक्ती जिंकली मात्र आता जनशक्ती जिंकून दाखवून द्या असे आवाहन ही त्यांनी केले.

दबावाचे राजकारण ठाणे जिल्ह्यात केले जाते. मात्र घाबरणारे व्यवस्था इथे नाही. ठाणे जिल्ह्यात आमच्याकडे सगळे टायगर आहेत. लोकसभेत जिंकले ही हवा त्यांच्या डोक्यात आहे. ही हवा या निवडणुकीत फुग्यसारखी फुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला. या निवडणुकीचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा या निवणुकांवर परिणाम होणार असल्याचेही ते म्हणाले.लोकसभेत मोदींच्या नावावर मत मागितली. शिंदेच्या नावावर नाही मागितले. गाझा पट्टी वरील युद्ध मोदींनी थांबवलं मात्र देशांमध्ये नीटच्या परीक्षेत होणारा गोंधळ आणि पेपर फुटी त्यांना थांबवता आली नाही अशी टीकाही त्यांनी केली.

पावसात पोलीस भरती घेऊ नका असेच सांगितलेले असतानाही तुम्ही पावसात का घेतली? असा सवाल त्यांनी केला.राज्यात कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक राहिला नाही, ही परिस्थिती महाराष्ट्रात कधीच तयार झाली नव्हती, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले