शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्याची हीच वेळ - नाना पटोले

By अजित मांडके | Updated: June 20, 2024 22:00 IST

कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकसभा निवडणूक महायुतीने षडयंत्रणे जिंकली आहे. मात्र आता ही निवडणूक बॅलेट पेपरवर होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या निवडणुकीला एकजुटीने आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बदला घेण्यासाठी ही निवडणूक लढायची असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. 

कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांचे कोकणामध्ये काहीच नाही असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणूक इविहीएम जिंकली. मात्र बॅलेटनेच मतदान झालं पाहिजे हे या देशातील जनतेचे मत आहे, मात्र इविहीएम मुले आपल मत ज्याला देतोय त्याला जात की नाही हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळं  या निवडणुकीत धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी हे कळेल असेही ते म्हणाले. लोकसभेत धनशक्ती जिंकली मात्र आता जनशक्ती जिंकून दाखवून द्या असे आवाहन ही त्यांनी केले.

दबावाचे राजकारण ठाणे जिल्ह्यात केले जाते. मात्र घाबरणारे व्यवस्था इथे नाही. ठाणे जिल्ह्यात आमच्याकडे सगळे टायगर आहेत. लोकसभेत जिंकले ही हवा त्यांच्या डोक्यात आहे. ही हवा या निवडणुकीत फुग्यसारखी फुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला. या निवडणुकीचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा या निवणुकांवर परिणाम होणार असल्याचेही ते म्हणाले.लोकसभेत मोदींच्या नावावर मत मागितली. शिंदेच्या नावावर नाही मागितले. गाझा पट्टी वरील युद्ध मोदींनी थांबवलं मात्र देशांमध्ये नीटच्या परीक्षेत होणारा गोंधळ आणि पेपर फुटी त्यांना थांबवता आली नाही अशी टीकाही त्यांनी केली.

पावसात पोलीस भरती घेऊ नका असेच सांगितलेले असतानाही तुम्ही पावसात का घेतली? असा सवाल त्यांनी केला.राज्यात कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक राहिला नाही, ही परिस्थिती महाराष्ट्रात कधीच तयार झाली नव्हती, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले