शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

... आता इथे टाकले जाते डेब्रिज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 03:28 IST

कल्याण : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’साठी नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करून अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन केडीएमसीकडून केले जात असताना दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे डेब्रिज टाकले जात आहे.

कल्याण : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’साठी नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करून अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन केडीएमसीकडून केले जात असताना दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे डेब्रिज टाकले जात आहे. ते उचलले जात नसल्याने डेब्रिजचे ढिगारे जमा झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी सुरू केलेल्या कॉल आॅन डेब्रिज या उपक्रमाचेही तीनतेरा वाजले आहेत.सध्या बहुतांश प्रभागांमधील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याचे चित्र आहे. कल्याण पूर्वेकडील सूचकनाका परिसरातील प्रभाग क्रमांक ४४, नेतिवली टेकडीमधील महात्मा फुलेनगरमध्ये महापालिकेचे पुरते दुर्लक्ष झाल्याने कचºयाचे ढीग आणि दलदलीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र मागील आठवड्यात होते. शहरातील कचरा उचलला जात नसल्याची प्रचीती महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनाही आली. मागील मंगळवारी खडकपाडा परिसरात दौरा करताना कचरा त्यांच्या निदर्शनास पडला. त्यांनी कचरा साचलेल्या ठिकाणी अधिकाºयांना बोलावून त्यांची खरडपट्टी काढलीच. त्याचबरोबर यापुढे कचरा न उचलल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.आता कचºयाबरोबर डेब्रिजचे ढिगारेही दिसू लागले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील नंदी पॅलेस आणि अग्निशमन दलाचे कार्यालय या दरम्यानच्या एमआयडीसीच्या भूखंडावर रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकण्यात आले आहे. बरेच दिवस ते उचलले गेले नसल्याने या परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. तेथे गॅरेजही थाटण्यात आले असून त्यांचाही वेस्ट कचरा डेब्रिजच्या ठिकाणी टाकला जात आहे. या ठिकाणी दुतर्फा ट्रक आणि टँकरसारखी मोठी वाहने उभी केली जात आहेत. या रस्त्यावर विशेष मुलांची शाळा आहे. २७ गावांना कचरा डम्पिंग ग्राउंड नसल्याने तेथे पूर्वी त्या गावांचा कचरा टाकला जात असे. त्यावर न्यायालयाने निर्बंध घालताच तेथे कचरा टाकणे बंद झाले. परंतु, आता या जागेचा वापर डेब्रिज टाकण्यासाठी होत आहे.त्याचबरोबर, एमआयडीसीत पेंढरकर महाविद्यालयाच्या गेटच्या थोडे पुढे गेल्यावरही डेब्रिज टाकले जात आहे. पश्चिमेतील रेल्वेच्या हद्दीत येणाºया बावनचाळीचा परिसर सध्या ओसाड आहे. तेथेही मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात आहे. तेथील रस्तेही खड्ड्यांत गेल्याने ते बुजवण्यासाठी सर्रासपणे डेब्रिज आणून टाकले जात आहे. त्याकडेही केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याने डेब्रिजचा पसारा वाढतच चालल्याचे पाहावयास मिळत आहे.>लोकप्रतिनिधी त्रस्तशहरातील नागरिक व विकासकांमार्फत करण्यात येणाºया बांधकाम व दुरुस्तीच्या कामांमधून मोठ्या प्रमाणात डेब्रिज निर्माण होते. बºयाच वेळा त्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने धूळ निर्माण होते. परिणामी, आरोग्याला निर्माण होणारा धोका पाहता जूनमधील पर्यावरण दिनाचे निमित्त साधत केडीएमसीने डेब्रिजमुक्त रस्ते व पदपथ अभियान सुरू केले. केडीएमसीने अभियानासाठी एजन्सी नियुक्त करून टोल फ्री नंबरही जाहीर केला. मात्र, या नंबरवर कॉल केल्यास तो केडीएमसीच्या आपत्कालीन कक्षाशी जोडला जात होता. या कॉलमुळे कर्मचारी पुरते हैराण झाले होते. विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनाही हा अनुभव आला होता. कॉल करूनही कार्यवाही न झाल्याने एका नगरसेविकेच्या पतीने येथील कर्मचाºयांना शिवीगाळ करण्याचा प्रकारही घडला होता.>‘डेब्रिजची माहिती द्या, तत्काळ उचलू’ : ‘कॉल आॅन डेब्रिज’चे नियोजन महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे होते. परंतु, हे अभियान सध्या पूर्णत: बंद पडल्याची माहिती मिळत आहे. याबाबत, डोंबिवली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी ‘कॉल आॅन डेब्रिज’ उपक्रम सुरू आहे. नागरिकांनी टोल फ्री नंबरवर डेब्रिजची माहिती दिल्यास तेथून ते तत्काळ उचलले जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :kalyanकल्याण