शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

आता आव्हान डेंग्यू, मलेरियाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:50 AM

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पावसाळ्यात दरवर्षी साथींचे आजार डोकेवर काढतात. मात्र, मागील वर्षी कोरोना काळात केडीएमसीसह ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : पावसाळ्यात दरवर्षी साथींचे आजार डोकेवर काढतात. मात्र, मागील वर्षी कोरोना काळात केडीएमसीसह सर्वच सरकारी यंत्रणांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केल्याने कोरोना व पावसाळ्यातील साथींचे आजार नियंत्रणात होते. सध्या कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, यामुळे साथींच्या आजारांचे आव्हान मनपासमोर उभे ठाकण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात मेलरिया, डेंग्यू, टायफॉइड, कॉलरा आदी साथींचे आजार बळावतात. अशा वेळी शहरांमधील मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये या आजारांच्या रुग्णांची उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते. ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. २०१९ मधील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांतील आढावा घेता विविध तापांचे २२ हजार ८१३ रुग्ण आढळले होते. दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना काळात साथीच्या आजारांचा प्रभाव फारसा जाणवला नाही. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तेव्हा डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, गॅस्ट्रो या साथींचे रुग्ण अत्यल्प प्रमाणात आढळले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी हद्दीत धूर फवारणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. कोरोनाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करताना केडीएमसीकडून अन्य साथरोगांचीही माहिती घेतली जात होती, तसेच खबरदारीचे आवाहन केले जात होते. नागरिकांनी काळजी घेतल्याने गेल्या वर्षी साथीच्या आजारांचे प्रमाण कमी दिसून आले.

दरम्यान, यंदाही पावसाळ्याच्या धर्तीवर खबरदारीचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या सावटात यंदाही साथीच्या आजारांना वेसण घालून जाणकारांचा दावा फोल ठरवला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------

अशी आहे आकडेवारी

वर्षे-डेंग्यू- मलेरिया- लेप्टोस्पायरोसिस

२०१७-२४-१७९-०

२०१८-२६-१८२-४

२०१९-८८-१३१-०

२०२०-२९-१२६-०

मे २०२१ -६-२३-०

---------------

२८ केंद्रांवर गप्पी माशांची पैदास

गप्पी मासे डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे केडीएमसीकडून २८ केंद्रांवर गप्पी माशांची पैदास केली जात आहे. ज्या ठिकाणी डासांच्या अळ्या मोठ्या प्रमाणावर आढळतात, तेथे हे गप्पी मासे सोडले जातात. त्यामुळे डासांची पैदास रोखण्यास मदत होते.

------------------

ही घ्या काळजी

बदलत्या हवामानात तापाचे रुग्ण आढळतात. अस्वच्छता, साचलेल्या पाण्यात डेंग्यूची पैदास वाढते. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नका, परिसरात स्वच्छता राखा. डासांचा प्रादुर्भाव वाढला असेल तर मनपातर्फे धूर फवारणी करून घ्या. ताप आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून तातडीने रक्तचाचण्या करून घ्या. पाणी उकळून आणि गाळून प्या.

------------------------------------------------------

साथरोग कृती आराखड्याची अंमलबजावणी

पावसाळ्याच्या धर्तीवर साथरोग कृती आराखडा तयार केला आहे. मनपाच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये आवश्यक अशा औषधांचा साठा आहे. साथीच्या आजारांसाठी स्वतंत्र कक्षाचीही उभारणी केली जाते. मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रांतर्फे घरोघरी सर्वेक्षण केले जाते. आजार होऊ नयेत, यासाठी जागृती केली जाते. सर्वेक्षण व खासगी रुग्णालयात आढळणाऱ्या रुग्णांच्या परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे, तापाच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणे आदी कार्यवाही साथरोग काळात सुरू असते. ज्या बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचते त्यांनाही नोटिसा दिल्या जातात. तेथील कामगारांची दर १५ दिवसांनी आरोग्य तपासणी केली जाते.

- डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग विभागाच्या अधिकारी, केडीएमसी

------