शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

विजेच्या खाजगीकरणाविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:47 IST

टोरंट कंपनीला विरोध : कळवा, मुंब्रा, दिव्यात बंद पाळण्याचा इशारा

ठाणे : कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील वीज वितरणाच्या खाजगीकरणाचे काम भिवंडीत वीजपुरवठा करणाऱ्या टोरंट कंपनीला देण्याचे ‘महावितरण’ने निश्चित केले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत टोरंट कंपनीला कळवा, मुंब्य्रात पाय ठेवू न देण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी सोमवारी बोलावलेल्या बैठकीत सर्वानुमते घेतला आहे. या भागात सक्तीने वीज पुरवठ्याचे खाजगीकरण करण्यास परवानगी दिली, तर कळवा, मुंब्य्रात बंद पाळण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आलेल्या या बैठकीत राष्टÑवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आ. सुभाष भोईर, भाजपाचे आ. किसन कथोरे, शिवसेनेचे कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक राजन किणे, उमेश पाटील, दशरथ पाटील, प्रकाश बर्डे, बाबाजी पाटील, धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी आणि इतर संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवा, मुंब्रा भागातील वीजचोरी, गळती रोखण्यासाठी महावितरणने या भागात विजेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, टोरंट कंपनीला हे काम दिले जाणार आहे. या खाजगीकरणाच्या मुद्यावरून राष्टÑवादीपाठोपाठ आता शिवसेनासुद्धा आक्रमक झाली आहे. या कंपनीचा भिवंडीतील अनुभव फार वाईट आहे, त्यामुळे आमचा या खाजगीकरणाला आणि संबंधित कंपनीलाही विरोध असल्याचे आ. भोईर यांनी सांगितले.

टोरंट कंपनीला दिलेले ‘लेटर आॅफ इंटरेस्ट’ तातडीने रद्द करण्याची मागणी भोईर यांनी ऊर्जामंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. कळवा, मुंब्य्रातच नव्हे तर, संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांविरोधात राष्ट्रवादीने आक्र मक भूमिका घेतली असून यावर तोडगा काढला नाही, तर वागळे इस्टेट भागातील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आ.आव्हाड यांनी दिला. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी या कंपनीच्या विरोधात ऊर्जामंत्र्यांना पत्र दिले आहे.

दरम्यान, या वादग्रस्त कंपनीला पायही ठेवू न देण्याचा आणि गुरु वारपर्यंत शासनाने यासंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास महावितरणच्या कार्यालयावर लाखोंचा मोर्चा नेण्याचा इशारा ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी यावेळी दिला. वेळ पडल्यास कळवा, मुंब्रा आणि दिवा बंदची हाक देण्याची भूमिकाही यावेळी घेण्यात आली. महावितरणचे मुंब्रा विभागामध्ये अंदाजे ८४ हजार, दिवा व शीळ, देसाई विभागात ५६ हजार आणि कळवा विभागात सुमारे ६० हजार ग्राहक असून या विभागातील नागरिकांमध्ये खाजगीकरणाबाबत संताप निर्माण झाला आहे.

टॅग्स :electricityवीज