शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

विजेच्या खाजगीकरणाविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:47 IST

टोरंट कंपनीला विरोध : कळवा, मुंब्रा, दिव्यात बंद पाळण्याचा इशारा

ठाणे : कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील वीज वितरणाच्या खाजगीकरणाचे काम भिवंडीत वीजपुरवठा करणाऱ्या टोरंट कंपनीला देण्याचे ‘महावितरण’ने निश्चित केले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत टोरंट कंपनीला कळवा, मुंब्य्रात पाय ठेवू न देण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी सोमवारी बोलावलेल्या बैठकीत सर्वानुमते घेतला आहे. या भागात सक्तीने वीज पुरवठ्याचे खाजगीकरण करण्यास परवानगी दिली, तर कळवा, मुंब्य्रात बंद पाळण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आलेल्या या बैठकीत राष्टÑवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आ. सुभाष भोईर, भाजपाचे आ. किसन कथोरे, शिवसेनेचे कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक राजन किणे, उमेश पाटील, दशरथ पाटील, प्रकाश बर्डे, बाबाजी पाटील, धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी आणि इतर संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवा, मुंब्रा भागातील वीजचोरी, गळती रोखण्यासाठी महावितरणने या भागात विजेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, टोरंट कंपनीला हे काम दिले जाणार आहे. या खाजगीकरणाच्या मुद्यावरून राष्टÑवादीपाठोपाठ आता शिवसेनासुद्धा आक्रमक झाली आहे. या कंपनीचा भिवंडीतील अनुभव फार वाईट आहे, त्यामुळे आमचा या खाजगीकरणाला आणि संबंधित कंपनीलाही विरोध असल्याचे आ. भोईर यांनी सांगितले.

टोरंट कंपनीला दिलेले ‘लेटर आॅफ इंटरेस्ट’ तातडीने रद्द करण्याची मागणी भोईर यांनी ऊर्जामंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. कळवा, मुंब्य्रातच नव्हे तर, संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांविरोधात राष्ट्रवादीने आक्र मक भूमिका घेतली असून यावर तोडगा काढला नाही, तर वागळे इस्टेट भागातील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आ.आव्हाड यांनी दिला. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी या कंपनीच्या विरोधात ऊर्जामंत्र्यांना पत्र दिले आहे.

दरम्यान, या वादग्रस्त कंपनीला पायही ठेवू न देण्याचा आणि गुरु वारपर्यंत शासनाने यासंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास महावितरणच्या कार्यालयावर लाखोंचा मोर्चा नेण्याचा इशारा ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी यावेळी दिला. वेळ पडल्यास कळवा, मुंब्रा आणि दिवा बंदची हाक देण्याची भूमिकाही यावेळी घेण्यात आली. महावितरणचे मुंब्रा विभागामध्ये अंदाजे ८४ हजार, दिवा व शीळ, देसाई विभागात ५६ हजार आणि कळवा विभागात सुमारे ६० हजार ग्राहक असून या विभागातील नागरिकांमध्ये खाजगीकरणाबाबत संताप निर्माण झाला आहे.

टॅग्स :electricityवीज