शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

वर्षभरापासून फरार ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास कल्याणमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 20:42 IST

दरोडे, दंगली आणि हल्ल्यासारख्या डझनभर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी मंगळवारी कल्याणमध्ये अटक केली.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांची कारवाईआरोपीविरूद्ध डझनभर गुन्हे दाखलन्यायालयासमोर बुधवारी हजेरी

ठाणे : वर्षभरापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगारास वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्राणघातक हल्ला आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.लोकमान्य नगरचा रहिवासी सागर रावळ (२६) हे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध खून, दरोडे, प्राणघातक हल्ला आणि दंगलीसारखे जवळपास डझनभर गुन्हे ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल असून, उर्वरित गुन्हे वागळे इस्टेट आणि नौपाडा पोलीस ठाण्यात आहेत. वर्तकनगर पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र दरोडा, हल्ला आणि दंगलीच्या तीन गुन्ह्यांमध्ये सागरचा शोध वर्तकनगर पोलीस वर्षभरापासून घेत होते.दरम्यान, सागर रावळ हा कल्याण रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर आणि पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने कल्याण रेल्वे स्थानकाजवळून आरोपीला अटक केली. आरोपीजवळ कोणतेही शस्त्र नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आपण वर्षभर चेन्नईला होतो, असे सागरने पोलिसांना सांगितले. त्याच्या माहितीची पोलिसांनी पडताळणी केली असता, सागरची चेन्नई येथे बहिण असल्याचे समजले. त्याचे अधुन-मधून चेन्नई येथे जाणे होते, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस