शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्षभरापासून फरार ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास कल्याणमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 20:42 IST

दरोडे, दंगली आणि हल्ल्यासारख्या डझनभर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी मंगळवारी कल्याणमध्ये अटक केली.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांची कारवाईआरोपीविरूद्ध डझनभर गुन्हे दाखलन्यायालयासमोर बुधवारी हजेरी

ठाणे : वर्षभरापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगारास वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्राणघातक हल्ला आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.लोकमान्य नगरचा रहिवासी सागर रावळ (२६) हे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध खून, दरोडे, प्राणघातक हल्ला आणि दंगलीसारखे जवळपास डझनभर गुन्हे ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल असून, उर्वरित गुन्हे वागळे इस्टेट आणि नौपाडा पोलीस ठाण्यात आहेत. वर्तकनगर पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र दरोडा, हल्ला आणि दंगलीच्या तीन गुन्ह्यांमध्ये सागरचा शोध वर्तकनगर पोलीस वर्षभरापासून घेत होते.दरम्यान, सागर रावळ हा कल्याण रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर आणि पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने कल्याण रेल्वे स्थानकाजवळून आरोपीला अटक केली. आरोपीजवळ कोणतेही शस्त्र नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आपण वर्षभर चेन्नईला होतो, असे सागरने पोलिसांना सांगितले. त्याच्या माहितीची पोलिसांनी पडताळणी केली असता, सागरची चेन्नई येथे बहिण असल्याचे समजले. त्याचे अधुन-मधून चेन्नई येथे जाणे होते, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस