शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

मीरा-भार्इंदरमधील हजारो झोपड्यांना तहसिल कार्यालयाकडून नोटीस

By admin | Updated: February 10, 2017 17:44 IST

एका बाजुला केंद्र सरकार झोपडीमुक्त शहर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करीत आहे. तर दुस-या बाजुला राज्य सरकारच्या जागेवर झोपड्या बांधल्या म्हणून

राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 10 - एका बाजुला केंद्र सरकार झोपडीमुक्त शहर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करीत आहे. तर दुस-या बाजुला राज्य सरकारच्या जागेवर झोपड्या बांधल्या म्हणून त्यांच्याकडुन भुईभाडे वसुल करण्याचा फंडा सुरु करण्यात आला आहे. याआधारे मीरा-भार्इंदर मध्ये राज्य सरकारच्या जागेवर वसलेल्या झोपड्यांना तहसिलदार कार्यालयाने जागा वापरल्यापोटी दंडात्मक भुईभाडे जमा करण्याच्या नोटीसा धाडल्या आहेत. एका झोपडीला किमान चालु वर्षाकाठी सुमारे १० ते २० हजार रुपये जमा करण्याच्या नोटीसा प्राप्त झाल्याने झोपडीधारकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

तहसिल कार्यालयाने अलिकडेच मीरा-भार्इंदरमधील बहुतांशी इमारतींना जागेचे अकृषिक शुल्क भरण्यासाठी हजारो, लाखो रक्कमांच्या नोटीसा धाडल्या होत्या. यामुळे इमारतीतील रहिवाशी चिंताग्रस्त झाले असतानाच झोपडीधारकांनाही तहसिल कार्यालयाने भुईभाडे शुल्क भरण्याच्या नोटीसा पाठवुन त्यांना जोर का झटका दिला आहे. इमारतींचे अकृषिक शुल्क वसुल करण्यास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार स्थगिती दिली आहे. तर झोपड्यांच्या दंडात्मक भुईभाडे वसुलीला ब्रेक कोण लावणार, अशी चिंतायुक्त चर्चा झोपडीधारकांमध्ये सुरु झाली आहे. झोपड्यांत बहुतांशी कुटुंबे गरीब असून त्यात काही दारिद्रय रेषेखालील सुद्धा आहेत. आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या झोपडीधारकांकडुन हजारोंचे दंडात्मक भुईभाडे कसे भरले जाईल, असा संतापजनक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. राजकीय तसेच प्रशासकीय पाठबळ लाभल्यानेच सर्वत्र झोपड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातील १९९५ पुर्वीच्या झोपड्यांना पक्की घरे देण्यासाठी केंद्राच्या बेसिक सर्व्हीसेस टु दि अर्बन पुअर (बीएसयुपी) योजना पालिकेकडुन राबविण्यात येत आहे. दरम्यानच्याच काळात केंद्रातील आघाडी सरकारने शहरी परंतु, ग्रामीण भाग झोपडीमुक्त करण्यासाठी राजीव आवास योजना अंमलात आणली.

ही योजना केंद्रातील यंदाच्या युती सरकारने मोडीत काढून त्याच्या जागी प्रधानमंत्री आवास योजना हि झोपडी धारकांना माफक दरातील पक्के घरे देणारी योजना नुकतीच अंमलात आणली आहे. यामुळे झोपडीधारकांमध्ये आनंदाच्या उकाळ्या फूटत असतानाच तहसिल कार्यालयाने त्याला छेद दिला आहे. शहरातील खाजगी, राज्य व केंद्र सरकार, रेल्वे व पालिकेच्या नागरी सुविधा भुखंडावर सुमारे ३५ हजारांहुन अधिक झोपड्या वसल्या आहेत. त्यातील सुमारे १० हजारांहुन अधिक झोपड्या राज्य सरकारच्या जागेवर वसल्या असुन त्यांनाच तहसिल कार्यालयाने नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटीसांमुळे झोपडीधारक चिंताग्रस्त झाले असुन त्यांनी भुईभाड्यापासुन वाचण्यासाठी आपापल्या क्षेत्रातील राजकीय मंडळींकडे धावपळ सुरु केली आहे. झोपडीधारकांकडुन अशाप्रकारचे शुल्क वसुल करण्याची हि पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत तहसिलदार के. के. भदाणे म्हणाले, राज्य सरकारच्या जागेचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी सध्या एका वर्षांच्या भुईभाड्याची नोटीस सुमारे अडीच हजार झोपड्यांना पाठविण्यात आलेली आहे.