शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शाळेची मान्यता का रद्द करू नये?, केडीएमसीची १३ शाळांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:31 IST

आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नाकारणाऱ्या १३ शाळांना केडीएमसीच्या शिक्षण विभागाचे साहायक आयुक्त मिलिंद धाट यांनी नोटीस बजावली आहे.

कल्याण : आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नाकारणाऱ्या १३ शाळांना केडीएमसीच्या शिक्षण विभागाचे साहायक आयुक्त मिलिंद धाट यांनी नोटीस बजावली आहे. त्यात शाळांची मान्यता का रद्द करू नये, असा सवाल केला आहे. तसेच शाळांनी नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांत शालेय साहित्य पुरविल्याचा अहवाल प्रशासनाला द्यावा, असेही नोटिशीत म्हटले आहे.आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना १३ शाळा शालेय साहित्य नाकारत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. पालकांच्या वतीने शिक्षण आरोग्य अधिकार मंचाने वारंवार आंदोलन केले. तसेच पोलिसतही तक्रारही दिली होती. त्यानंतरही शालेय साहित्य न मिळोल्याने विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयावर चड्डी बनियन मोर्चा काढला होता. महापालिकेने त्याची गंभीर दखल घेत २ जुलैला आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नाकारल्यास शाळेची मान्यता रद्द केली जाईल, अशी तंबी ८१ शाळांना बजावलेल्या नोटिशीत दिली होती.त्यानंतरही काही शाळांकडून अमलबजावणी केली जात नसल्याने शिक्षण आरोग्य अधिकार मंचाने पुन्हा लाक्षणिक उपोषण केले होेते. महापालिकेने आता १३ शाळांना नोटीस बजावली आहे. या शाळांनी शालेय साहित्य नाकारल्याची तक्रार त्यांच्याकडे प्राप्त झाली होती.नोटिस बजावलेल्या शाळांमध्ये दी कॅबेरिया इंटरनॅशनल स्कूल, होली पॅराडाइज कॉन्व्हेंट स्कूल, रवींद्र विद्यालय, आयईएस गणेश विद्यालय, जी. आर. पाटील विद्यालय, जी. आर. पाटील प्रायमरी मंडळ, श्री मोहनलाल देढिया इंग्लिश स्कूल, सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश स्कूल, एस. बी. दिव्या इंग्लिश स्कूल, नारायणी इंग्लिश स्कूल, महिला समिती इंग्लिश स्कूल, जनोदय स्कूल, चंद्रकांत पाटकर इंग्लिश मीडियम स्कूलचा समावेश आहे. दरम्यान, या शाळांनी त्यांना ही नोटीस मिळाली नसल्याचेसांगितले आहे.>ग्रामीण भागातील शाळांचा प्रश्नही अनुत्तरितकल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खाजगी शाळाही आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नाकारत आहेत. या शाळांना समज देण्यासाठी २५ जूनला मुख्याध्यापकांची बैठक गटविकास अधिकारी घेणार होते. मात्र, ही बैठक झालेली नाही. तसेच साहित्य नाकारणाºया शाळांची मान्यता रद्द करण्याची नोटीसही बजावलेली नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित शाळा १५ जुलैला साहित्य देतील, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळालेले नाही, अशी माहिती शिक्षण अधिकार आरोग्य मंचाचे जिल्हाध्यक्ष नितीन धुळे यांनी दिली. प्रशासनाने शाळांची बैठक गुपचूप घेतली असेलही. मात्र पालक आणि मंचाला विश्वासात घेतलेले नाही. तक्रार असलेल्यांना दूर ठेवून तक्रारीचे निवारण कसे करता येईल, असा सवाल मंचाने केला आहे.