शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

हरवले काहीच नाही; उलट बरेच काही गवसले!

By admin | Updated: February 21, 2016 02:41 IST

नाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

- राज चिंचणकर,  ठाणेनाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला. ज्येष्ठ सिनेअभ्यासक व समीक्षक सुधीर नांदगावकर, अभिनेते प्रशांत दामले व सुबोध भावे, सिनेअभ्यासक गणेश मतकरी, सिनेसमीक्षक अमोल परचुरे यांनी हा परिसंवाद रंगवला. ज्येष्ठ निवेदिका वासंती वर्तक यांनी त्यांना बोलते केले. नाटकांवरून चित्रपट करणे, ही जुनी परंपरा आहे; पण कालचा सिनेमा व आजचा सिनेमा यात फरक आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ व ‘नटसम्राट’ ही या माध्यमांतराची अलीकडची उदाहरणे आहेत. ही दोन्ही माध्यमांतरे प्रेक्षकांनी उचलून धरली खरी; पण २० व्या शतकात ज्या नाटकांवरून चित्रपट केले गेले, ते चालले नाहीत. नाटक हे शब्दमाध्यम आहे; तर सिनेमा हे प्रतिमामाध्यम आहे, असे मत सुधीर नांदगावकर यांनी मांडले. नाटकांवर सिनेमा करूच नये, तर कथेवरूनच सिनेमा करावा. कट्यार... हा सिनेमासुद्धा मी नाटकावरून केलेला नाही; तर मी त्या कथेचा सिनेमा केला आहे. या कथेवर मी याआधी नाटकही केले; परंतु पहिल्यापासून मी त्याकडे सिनेमा म्हणूनच पाहत होतो. ते नाटक चालले म्हणून मी त्यावर सिनेमा केलेला नाही, असे भाष्य सुबोध भावे याने केले. जेव्हा सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली जात होती, तेव्हा बालगंधर्वांनासुद्धा भीती वाटली होती. पण, तसे काही झाले नाही, असेही सुबोध पुढे म्हणाला. माध्यमांतरातून हरवले काहीच नाही; तर गवसलेच असे सांगत प्रशांत दामले म्हणाले, नाटकाच्या प्रत्येक प्रयोगातून मला नेहमीच काहीतरी नवीन गवसत गेले आहे. प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्ये वेगळी असतात. कथेच्या बाबतीत एकाच माणसाचा कंट्रोल असतो; पण नाटकाच्या बाबतीत तसे नसते, अशी भूमिका गणेश मतकरी याने मांडली.