शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

हरवले काहीच नाही; उलट बरेच काही गवसले!

By admin | Updated: February 21, 2016 02:41 IST

नाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

- राज चिंचणकर,  ठाणेनाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला. ज्येष्ठ सिनेअभ्यासक व समीक्षक सुधीर नांदगावकर, अभिनेते प्रशांत दामले व सुबोध भावे, सिनेअभ्यासक गणेश मतकरी, सिनेसमीक्षक अमोल परचुरे यांनी हा परिसंवाद रंगवला. ज्येष्ठ निवेदिका वासंती वर्तक यांनी त्यांना बोलते केले. नाटकांवरून चित्रपट करणे, ही जुनी परंपरा आहे; पण कालचा सिनेमा व आजचा सिनेमा यात फरक आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ व ‘नटसम्राट’ ही या माध्यमांतराची अलीकडची उदाहरणे आहेत. ही दोन्ही माध्यमांतरे प्रेक्षकांनी उचलून धरली खरी; पण २० व्या शतकात ज्या नाटकांवरून चित्रपट केले गेले, ते चालले नाहीत. नाटक हे शब्दमाध्यम आहे; तर सिनेमा हे प्रतिमामाध्यम आहे, असे मत सुधीर नांदगावकर यांनी मांडले. नाटकांवर सिनेमा करूच नये, तर कथेवरूनच सिनेमा करावा. कट्यार... हा सिनेमासुद्धा मी नाटकावरून केलेला नाही; तर मी त्या कथेचा सिनेमा केला आहे. या कथेवर मी याआधी नाटकही केले; परंतु पहिल्यापासून मी त्याकडे सिनेमा म्हणूनच पाहत होतो. ते नाटक चालले म्हणून मी त्यावर सिनेमा केलेला नाही, असे भाष्य सुबोध भावे याने केले. जेव्हा सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली जात होती, तेव्हा बालगंधर्वांनासुद्धा भीती वाटली होती. पण, तसे काही झाले नाही, असेही सुबोध पुढे म्हणाला. माध्यमांतरातून हरवले काहीच नाही; तर गवसलेच असे सांगत प्रशांत दामले म्हणाले, नाटकाच्या प्रत्येक प्रयोगातून मला नेहमीच काहीतरी नवीन गवसत गेले आहे. प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्ये वेगळी असतात. कथेच्या बाबतीत एकाच माणसाचा कंट्रोल असतो; पण नाटकाच्या बाबतीत तसे नसते, अशी भूमिका गणेश मतकरी याने मांडली.