शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

हरवले काहीच नाही; उलट बरेच काही गवसले!

By admin | Updated: February 21, 2016 02:41 IST

नाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

- राज चिंचणकर,  ठाणेनाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला. ज्येष्ठ सिनेअभ्यासक व समीक्षक सुधीर नांदगावकर, अभिनेते प्रशांत दामले व सुबोध भावे, सिनेअभ्यासक गणेश मतकरी, सिनेसमीक्षक अमोल परचुरे यांनी हा परिसंवाद रंगवला. ज्येष्ठ निवेदिका वासंती वर्तक यांनी त्यांना बोलते केले. नाटकांवरून चित्रपट करणे, ही जुनी परंपरा आहे; पण कालचा सिनेमा व आजचा सिनेमा यात फरक आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ व ‘नटसम्राट’ ही या माध्यमांतराची अलीकडची उदाहरणे आहेत. ही दोन्ही माध्यमांतरे प्रेक्षकांनी उचलून धरली खरी; पण २० व्या शतकात ज्या नाटकांवरून चित्रपट केले गेले, ते चालले नाहीत. नाटक हे शब्दमाध्यम आहे; तर सिनेमा हे प्रतिमामाध्यम आहे, असे मत सुधीर नांदगावकर यांनी मांडले. नाटकांवर सिनेमा करूच नये, तर कथेवरूनच सिनेमा करावा. कट्यार... हा सिनेमासुद्धा मी नाटकावरून केलेला नाही; तर मी त्या कथेचा सिनेमा केला आहे. या कथेवर मी याआधी नाटकही केले; परंतु पहिल्यापासून मी त्याकडे सिनेमा म्हणूनच पाहत होतो. ते नाटक चालले म्हणून मी त्यावर सिनेमा केलेला नाही, असे भाष्य सुबोध भावे याने केले. जेव्हा सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली जात होती, तेव्हा बालगंधर्वांनासुद्धा भीती वाटली होती. पण, तसे काही झाले नाही, असेही सुबोध पुढे म्हणाला. माध्यमांतरातून हरवले काहीच नाही; तर गवसलेच असे सांगत प्रशांत दामले म्हणाले, नाटकाच्या प्रत्येक प्रयोगातून मला नेहमीच काहीतरी नवीन गवसत गेले आहे. प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्ये वेगळी असतात. कथेच्या बाबतीत एकाच माणसाचा कंट्रोल असतो; पण नाटकाच्या बाबतीत तसे नसते, अशी भूमिका गणेश मतकरी याने मांडली.